शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

वाढते अपघात रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’- पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे

By admin | Updated: June 13, 2017 10:52 IST

सायबर गुन्ह्यांबाबत जिल्हाभरात करणार जनजागृती

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.13 : जिल्ह्यात दररोज 5 ते 6 अपघात होतात व त्यात किमान एका व्यक्तीचा  जीव जातो. वाढते अपघात ही चिंताजनक बाब असून ते रोखण्यासाठी पोलीस, आरटीओ व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आराखडा तयार केला जात आहे. सायबर गुन्ह्यांचेही प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्याची मदत घेवून शाळा, महाविद्यालय व सोसायटय़ांमध्ये मोबाईल व लॅपटॉप हाताळण्याबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी  दिली. 
कराळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. कराळे यांच्याशी झालेली चर्चा प्रश्नोत्तर स्वरुपात अशी..
प्रश्न : पोलीस अधीक्षक म्हणून आपण कोणत्या विषयाला प्राधान्य देणार?
कराळे : जळगाव जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर अपघाताच्या घटनांनी मन सुन्न झाले.  दिवसाला 5 ते 6 अपघात होतात व त्यात किमान एक बळी जातो. त्यामुळे अपघात रोखणे यालाच प्रथम प्राधान्य दिले आहे.ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झाले आहेत अशा ठिकाणांचे पोलीस, आरटीओ व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्रित सव्र्हेक्षण केले जाणार आहे.
प्रश्न : जिल्ह्यातील वाढते अपघात कसे रोखणार?
कराळे : तिन्ही यंत्रणाच्या अहवालावर उपाययोजना केल्या जातील. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विनय मोरे यांना जळगावात बोलावले जाणार आहे. मोरे यांचा अपघाताच्या बाबतील गाढा अभ्यास आहे. अपघात कसे होतात, ते रोखण्यासाठी काय केले पाहिजे, अपघातात जीव कसे वाचविता येवू शकतात याबाबत ते शाळा, महाविद्यालयात जावून सादरीकरण करतील. त्यामुळे 20 टक्के अपघात रोखता आले तरी हेतू साध्य होईल. 
प्रश्न : सायबरचे गुन्हे रोखण्यासाठी काय उपायोजना करणार?
कराळे : सायबरचे गुन्हे रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, कार्पोरेट कार्यालय, कंपन्या व सोसायटींमध्ये जावून मोबाईल व लॅपटॉप वापरावर जनजागृती केली जाईल. अभिया¨त्रकीच्या विद्याथ्र्याची यात मदत घेतली जाईल. त्याला काय प्रतिसाद मिळाला त्यानंतर पुढची दिशा ठरविली जाईल. सूचनांचेही आम्ही स्वागत करु.
महिलांवरील अन्याय व अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत प्रबोधन करणार
 महिलांवरील अन्याय व अत्याचाराचे गुन्हे तसेच अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आहे. काही गुन्हे सूड भावनेतून दाखल होत असल्याचेही लक्षात आले आहे. 
महिला व मुलींच्या या गुन्ह्यांबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेवून समाजात परिवर्तन केले जाईल, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले.
प्रश्न : जिल्हा पोलीस दलात मनुष्यबळाची अडचण आहे का?
कराळे : शंभराच्या जवळपास जागा रिक्त आहेत. भरतीतून काही जागा भरल्या जातील. महिलांचे प्रमाण कमी असल्याने या गॅङोटमध्ये मोठय़ा पोलीस स्टेशनला 7, तालुकास्तरावर 5 व लहान पोलीस स्टेशनला 3 महिला कर्मचारी दिलेल्या आहेत. शिवाय लहान पोलीस स्टेशनला 30 कर्मचारी देण्यात आले आहेत.