शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

२३ गावातील ७५८ हेक्टरातील केळी उद्‌ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

दरम्यान, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून तौक्ते ...

दरम्यान, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून तौक्ते व यास वादळाच्या पार्श्वभूमीवर आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुषंगाने विशेष आर्थिक तरतूद करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त केले.

घोंघावत आलेल्या वादळासोबत ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन कोट्यवधींची अपरिमित हानी झाली. तर शेकडो घरांवरील टीनपत्रे उडून बेपत्ता झाल्याने तथा वीजखांब वा झाडे तथा झाडाच्या फांद्या पडून घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. त्या अनुषंगाने तलाठी व कृषी साहाय्यकांनी प्राथमिक आढावा घेऊन सादर केला असता, बाधित २३ गावातील ९४९ शेतकऱ्यांचे ७५८ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त झाल्याने ३० कोटी ३० लाख ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी. भामरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी एम.जी.भामरे, भाजप उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पं.स. सदस्य जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, प्रल्हाद पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे यांच्यासमवेत आपद्ग्रस्त केळी बागांची पाहणी केली.

तौक्ते वा यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोकणातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुषंगाने नुकसान भरपाई अदा करावी व विमा कंपन्यांनी जिओ टॅगिंगची क्लिष्टता बाजूला ठेवून शासकीय पंचनामे गृहीत धरून संरक्षित विम्याची रक्कम तातडीने अदा करावी यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून पाठपुरावा करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

२४ तासांत २५ गावांचा वीजपुरवठा सुरळीत

तापीकाठच्या ऐनपूर व खिर्डी तथा खानापूर व मोरगाव वीज उपकेंद्रातील तब्बल २७ गावातील वीजपुरवठा गुरुवारी झालेल्या वादळी पावसात रात्रभर खंडित झाला होता. सकाळी मोरगाव व खानापूर वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या खानापूर, चोरवड, अजनाड, निरूळ, पाडळे, अटवाडे, दोधे, नेहता, मोरगाव, खिरवड या १० गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी सुरळीत झाला, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी दिली. उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्यांचे १०० वीजखांब तुटून, वाकून वा कोलमडून तर चार वीज ट्रान्स्फॉर्मर जमीनदोस्त होऊन महावितरणची अपरिमित हानी झाली आहे. कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कंत्राटी मजूर, ४० वीज कर्मचारी, चार सहाय्यक अभियंता व स्वतः उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे.