शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

९४ वॉटर हॉर्वेस्टींग, १२ विहिरी व पाच बोअरवेल पुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:04 IST

भुसावळ विभागात १५१ श्री सदस्यांचा सहभाग : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

भुसावळ, जि.जळगाव : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत भुसावळ विभागात ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण व वॉटर हार्वेस्टिंगची सुमारे ८० लाख किमतीची ५१२ कामे लोकसहभागातून करण्यात आली. यात ९४ ठिकाणी वॉटर हार्वेस्टींग, १२ विहिरी आणि पाच कूपनलिकांचे पुनर्भरण ही कामे झाली. यासाठी १५१ श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून परिश्रम घेतले. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची शुद्धता वाढण्यास मदत होणार आहे.पुनर्भरण - काळाची गुंतवणूकवर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विहीर/कूपनलिका व वॉटर हार्वेस्टिंग पुनर्भरण काळाची गरज असून भविष्यकाळातील गुंतवणूकच आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेत डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत १५१ श्री सदस्यांनी भुसावळ, यावल शहरासह ग्रामीण भागातील १३ गावांमध्ये विविध पुनर्भरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे.भुसावळ शहरात सर्वाधिक कामेवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवण करण्यासाठीची कृत्रिम पद्धत. शहरात ३९४ ठिकाणी श्री सदस्यांनी निस्वार्थपणे प्रतिष्ठानच्यावतीने छतावरील पावसाचे पाणी अडवून वॉटर हार्वेस्टिंगचे कामे पूर्ण केली. तसेच तालुक्यात मोंढाळा, मानमोडी, खंडाळा, फुलगाव व वरणगाव येथे ९ ठिकाणी विहीर पुनर्भरण व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले.यावल तालुक्यातील अट्रावल, नायगाव, वढोदे व इचखेडा येथे पाच ठिकाणी विहिर व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले. यासाठी शासकीय निधी खर्च केला असता तर सुमारे ८० लाख रुपये इतका निधी लागला असता. मात्र विविध ५११ पुनर्भरणाच्या कामामुळे सुमारे ८० लाख निधीची शासनाची बचत झाली आहे.प्रतिष्ठान बनले एक अधिष्ठानडॉ.नानासाहेब धर्मीधिकारी प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्यात निस्वार्थपणे सक्रिय असते. स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता तसेच विविध सामाजिक उपक्रम मार्गदर्शनपर शिबीर यासह अनेक उपक्रमांनी प्रतिष्ठानचा शहर व ग्रामीण भागात लौकिक आहे. त्यामुळे सदर प्रतिष्ठान हे जनतेच्या मनातील अधिष्ठान बनले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ