शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

९४ वॉटर हॉर्वेस्टींग, १२ विहिरी व पाच बोअरवेल पुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:04 IST

भुसावळ विभागात १५१ श्री सदस्यांचा सहभाग : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य सामाजिक उपक्रम

भुसावळ, जि.जळगाव : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत भुसावळ विभागात ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण व वॉटर हार्वेस्टिंगची सुमारे ८० लाख किमतीची ५१२ कामे लोकसहभागातून करण्यात आली. यात ९४ ठिकाणी वॉटर हार्वेस्टींग, १२ विहिरी आणि पाच कूपनलिकांचे पुनर्भरण ही कामे झाली. यासाठी १५१ श्री सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून परिश्रम घेतले. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची शुद्धता वाढण्यास मदत होणार आहे.पुनर्भरण - काळाची गुंतवणूकवर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विहीर/कूपनलिका व वॉटर हार्वेस्टिंग पुनर्भरण काळाची गरज असून भविष्यकाळातील गुंतवणूकच आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेत डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत १५१ श्री सदस्यांनी भुसावळ, यावल शहरासह ग्रामीण भागातील १३ गावांमध्ये विविध पुनर्भरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे.भुसावळ शहरात सर्वाधिक कामेवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवण करण्यासाठीची कृत्रिम पद्धत. शहरात ३९४ ठिकाणी श्री सदस्यांनी निस्वार्थपणे प्रतिष्ठानच्यावतीने छतावरील पावसाचे पाणी अडवून वॉटर हार्वेस्टिंगचे कामे पूर्ण केली. तसेच तालुक्यात मोंढाळा, मानमोडी, खंडाळा, फुलगाव व वरणगाव येथे ९ ठिकाणी विहीर पुनर्भरण व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले.यावल तालुक्यातील अट्रावल, नायगाव, वढोदे व इचखेडा येथे पाच ठिकाणी विहिर व बोअरवेल पुनर्भरण करण्यात आले. यासाठी शासकीय निधी खर्च केला असता तर सुमारे ८० लाख रुपये इतका निधी लागला असता. मात्र विविध ५११ पुनर्भरणाच्या कामामुळे सुमारे ८० लाख निधीची शासनाची बचत झाली आहे.प्रतिष्ठान बनले एक अधिष्ठानडॉ.नानासाहेब धर्मीधिकारी प्रतिष्ठान अनेक सामाजिक कार्यात निस्वार्थपणे सक्रिय असते. स्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता तसेच विविध सामाजिक उपक्रम मार्गदर्शनपर शिबीर यासह अनेक उपक्रमांनी प्रतिष्ठानचा शहर व ग्रामीण भागात लौकिक आहे. त्यामुळे सदर प्रतिष्ठान हे जनतेच्या मनातील अधिष्ठान बनले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ