शहरं
Join us  
Trending Stories
1
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
2
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
3
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
4
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
5
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
6
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
7
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
8
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
9
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
10
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
11
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
12
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
14
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
15
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
16
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
17
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
18
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
19
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
20
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

एकतीस वषार्नंतर चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:10 IST

मंत्रीमंडळ बैठकीत झाला निर्णय

ठळक मुद्देसर्वसामान्यांकडून निर्णयाचे स्वागतवकील संघाने फटाके फोडून केले स्वागत

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. ९ - गेल्या एकतीस वषार्पासूनची मागणी असलेल्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर मान्यतेची मोहोर उमटली. शासनाच्या निर्णयाचे वकील संघासह सर्वसामान्यांनी देखील स्वागत केले आहे.चाळीसगाव येथे पक्षकारांची सोय होऊन जलद न्याय मिळावा यासाठी अतिरीक्त जिल्हास्तर व वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाची सातत्याने मागणी करण्यात येत होती. याप्रश्नासाठी वकील संघाने वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार देखील उपसले होते. मात्र जागेचे कारण पुढे करुन याविषयाला बगल दिली जात होती. कृती समितीचा पाठपुरावा सुरुच होता. आमदार उन्मेष पाटील यांनीही यातील तांत्रिक बाबींची पुर्तता करुन हा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकी ठेवण्यासाठी गेल्या दोन वषार्पासून सातत्याने पाठपुरावा केला. अखेरीस मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.वकील संघाने फटाके फोडून केले स्वागतवरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयास मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्याचे संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल होताच निर्णयाचे स्वागत करण्यात आले. दुपारी तीन वाजता धुळे रोडस्थित न्यायालयाच्या प्रवेशव्दारासमोर वकील संघाचे अध्यक्ष अ?ड. राहुल पाटील यांच्यासह पदाधिकारी व वकील बांधवांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.३१ वषार्पासून सुरु होता लढादिवाणी स्वरुपाचे सर्व खटले जळगाव येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दाखल करावे लागतात. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. १९८७ पासून वकील संघ आणि कृती समिती मार्फत वरिष्ठस्तर न्यायालयासाठी लढा सुरु होता. अखेर ३१ वषार्नंतर या लढ्याला यश आले आहे.काय होईल फायदासद्यस्थितीत आहे त्याच जागेत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरु करण्यात येणार आहे. शेतक-यांचे भूसंपादनाचे दावे, कौटूंबिक खटले (घटस्फोट, पोटगी) हे सर्व दावे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दाखल करावे लागतात. यासाठी पक्षकारांना ९० किमी अंतरावरील जळगाव शिवाय पर्याय नाही. चाळीसगाव येथे वरिष्ठ स्तर न्यायालय अस्तीत्वात आल्यानंतर पक्षकारांचा फायदा होणार असून न्यायदानाची प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे. सद्यस्थिती चाळीसगाव तालुक्यातील दिवाणी स्वरुपाचे दिड हजाराहून अधिक दावे जळगाव येथे प्रलंबित आहेत.ब-याच वषार्पासूनची मागणी मान्य झाल्याने आनंद वाटला. यामुळे पक्षकारांची मोठी सोय होणार आहे. न्यायदान देखील जलद होण्यास मदत होईल. यासाठी आमचा लढा सुरु होता.- अ‍ॅड. साहेबराव पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ, चाळीसगाववरिष्ठस्तर न्यायालयाच्या मंजुरी आमच्या लढ्याला अर्धे यश आले आहे. यापुढे अतिरीक्त जिल्हास्तर न्यायालयासाठी आम्ही कंबर कसणार आहोत. शासनाचे आभार- अ‍ॅड. राजेंद्र सोनवणे, अध्यक्ष, कृती समिती, चाळीसगावगेल्या दोन वषार्पासून या प्रश्नात लक्ष घातले होते. एकतीस वषार्पासून हा लढा सुरु होता. यातील तांत्रिक बाबींची पुर्तता करुन अर्थमंत्र्यांकडून वेतन खचार्ला मंजुरी मिळवली. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रश्न सुटल्याने जनतेचा फायदाच होणार आहे.- उन्मेष पाटील, आमदार, चाळीसगाव......वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाची तालुक्याला मोठी निकड होती. उशिरा का असेना आमच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत.- अ‍ॅड. राहुल पाटील, अध्यक्ष, चाळीसगाव वकिल संघ

टॅग्स :Courtन्यायालयChalisgaonचाळीसगाव