शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात ८० टक्के विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:24 IST

बंद पंपांचे सर्वेक्षण करून तात्पुरते बिल बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी

आडगाव, जि. जळगाव : मन्याड परिसरात अत्यल्प पावसामुळे नदी, नाले, बंधारे कोरडे पडले असून मन्याड धरणातही पाणी नसल्याने परिसरातील ८० टक्के विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाणीच नसल्याने कृषी पंप बंद असतानाही शेतकºयांना वीज बिल भरावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने सर्वेक्षण करून बिलाची योग्य आकारणी करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.भू-जलपातळी खालावलीयावर्षी मन्याड परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने पावसाळा संपलयानंरही परिसरातील नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्याच राहिल्याने तसेच मन्याड धरणदेखील कोरडेच आहे. त्यामुळे भू-जलपातळी खालावली असून परिसरातील जवळ-जवळ ८० टक्के विहिरींमध्ये पाणी नसल्याने त्यांनी तळ गाठला आहे.विहिरींमध्ये पाणीच नसल्याने जवळपास सर्व कृषी पंप बंदच असल्याची स्थिती आहे. काही पंप आक्टोबर ,नोंव्हेबरपासूनच बंद झाले तर काही पंप डिसेंबर, जानेवारीमध्ये फक्त साठवूण ठेवलेल्या विहिरीच्या पाण्यातून गुरांना पाणी पिण्यासाठी हाळ भरण्याचेच काम करत आहेत. महावितरणने या सर्व पंपाचे सर्वेक्षण करून बिल आकारावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अन्यथा बिलामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.२०१२मध्येही आक्टोबर, नोव्हेंबरपासून तर जून-जुलैपर्यंत जवळ जवळ ९ ते १० महिन्यांपर्यंत ५० टक्के शेतीपंप बंद असतानाही विज बिलाचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागला होता.चाराही धोक्यातमन्याड परिसरातील ज्या शेतकºयांच्या विहिरींना थोडेफार पाणी होते अशा शेतकºयांनी पशुधन जगविण्यासाठी चारा पिक म्हणून दादर, मक्याची लागवड केली होती. परंतु विहिरींच्या जलपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट झाल्याने सदर पिके करपून गेली आहेत. चारा, पाण्याअभावी पशुधन जगविण्यासाठी शेतकºयांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. येणारा उन्हाळा शेतकºयांसाठी कसोटीचाच ठरणार असल्याचे चित्र आहे.रब्बी हंगाम गायबसंपूर्ण परिीसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, नदी, नाले, बंधारे वाहून निघालेच नाही. त्यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने भूजलपातळी वाढलीच नाही. पाटाला व विहिरींना पाणीच नसल्याने रब्बीचा पेरा शेतकºयांना करता आला नाही. त्यामुळे परिसरात कुठेही गहू, हरबरा, भुईमूंग, सोयाबीनची पेरणी झालेली नाही. खरीपासह रब्बीचाही फटका बसल्याने मन्याड परिसरातील शेतकरी हवालदिली झाला आहे.चारा छावण्या उभाराव्यामन्याड परिसरात पाण्याची व चाºयाची बिकट परिस्थिती उद््भवल्याने या दोंन्ही गोष्टी विकतही मिळणे कठीण झाले आहे. जमिनीत पाणी नसल्याने नवीन विहिर किंवा कुपनलिका करूनदेखील उपयोग होत नाही. मग पाणी मिळणार तरी कुठून असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा आहे. दुसरीकडे परिसरात किंवा दुसºया तालुक्यात ज्यांच्याकडे चारा होता त्याने आधीच विकून टाकल्याने नवीन चारा पैसे देऊनही मिळत नाही. त्यामुळे शासनाने परिसरात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.फळ पिक वाचविण्यासाठी लाखो रुपये पाण्यातमन्याड परिसरात बहुतेक शेतकºयांनी पिक पध्दत बदल म्हणून कुणी डाळींब, लिंबू, पपई, मोसंबी यांची लागवड केली आहे. मात्र पाणीच नसल्याने काही शेतकºयांनी फळांची झाडे उपटून फेकले तर काही शेतकºयांनी डाळींबाचा बहर पाहता पाणी अपूरे पडू लागल्याने कुणी टँंकरने तर कुणी पाईपलाईन करून लाखो रुपये खर्च करून बाग जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.पुढे काय ?भीषण दुष्काळाला सामोरे जाताना शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव