शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना माणिककुंज धरणाचे पाणी मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:28 IST

नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे.

ठळक मुद्देजनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे धावपावसाचे प्रमाण कमी असून, दुष्काळी परिस्थिती असल्याने या आठ गावांना प्रकल्पातील अतिरिक्त पाणी देण्यात यावेभारतीय नद्यांच्या पाणी वाटप धोरणाचा अभ्यास नसल्याने राजकीय मंडळींकडून विरोध

चाळीसगाव, जि.जळगाव : नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे.माणिकपुंज मध्यम प्रकल्प हा तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावाजवळ गिरणा नदीची उपनदी असलेल्या मन्याड नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे, करंजगाव, तांबोळे, चितेगाव, हातगाव, रोहिणी, शिंदी, ओठरे अशा आठ गावांना ६८५ हेक्टर क्षेत्रास फायदा होणार आहे. माणिकपुंज मध्यम प्रकल्पावर प्रथम नांदगाव तालुक्याचा हक्क असला तरी चाळीसगाव तालुक्यातील ही आठ गावे पर्जन्यछायेतील आहेत. येथे पावसाचे प्रमाण कमी असून, दुष्काळी परिस्थिती असल्याने या आठ गावांना प्रकल्पातील अतिरिक्त पाणी देण्यात यावे.चाळीसगाव तालुक्यात अतिरिक्त पाणी देण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन नांदगाव तालुक्यातील राजकीय मंडळींनी दिलेले आहे. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ तसेच दूरदूरदृष्टीचा अभाव आहे. भारतीय नद्यांच्या पाणी वाटप धोरणाचा अभ्यास नसल्याने त्यांनी विरोध दर्शविला आहे. परंतु मानवी दृष्टिकोनातून चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त, पर्जन्यछायेच्या अवकृपा असलेल्या प्रदेशाला अतिरिक्त पाणी माणिकपुंज मध्यम प्रकल्पातून देण्यात यावे. या संदर्भात आपण मानवी हित, शेती, पिण्याचे पाणी, तसेच पशुपक्ष्यांचादेखील विचार करून पाणी वाटप करावे अन्यथा चाळीसगाव तालुक्यातील आठ गावातील लोकांची जनआंदोलनामार्फत धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, करण्याच्या तयारीत आहेतच. या लोकांचा असंतोष वाढू नये असे वाटते, असे निवेदनात म्हटले आहे.या आशयाच्या प्रती मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्य सचिव मंत्रालय, कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार चाळीसगाव यांना पाठविण्यात आले आहे.निवेदनावर प्रा.गौतम निकम, विजय शर्मा, आब्बा गुजर, योगेश्वर राठोड, विजय चौधरी, नाशीरभाई शेख, महेश चव्हाण यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव