शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

चाळीसगावच्या ‘सर्वोदय’च्या निवडणुकीत ८८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 22:35 IST

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एकवटले आहे.

चाळीसगाव : कोरोना महामारीत टाळेबंदी असताना न्यायालयाच्या आदेशान्वये उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एकवटले आहे. रविवारी १३ केंद्रांवर ८८ टक्के मतदान झाले. एकूण ४६८१ पैकी ४१२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया दुपारी ४ वाजता पार पडली. मातब्बरांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी उंबरखेडे येथेच मतमोजणी होणार आहे.गिरणा खोऱ्यात शिक्षण शाखा विस्तार असणाऱ्या सर्वोदयची स्थापना सहकारमहर्षी रामराव जिभाऊ पाटील यांनी केली होती. त्यांच्या नंतर दीर्घकाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदेसिंग पवार यांनी संस्थेवर नेतृत्व केले. संस्थेची बहुतांशी वेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. कै. पवार यांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने यावेळी चुरस निर्माण झाली होती.निवडणूक जाहीर झाल्यानंतर अक्रियाशील, क्रियाशील सभासदांचा वाद उफाळून आला. ६७० सभासदांचाही वाद थेट न्यायालयात पोहोचला. निवडणुकीचा आखाडा असा गाजत असतानाच कोरोनामुळे एका उमेदवाराचा मृत्यू झाला. निवडणूक महिनाभर लांबली. रविवारी शांततेत मतदान झाले.सुरक्षित अंतर पाळून मतदाननिवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी चोख नियोजन करीत कोरोना खबरदारी म्हणून सुरक्षित अंतर पाळून मतदानाची प्रक्रिया पार पाडली. सकाळी ८ वाजेपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या. प्रवेशव्दारावरच मतदारांचे तापमान मोजून मतदानासाठी सोडण्यात आले. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.१३ मतदान केंद्रे आणि झालेले मतदानउंबरखेडे येथे एकूण सहा मतदान केंद्रे होते. यात १५१३ मतदारांनी मतदान केले. सायगाव- ४६०, वरखेडे बु.- ४०३, धामणगाव- ३८१, कुंझर- ४५९, गुढे - ७२९, गुढे (खेडगाव)- १६० अशा १३ केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला१९ जागांसाठी मतदान झाले. ४५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दोन पॅनलमध्येच सरळ लढत झाली.संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पंडित पाटील, सचिव उदेसिंग मोहन पाटील, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र चुडामण पाटील, माजी पं.स. सदस्य व उंबरखेडेचे सरपंच केदारसिंग पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, चाळीसगावचे नगरसेवक भगवान पाटील आदी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.पहिला निकाल दुपारनंतरसर्वोदय शिक्षण संस्थेसाठी सोमवार, ३ मे रोजी सकाळी आठ वाजता उंबरखेडे येथीलच संस्थेच्या वसतिगृहातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिला निकाल दुपारनंतर लागेल. अगोदर राखीव मतदार संघातील निकाल लागतील. सर्वसाधारण मतदार संघासाठी सहा, तर राखीव मतदार संघासाठी चार असे १० टेबल मांडण्यात आले आहेत. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. २५ कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी दिली. 

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव