शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या ‘सर्वोदय’च्या निवडणुकीत ८८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 22:35 IST

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एकवटले आहे.

चाळीसगाव : कोरोना महामारीत टाळेबंदी असताना न्यायालयाच्या आदेशान्वये उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एकवटले आहे. रविवारी १३ केंद्रांवर ८८ टक्के मतदान झाले. एकूण ४६८१ पैकी ४१२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया दुपारी ४ वाजता पार पडली. मातब्बरांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी उंबरखेडे येथेच मतमोजणी होणार आहे.गिरणा खोऱ्यात शिक्षण शाखा विस्तार असणाऱ्या सर्वोदयची स्थापना सहकारमहर्षी रामराव जिभाऊ पाटील यांनी केली होती. त्यांच्या नंतर दीर्घकाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदेसिंग पवार यांनी संस्थेवर नेतृत्व केले. संस्थेची बहुतांशी वेळा निवडणूक बिनविरोध झाली आहे. कै. पवार यांच्या पश्चात पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने यावेळी चुरस निर्माण झाली होती.निवडणूक जाहीर झाल्यानंतर अक्रियाशील, क्रियाशील सभासदांचा वाद उफाळून आला. ६७० सभासदांचाही वाद थेट न्यायालयात पोहोचला. निवडणुकीचा आखाडा असा गाजत असतानाच कोरोनामुळे एका उमेदवाराचा मृत्यू झाला. निवडणूक महिनाभर लांबली. रविवारी शांततेत मतदान झाले.सुरक्षित अंतर पाळून मतदाननिवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी चोख नियोजन करीत कोरोना खबरदारी म्हणून सुरक्षित अंतर पाळून मतदानाची प्रक्रिया पार पाडली. सकाळी ८ वाजेपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या. प्रवेशव्दारावरच मतदारांचे तापमान मोजून मतदानासाठी सोडण्यात आले. सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.१३ मतदान केंद्रे आणि झालेले मतदानउंबरखेडे येथे एकूण सहा मतदान केंद्रे होते. यात १५१३ मतदारांनी मतदान केले. सायगाव- ४६०, वरखेडे बु.- ४०३, धामणगाव- ३८१, कुंझर- ४५९, गुढे - ७२९, गुढे (खेडगाव)- १६० अशा १३ केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला१९ जागांसाठी मतदान झाले. ४५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दोन पॅनलमध्येच सरळ लढत झाली.संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पंडित पाटील, सचिव उदेसिंग मोहन पाटील, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र चुडामण पाटील, माजी पं.स. सदस्य व उंबरखेडेचे सरपंच केदारसिंग पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, चाळीसगावचे नगरसेवक भगवान पाटील आदी मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.पहिला निकाल दुपारनंतरसर्वोदय शिक्षण संस्थेसाठी सोमवार, ३ मे रोजी सकाळी आठ वाजता उंबरखेडे येथीलच संस्थेच्या वसतिगृहातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिला निकाल दुपारनंतर लागेल. अगोदर राखीव मतदार संघातील निकाल लागतील. सर्वसाधारण मतदार संघासाठी सहा, तर राखीव मतदार संघासाठी चार असे १० टेबल मांडण्यात आले आहेत. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. २५ कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांनी दिली. 

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव