शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाचोरा शहरातील भुयारी मार्गावर सातत्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:17 IST

त्वरित उपाययोजना करण्याची मागणी : सतत झिरपणा-या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात

पाचोरा : शहराला मुख्य बाजारपेठेशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग अपघातांचे माहेरघर ठरत असून नित्य नियमाने या भुयारी मार्गात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे.जुने पाचोरा शहर आणि नवीन लोकवस्तला जोडण्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे रेल्वे गेट होते. तासनतास नागरिकांना या ठिकाणी थांबावे लागायचे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असे. म्हणूनच २००८-०९ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नगरपालिकेच्या माध्यमातून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. परंतु पाचोरावासीयांसाठी सुविधा म्हणून बनविलेला हा भुयारी मार्ग त्रासदायक ठरत आहे.या भुयारी मार्गाच्या बाजूच्या भिंतींमधून पाणी सतत झिरपत राहते. भुयारी मार्गाच्या बाजूला पाणी निघून जाण्यासाठी जी व्यवस्था असायला हवी होती ती नसल्यामुळे हे पाणी मुख्य रस्त्यावर वाहून येते. त्यात माती मिसळल्याने चिखल तयार होऊन दुचाकी, लहान चारचाकी वाहने चालवितांना कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर कधी कधी चक्क वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यानंतर बाजूच्या भिंतींमधून सतत झिरपत असणारे पाणी ही मोठी समस्या ठरली आहे. या साचलेल्या पाण्यात बारीक वाळू आणि चिखल यांचे मिश्रण असल्याने दुचाकी वाहने घसरून सातत्याने अपघात घडत आहेत. अनेकांना अपघात झाल्याने अपंगत्व आले आहे.या भुयारी मार्गाच्या पलीकडे महत्त्वाच्या शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि नवीन लोकवस्ती असल्यामुळे या मागार्तून असंख्य वाहनांची रोज ये-जा असते. शाळकरी मुले, महिलांना या मार्गावर अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. यातून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व भोगावे लागत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.