शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

८० टक्के शाळांनी पूर्ण केली गुणदानाचा टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST

जळगाव : शाळांनी इयत्ता दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची तारीख जवळ येत आहे. जवळपास जळगाव जिल्ह्यातील ...

जळगाव : शाळांनी इयत्ता दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची तारीख जवळ येत आहे. जवळपास जळगाव जिल्ह्यातील ८० टक्के शाळांनी गुणदानाची प्रक्रिया पूर्ण केली असून एक ते दोन दिवसात संपूर्ण प्रक्रिया शाळांची ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी दिली. दरम्यान, गुण सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सोपवण्यात आलेल्या कामकाजासाठी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे बोटावर मोजण्या इतका कालावधी उरला आहे. या उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुण, त्यासाठी मंडळाकडून आलेले संपूर्ण नियोजन पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी शिक्षकांनी त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू ठेवले आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागला आहे.

वेळेत काम पूर्ण होण्यासाठी धावपऴ़़

- दरम्यान, शाळांनी त्यांच्या स्तरावर गुणांचे विभाजन करून सूत्रांमध्ये बसवण्याचे काम सुरू आहे. परंतु, मनुष्यबळाचा अभाव, याच काळात विद्यार्थ्यांचे आॅनलाइन वर्ग घेणे या सर्वांत वेळ जात आहे. त्यामुळे निकालाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे़

- राज्यातील बहुतांश शाळांनी गुणदानासह इतर प्रक्रिया अद्याप पुर्ण केलेली नाही. त्यामुळे निकालाच्या कामासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

- यंदाचा निकाल कसा असेल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. तसेच निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण न केल्यास त्यास शाळा जबाबदार असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

-------

८० टक्के शाळांनी गुणदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ उर्वरित शाळांचे काम देखील लवकरचं पूर्ण होतील़ त्याबाबत सूचना देखील करण्यात आल्या आहेत़

- बी.जे.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी

------

दहावी विद्यार्थी संख्या

जळगाव : ५८३१७

धुळे : २८९५५

नंदुरबार : २११८३

-------

दहावीचा निकाल तयार झाला आहे़ आता बोर्डाच्या संकेतस्थळावर गुण भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे निकाल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही अडचण आली नाही.

- नारायण वाघ, शिक्षक