शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात ८० टक्के विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:24 IST

बंद पंपांचे सर्वेक्षण करून तात्पुरते बिल बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी

आडगाव, जि. जळगाव : मन्याड परिसरात अत्यल्प पावसामुळे नदी, नाले, बंधारे कोरडे पडले असून मन्याड धरणातही पाणी नसल्याने परिसरातील ८० टक्के विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाणीच नसल्याने कृषी पंप बंद असतानाही शेतकºयांना वीज बिल भरावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने सर्वेक्षण करून बिलाची योग्य आकारणी करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.भू-जलपातळी खालावलीयावर्षी मन्याड परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने पावसाळा संपलयानंरही परिसरातील नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्याच राहिल्याने तसेच मन्याड धरणदेखील कोरडेच आहे. त्यामुळे भू-जलपातळी खालावली असून परिसरातील जवळ-जवळ ८० टक्के विहिरींमध्ये पाणी नसल्याने त्यांनी तळ गाठला आहे.विहिरींमध्ये पाणीच नसल्याने जवळपास सर्व कृषी पंप बंदच असल्याची स्थिती आहे. काही पंप आक्टोबर ,नोंव्हेबरपासूनच बंद झाले तर काही पंप डिसेंबर, जानेवारीमध्ये फक्त साठवूण ठेवलेल्या विहिरीच्या पाण्यातून गुरांना पाणी पिण्यासाठी हाळ भरण्याचेच काम करत आहेत. महावितरणने या सर्व पंपाचे सर्वेक्षण करून बिल आकारावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अन्यथा बिलामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.२०१२मध्येही आक्टोबर, नोव्हेंबरपासून तर जून-जुलैपर्यंत जवळ जवळ ९ ते १० महिन्यांपर्यंत ५० टक्के शेतीपंप बंद असतानाही विज बिलाचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागला होता.चाराही धोक्यातमन्याड परिसरातील ज्या शेतकºयांच्या विहिरींना थोडेफार पाणी होते अशा शेतकºयांनी पशुधन जगविण्यासाठी चारा पिक म्हणून दादर, मक्याची लागवड केली होती. परंतु विहिरींच्या जलपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट झाल्याने सदर पिके करपून गेली आहेत. चारा, पाण्याअभावी पशुधन जगविण्यासाठी शेतकºयांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. येणारा उन्हाळा शेतकºयांसाठी कसोटीचाच ठरणार असल्याचे चित्र आहे.रब्बी हंगाम गायबसंपूर्ण परिीसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, नदी, नाले, बंधारे वाहून निघालेच नाही. त्यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने भूजलपातळी वाढलीच नाही. पाटाला व विहिरींना पाणीच नसल्याने रब्बीचा पेरा शेतकºयांना करता आला नाही. त्यामुळे परिसरात कुठेही गहू, हरबरा, भुईमूंग, सोयाबीनची पेरणी झालेली नाही. खरीपासह रब्बीचाही फटका बसल्याने मन्याड परिसरातील शेतकरी हवालदिली झाला आहे.चारा छावण्या उभाराव्यामन्याड परिसरात पाण्याची व चाºयाची बिकट परिस्थिती उद््भवल्याने या दोंन्ही गोष्टी विकतही मिळणे कठीण झाले आहे. जमिनीत पाणी नसल्याने नवीन विहिर किंवा कुपनलिका करूनदेखील उपयोग होत नाही. मग पाणी मिळणार तरी कुठून असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा आहे. दुसरीकडे परिसरात किंवा दुसºया तालुक्यात ज्यांच्याकडे चारा होता त्याने आधीच विकून टाकल्याने नवीन चारा पैसे देऊनही मिळत नाही. त्यामुळे शासनाने परिसरात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.फळ पिक वाचविण्यासाठी लाखो रुपये पाण्यातमन्याड परिसरात बहुतेक शेतकºयांनी पिक पध्दत बदल म्हणून कुणी डाळींब, लिंबू, पपई, मोसंबी यांची लागवड केली आहे. मात्र पाणीच नसल्याने काही शेतकºयांनी फळांची झाडे उपटून फेकले तर काही शेतकºयांनी डाळींबाचा बहर पाहता पाणी अपूरे पडू लागल्याने कुणी टँंकरने तर कुणी पाईपलाईन करून लाखो रुपये खर्च करून बाग जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.पुढे काय ?भीषण दुष्काळाला सामोरे जाताना शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव