शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अबब... एलसीबीसाठी तब्बल २५० पोलिसांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST

जळगाव : जिल्हा पोलीस दलात फेरबदल झाल्यानंतर आता अंमलदार पातळीवरही काही बदल होणार आहेत. विनंती बदलीसाठी ४५० च्यावर अंमलदारांनी ...

जळगाव : जिल्हा पोलीस दलात फेरबदल झाल्यानंतर आता अंमलदार पातळीवरही काही बदल होणार आहेत. विनंती बदलीसाठी ४५० च्यावर अंमलदारांनी अर्ज केलेले आहेत, त्यातील २५० पेक्षा जास्त अर्ज एकट्या स्थानिक गुन्हे शाखेसाठी (एलसीबी) प्राप्त झालेले आहेत. त्याखालोखाल अर्ज हे जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष व शहर वाहतूक शाखेसाठी आहेत. क्राईम पोलीस ठाण्यांसाठी कमी अर्ज आलेले आहेत.

ऑगस्ट महिना हा पोलीस दलासाठी बदलीचा महिना होता. प्रशासकीय बदल्यांसाठी ३१ ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया वेळेत पार पडली. या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी योग्य समतोल साधला होता. आता विनंती बदल्यांमध्ये देखील कस लागण्याची शक्यता आहे. अर्थात विनंती बदल्यांना शासनाने गाईडलाईन दिलेली नाही, ते सर्वस्व अधिकार पोलीस अधीक्षकांचे असतात. त्यामुळे यावेळी ४५० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. गेल्या आठवड्यातच जिल्हा पोलीस दलात फेरबदल करून २६ पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलविण्यात आले. त्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सहायक व उपनिरीक्षक या दुय्यम अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. ३१ ऑगस्टपर्यंत प्रशासकीय बदल्यांची मुदत होती, ती आता संपली आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर एकही प्रशासकीय बदली होणार नाही.

एलसीबीत १८ जागा रिक्त

प्रशासकीय बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेत १८ जागा रिक्त झालेल्या आहेत. या शाखेत ९० च्या जवळपास कर्मचारी संख्या आहे आणि आता २५० पेक्षा जास्त अर्ज याच शाखेसाठी आलेले आहेत. अर्थात विनंती बदल्या करायच्या किंवा नाही याचे सर्वस्वी अधिकार पोलीस अधीक्षकांचेच असल्याने तशी सक्ती पण नाही, परंतु खरोखरच गैरसोय, अडचण व वैद्यकीय कारणे बघून समतोल साधला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिली.

बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नित्याचाच

पोलीस दलाच्या बदल्यामंध्ये राजकीय हस्तक्षेप हा नेहमीचाच अनुभव आहे. याआधी तर थेट यादीच दिली जायची. यंदा मात्र ही प्रथा काही अंशी खंडित झाली असली तरी काही अंमलदारांनी अधिकाऱ्यांच्या मार्फत फिल्डिंग लावलेली आहे. मुख्यालयातील आरसीपीला असलेल्या तरुण पोलीस अंमलदारांच्या देखील यावेळी बदल्या होणार असून, गुणवत्ता तपासून त्यांना चांगल्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले जात आहे. विनंती बदल्यांच्या अर्जात क्राईम पोलीस ठाण्यासाठी अगदी कमी अर्ज आलेले आहेत.

कोट...

३१ ऑगस्टची डेडलाईन प्रशासकीय बदल्यांसाठी होती. विनंती बदल्यांना हा नियम लागू नाही. जिल्ह्यातील रिक्त पदांचा अंदाज घेऊन खरोखरच गरज आहे अशाच अंमलदारांच्या अर्जाचा विचार केला जाईल. साधारणत: आठवडाभरात विनंती बदल्या केल्या जातील.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक