शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना माणिककुंज धरणाचे पाणी मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:28 IST

नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे.

ठळक मुद्देजनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे धावपावसाचे प्रमाण कमी असून, दुष्काळी परिस्थिती असल्याने या आठ गावांना प्रकल्पातील अतिरिक्त पाणी देण्यात यावेभारतीय नद्यांच्या पाणी वाटप धोरणाचा अभ्यास नसल्याने राजकीय मंडळींकडून विरोध

चाळीसगाव, जि.जळगाव : नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे.माणिकपुंज मध्यम प्रकल्प हा तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावाजवळ गिरणा नदीची उपनदी असलेल्या मन्याड नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे, करंजगाव, तांबोळे, चितेगाव, हातगाव, रोहिणी, शिंदी, ओठरे अशा आठ गावांना ६८५ हेक्टर क्षेत्रास फायदा होणार आहे. माणिकपुंज मध्यम प्रकल्पावर प्रथम नांदगाव तालुक्याचा हक्क असला तरी चाळीसगाव तालुक्यातील ही आठ गावे पर्जन्यछायेतील आहेत. येथे पावसाचे प्रमाण कमी असून, दुष्काळी परिस्थिती असल्याने या आठ गावांना प्रकल्पातील अतिरिक्त पाणी देण्यात यावे.चाळीसगाव तालुक्यात अतिरिक्त पाणी देण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन नांदगाव तालुक्यातील राजकीय मंडळींनी दिलेले आहे. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ तसेच दूरदूरदृष्टीचा अभाव आहे. भारतीय नद्यांच्या पाणी वाटप धोरणाचा अभ्यास नसल्याने त्यांनी विरोध दर्शविला आहे. परंतु मानवी दृष्टिकोनातून चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त, पर्जन्यछायेच्या अवकृपा असलेल्या प्रदेशाला अतिरिक्त पाणी माणिकपुंज मध्यम प्रकल्पातून देण्यात यावे. या संदर्भात आपण मानवी हित, शेती, पिण्याचे पाणी, तसेच पशुपक्ष्यांचादेखील विचार करून पाणी वाटप करावे अन्यथा चाळीसगाव तालुक्यातील आठ गावातील लोकांची जनआंदोलनामार्फत धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, करण्याच्या तयारीत आहेतच. या लोकांचा असंतोष वाढू नये असे वाटते, असे निवेदनात म्हटले आहे.या आशयाच्या प्रती मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्य सचिव मंत्रालय, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार चाळीसगाव यांना पाठविण्यात आले आहे.निवेदनावर प्रा.गौतम निकम, विजय शर्मा, आब्बा गुजर, योगेश्वर राठोड, विजय चौधरी, नाशीरभाई शेख, महेश चव्हाण यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव