शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

२३ गावातील ७५८ हेक्टरातील केळी उद्‌ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

दरम्यान, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून तौक्ते ...

दरम्यान, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून तौक्ते व यास वादळाच्या पार्श्वभूमीवर आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुषंगाने विशेष आर्थिक तरतूद करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वस्त केले.

घोंघावत आलेल्या वादळासोबत ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त होऊन कोट्यवधींची अपरिमित हानी झाली. तर शेकडो घरांवरील टीनपत्रे उडून बेपत्ता झाल्याने तथा वीजखांब वा झाडे तथा झाडाच्या फांद्या पडून घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. त्या अनुषंगाने तलाठी व कृषी साहाय्यकांनी प्राथमिक आढावा घेऊन सादर केला असता, बाधित २३ गावातील ९४९ शेतकऱ्यांचे ७५८ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त झाल्याने ३० कोटी ३० लाख ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी. भामरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी एम.जी.भामरे, भाजप उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे संपर्कप्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पं.स. सदस्य जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, प्रल्हाद पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे यांच्यासमवेत आपद्ग्रस्त केळी बागांची पाहणी केली.

तौक्ते वा यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोकणातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुषंगाने नुकसान भरपाई अदा करावी व विमा कंपन्यांनी जिओ टॅगिंगची क्लिष्टता बाजूला ठेवून शासकीय पंचनामे गृहीत धरून संरक्षित विम्याची रक्कम तातडीने अदा करावी यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून पाठपुरावा करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

२४ तासांत २५ गावांचा वीजपुरवठा सुरळीत

तापीकाठच्या ऐनपूर व खिर्डी तथा खानापूर व मोरगाव वीज उपकेंद्रातील तब्बल २७ गावातील वीजपुरवठा गुरुवारी झालेल्या वादळी पावसात रात्रभर खंडित झाला होता. सकाळी मोरगाव व खानापूर वीज उपकेंद्रांतर्गत असलेल्या खानापूर, चोरवड, अजनाड, निरूळ, पाडळे, अटवाडे, दोधे, नेहता, मोरगाव, खिरवड या १० गावांचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी सुरळीत झाला, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी दिली. उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्यांचे १०० वीजखांब तुटून, वाकून वा कोलमडून तर चार वीज ट्रान्स्फॉर्मर जमीनदोस्त होऊन महावितरणची अपरिमित हानी झाली आहे. कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कंत्राटी मजूर, ४० वीज कर्मचारी, चार सहाय्यक अभियंता व स्वतः उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे.