शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
2
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
5
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
6
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
7
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
8
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
9
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
10
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
11
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
12
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
13
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
14
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
15
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
16
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
17
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
18
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
19
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
20
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली

९३ पाणीपुरवठा योजनांचा खंडित वीजपुरवठा होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:44 IST

चाळीसगाव येथे जनता दरबारात वीज बिलांबाबत तक्रारी

ठळक मुद्दे वैयक्तिक वीजबिलांचा गोंधळ, अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी याबाबतही नागरिकांनी जनता दरबारात समस्या माडल्या. यावर नरेंद्र सोनवणे यांनी अशा साडेतीन हजार तक्रारी आल्याचे मान्य कैले. याचा निपटारा येत्या ३० दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी दि ‘लोकमत’ने तालुक्यातील वीलबिले वसुली व वीजपुरवठा करण्याच्या मोहिमेचे विस्तृत वृत्त १३ फेब्रुवारीच्या अंकात मांडले होते. या समस्येचा उहापोह केला होता. जनता दरबारात काही सरपंचांनी ‘लोकमत’ने प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद दिले. वीजपुरवठा खंडित केल्याने गाव कारभाºयांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. १६ : तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि सार्वजनिक विज देयके थकविल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण अबलंबिल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता आमदारांनी बोलविलेल्या जनता दरबारात सरपंचांनी वीजबिलांबाबत तक्रारी करतानाच महावितरणच्या वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेवरही आगपाखड केली. यावर आमदार पाटील यांनी तोडगा काढल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे महावितरणने मान्य केले आहे. या वेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, दिनेश बोरसे, आनंद खरात, महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे, शंकर भालसिंग आदी उपस्थित होते.महावितरणने १०० टक्के वीजबिले वसुली मोहिमेतर्गत सूचना देऊनही वीज बील न भरणाºया ग्रामीण भागातील १९२ पैकी ९३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. ३४ ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक वीजबिलांची नऊ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये थकविल्याने त्याचाही वीजपुरवठा खंडित करून झटका दिला होता. पाणी योजनांकडे सहा कोटी ४० लाख ४० हजार असे एकूण १६ कोटी रुपये वसुलीसाठी महावितरणने १ फेब्रुवारीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. याआधी ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. महावितरणाला थकीत रकमेतील ५० टक्के रक्कम मिळणे अपेक्षित आहे.१० दिवसात पैसे भरणारवीजपुरवठा खंडित झाल्याने गावे अंधारात असून पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. गिरणेला मध्यंतरी आवर्तन सुटल्याने पाणी असूनही विजेअभावी पाणीपुरवठा होऊ शकत नाही. यामुळे ग्रामीण भागात मोठा असंतोष पसरला आहे. याची दखल घेत शुक्रवारी आमदार उन्मेष पाटील यांनी सरपंचांचे म्हणणे ऐकून घेतले.जानेवारीच्या वीज बिलाच्या रकमेपोटी ग्रामपंचायतींनी १६ रोजी त्यांच्याकडे जेवढी रक्कम उपलब्ध होईल त्याचा भरणा महावितरणकडे करावयाचा आहे.शुक्रवारी सायंकाळपर्यंत सर्व पाणी योजना व गावांचा सार्वजनिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार अशा सूचना आमदार पाटील यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र सोनवणे यांना दिल्या.वीज बिलाची उरलेली रक्कम ग्रामपंचायतींनी १० दिवसात अदा करावयाची आहे, असा तोडगा काढण्यात आला असून, वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याबाबत आमदार पाटील यांनी सक्त सूचना दिल्या.थकबाकीचे टप्पे पाडणारसद्य:स्थितीत ग्रामपंचायतींची आर्थिकस्थिती खालावलेली आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतकºयांना फारसे काही मिळाले नाही. याचा फटका ग्रामपंचायतींच्या वसुलीला बसला आहे. ग्रा.पं. चे कर संकलन (घरपट्टी, पाणीपट्टी) पूर्णपणे ठप्प आहे. वीजबिलाची थकीत रक्कम टप्पे पाडून अदा करावे, असा मार्ग काढण्यात आला. थकबाकीनुसार पाच, १० आणि १५ हप्त्यांचे टप्पे पाडण्यात आले. ही सूचना सरपंचांनी मान्य केली. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज बिलांची थकीत रक्कम अदा करता येईल का? याबाबत ग्रामविकास विभागाकडून मार्गदर्शनही घेण्यात येणार आहे. वीज बील १० दिवसात भरण्याबाबत हमीपत्रेही भरून घेण्यात येणार आहे. 

टॅग्स :Waterपाणी