शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बोगस दाखले देणाऱ्या वनपालावर गुन्हा दाखल करणार, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:05 IST

दाखले साक्षांकित करणाºया अधिकाºयांनाही नोटीस

जळगाव : वनहक्क दाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वनजमीन बळकावण्याचे अनेक प्रकार जिल्ह्यात सुरू असून मंगळवारी, याबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणांचे रेकॉर्ड योग्य त्या नमुन्यात नसल्याने त्या पद्धतीने सादर करण्याचे आदेश दिले. तसेच यावल वनविभागात २००८-०९ मध्ये बदलून आलेल्या वनपाल लोखंडे यांनी वनदाव्यांसाठी २००५ पूर्वीचे अधिवास असल्याबाबतचे दाखले दिल्याचे आढळून आल्याने हे दाखले रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिले. तसेच वनपाल लोखंडे यांची तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक मोराणकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मात्र माहिती देण्यास टाळाटाळ केली.इतरही गैरप्रकारवनपालाने दिलेले बोगस दाखले संबंधीत दावे करणाºयांनी अन्य अधिकाºयांकडून साक्षांकित करून घेतले. त्यामुळे संबंधीत अधिकाºयांनाही नोटीस देण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये अर्जदाराच्या नावावर महसूली हद्दीत जमीन असतानाही त्यांनी वनहक्क दावे दाखल केले आहेत. तर काही वनविभागातच नोकरीस असतानाही त्यांनी वनहक्क दाव्यांचे प्रकरण सादर केले असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.याप्रकरणी आता सखोल माहिती घेण्यास सुरूवात झाली असल्याने भविष्यात कठोर कारवाई करण्याचे संकेतच जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.अनेक प्रकरणांमध्ये गडबडीजिल्हाधिकाºयांनी सांगितले की, वनपाल लोखंडे यांनी स्वत:ची नियुक्ती २००८-०९ मध्ये यावल वनविभागात झालेली असताना २००५ पूर्वीच्या अधिवासाबाबतचे दाखले दिल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी हे बोगस दाखले रद्द करण्याचे आदेश देत याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश वनविभागाच्या अधिकाºयांना दिले.बहुतांश प्रकरणे चोपडा व यावल तालुक्यातीलवनांमध्ये पूर्वीपासून रहिवास असलेल्या आदिवासींना त्यांची जमीन देण्याचा निर्णय शासनाने वनहक्क जमिन कायद्याद्वारे घेतला आहे. मात्र बनावट कागदपत्र व पुरावे सादर करून या कायद्याचा दुरूपयोग करून वनजमीन बळकावण्याचे उद्योगच सुरू झाले असल्याचे चित्र आहे. त्यासाठी सातपुड्याच्या जंगलात रातोरात अतिक्रमण झाल्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात. वनहक्क दाव्यांबाबत मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडे बैठक होती. त्यात १४२ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणांची कागदपत्रे पाहिली असता त्यात सुसुत्रता नसल्याचे व ठराविक नमुन्यात माहिती दिलेली नसल्याचे आढळून आल्याने त्यास्वरूपात माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव