शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाचोरा शहरातील भुयारी मार्गावर सातत्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:17 IST

त्वरित उपाययोजना करण्याची मागणी : सतत झिरपणा-या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात

पाचोरा : शहराला मुख्य बाजारपेठेशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग अपघातांचे माहेरघर ठरत असून नित्य नियमाने या भुयारी मार्गात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे.जुने पाचोरा शहर आणि नवीन लोकवस्तला जोडण्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे रेल्वे गेट होते. तासनतास नागरिकांना या ठिकाणी थांबावे लागायचे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असे. म्हणूनच २००८-०९ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नगरपालिकेच्या माध्यमातून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. परंतु पाचोरावासीयांसाठी सुविधा म्हणून बनविलेला हा भुयारी मार्ग त्रासदायक ठरत आहे.या भुयारी मार्गाच्या बाजूच्या भिंतींमधून पाणी सतत झिरपत राहते. भुयारी मार्गाच्या बाजूला पाणी निघून जाण्यासाठी जी व्यवस्था असायला हवी होती ती नसल्यामुळे हे पाणी मुख्य रस्त्यावर वाहून येते. त्यात माती मिसळल्याने चिखल तयार होऊन दुचाकी, लहान चारचाकी वाहने चालवितांना कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर कधी कधी चक्क वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यानंतर बाजूच्या भिंतींमधून सतत झिरपत असणारे पाणी ही मोठी समस्या ठरली आहे. या साचलेल्या पाण्यात बारीक वाळू आणि चिखल यांचे मिश्रण असल्याने दुचाकी वाहने घसरून सातत्याने अपघात घडत आहेत. अनेकांना अपघात झाल्याने अपंगत्व आले आहे.या भुयारी मार्गाच्या पलीकडे महत्त्वाच्या शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि नवीन लोकवस्ती असल्यामुळे या मागार्तून असंख्य वाहनांची रोज ये-जा असते. शाळकरी मुले, महिलांना या मार्गावर अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. यातून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व भोगावे लागत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.