शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

९३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 20:32 IST

चाळीसगाव तालुका : महावितरणचा वसुली करंट, बत्तीही गुल, १६ कोटींची थकबाकी

ठळक मुद्दे वीज ग्राहकांंना कुठूनही आॅनलाइन पद्धतीने वीज देयके भरण्याची सुविधा महावितरणने करून दिली आहे. मोबाइल अ‍ॅपसह ई- सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल, पोस्ट कार्यालयात ग्राहक देयके भरू शकतात. महावितरणचे ग्रामीण भागात सार्वजिक स्वरुपातील २९२ ग्राहक आहेत. याच ग्राहकांनी सार्वजनिक वीजदिव्यांचे नऊ कोटी ४० लाख ५२ हजार रुपये थकविले आहे. यात ३४ ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या ग्रामपंचायतीकडे एक कोटी ३६ लाख ५५ हजार एवढी थकबाकी आहे. ३४ गावगेल्या वर्षी खरीप हंगामात शेतक-यांची झोळी रिकामीच राहिली. कपाशीलाही भाव नसल्याने शेतक-यांच्या खिश्यात फारसे काही पडले नाही. बोंडआळीचा विळख्याने खरीपाचे कंबरडे मोडले गेले. रब्बीतही फारशी स्थिती चांगली नाही. कर्जमाफीचे गु-हाळही सुरुच असल्याने ग्रामपंचायतींन

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. १२ : चाळीसगाव तालुक्यात १९२ पैकी ९३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामीण भागातीलच २९२ सार्वजनिक ग्राहकांकडे ९ कोटी ४० लाख ५२ हजार थकबाकी झाल्याने त्यांचीही बत्ती गुल करण्यात आली आहे. महावितरणच्या वसुली करंटने ग्रामपंचायती हतबल झाल्या असून, पाणीपुरवठा व दिवाबत्तीची सोय कशी करायची, असा प्रश्न गाव कारभाºयांपुढे उभा राहिला आहे. ९३ पाणीपुरवठा योजनांकडे सहा कोटी ४० लाख ४० हजारांची थकबाकी आहे.महावितरणने वीजबील वसुली मोहीम सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून वसुली मोहीम तीव्र करताना गेल्या १२ दिवसांत ९३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला गेला. सोमवारीही काही योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.सप्टेंबर महिन्यात महावितरणने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांकडे असलेली थकबाकी भरण्यासाठी नोटीसा दिल्या होत्या. यानंतरही दोन वेळा वीज बिल भरण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यात १५ थकबाकीदारांनी चार लाख १० हजारांचा काहीअंशी भरणा केला. त्यामुळेच महावितरणने गेल्या १२ दिवसांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम अवलंबिली आहे. अजूनही ८४ पाणीपुरवठा योजनांकडे चार कोटी तीन लाख पाच हजार थकबाकी आहे. वीज दिवे आणि पाणीपुरवठा योजना मिळून १६ कोटी रुपये वसुलीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याचे हत्यार उपसले आहे.महावितरणतर्फे थकबाकीदारांना अगोदर सूचना दिल्या आहेत. सप्टेंबरपासून आम्ही जनजागृती करीत आहोत. ग्रामीण भागात वीजबिल भरण्याचे आवाहन करणारी वाहनेही फिरवली. १०० टक्के थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांनी थकबाकी भरावी. मार्च अखेरपर्यंत वसुली मोहीम सुरुच राहील.- नरेंद्र सोनवणेकार्यकारी अभियंता, महावितरण, चाळीसगावग्रामीण भागात कर वसुली करताना अनेक अडचणी येतात. १०० टक्के थकबाकी भरणे शक्य नाही. महावितरणने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. थकबाकीत टप्पे पाडून द्यावेत.- शांताराम चौधरीसरपंच, टाकळी प्र.चा., ता.चाळीसगावशेतकºयांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्याने कर वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामपंचायती आणि नागरिकांमध्ये संघर्ष होऊ शकतो. वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक तीव्र करू नये.- विकास चौधरी,सरपंच, वाघळी, ता.चाळीसगाव