शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

पाचोरा शहरातील भुयारी मार्गावर सातत्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:17 IST

त्वरित उपाययोजना करण्याची मागणी : सतत झिरपणा-या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात

पाचोरा : शहराला मुख्य बाजारपेठेशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग अपघातांचे माहेरघर ठरत असून नित्य नियमाने या भुयारी मार्गात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे.जुने पाचोरा शहर आणि नवीन लोकवस्तला जोडण्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे रेल्वे गेट होते. तासनतास नागरिकांना या ठिकाणी थांबावे लागायचे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असे. म्हणूनच २००८-०९ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नगरपालिकेच्या माध्यमातून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. परंतु पाचोरावासीयांसाठी सुविधा म्हणून बनविलेला हा भुयारी मार्ग त्रासदायक ठरत आहे.या भुयारी मार्गाच्या बाजूच्या भिंतींमधून पाणी सतत झिरपत राहते. भुयारी मार्गाच्या बाजूला पाणी निघून जाण्यासाठी जी व्यवस्था असायला हवी होती ती नसल्यामुळे हे पाणी मुख्य रस्त्यावर वाहून येते. त्यात माती मिसळल्याने चिखल तयार होऊन दुचाकी, लहान चारचाकी वाहने चालवितांना कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर कधी कधी चक्क वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यानंतर बाजूच्या भिंतींमधून सतत झिरपत असणारे पाणी ही मोठी समस्या ठरली आहे. या साचलेल्या पाण्यात बारीक वाळू आणि चिखल यांचे मिश्रण असल्याने दुचाकी वाहने घसरून सातत्याने अपघात घडत आहेत. अनेकांना अपघात झाल्याने अपंगत्व आले आहे.या भुयारी मार्गाच्या पलीकडे महत्त्वाच्या शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि नवीन लोकवस्ती असल्यामुळे या मागार्तून असंख्य वाहनांची रोज ये-जा असते. शाळकरी मुले, महिलांना या मार्गावर अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. यातून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व भोगावे लागत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.