शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

खान्देशात ७५० वर प्राध्यापकांच्या जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : खान्देशातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ७५० च्यावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमुळे ...

जळगाव : खान्देशातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल ७५० च्यावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमुळे महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. मागील वर्षी नोकरभरतीला स्थगिती देण्यात आल्यामुळे प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांच्या रोजगारावर आधीच कुऱ्हाड कोसळली आहे. आता तरी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी प्राध्यापक भरतीचा मुहूर्त काढावा, अशी मागणी होत आहे.

प्राध्यापकांच्या हजारो जागा महाविद्यालये व विद्यापीठात रिक्त असल्यामुळे काही वर्षांपूर्वी राज्यात प्राध्यापक भरती व्हावी म्हणून काही नेट, सेट पात्रताधारकांकडून आंदोलन-उपोषणे केली गेली होती. त्यानंतर महापदभरती घेण्यात येणार असे सांगण्यात आले होते़ पदभरतीला सुरुवातही झाली. पण, कोरोनाचे संकट आल्यानंतर कुठलीही नवीन नोकर भरती होणार नाही असे शासनाचे पत्र मे २०२० मध्ये धडकले. नंतर कुठलेही शासनाचे पत्र न आल्यामुळे अद्याप ही स्थगिती कायम असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ८३ अनुदानित महाविद्यालये आहे़ सध्या चार हजाराच्यावर प्राध्यापक कार्यरत आहेत. पण, अजूनही ७५० च्यावर प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. भरतीबाबत उच्च शिक्षण विभागाकडून कुठल्याही हालचाली नसल्यामुळे विद्यार्थी इतर क्षेत्राकडे वळत आहेत. परंतु, काही विद्यार्थी अजूनही भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.

५७ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य

खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांमधील ५७ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य कार्यरत आहेत़ दरम्यान, २६ महाविद्यालयांमध्ये अजूनही प्राचार्य पदाच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालयात प्रभारी राज सुरू आहे. परिणामी, रिक्त जागांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सन २०१८-१९ मध्ये काही प्रमाणात प्राध्यापकांच्या जागा संस्थास्तरावर भरण्यात आल्या होत्या. त्यानंतर लोकसभा, विधानसभेच्या आंचारसंहिता, कोरोना यासह विविध कारणांनी महापदभरतीला अडथळे निर्माण होत होते. शेवटी स्थगिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

घ्यावे लागते नाहरकत प्रमाणपत्र

महाविद्यालयांना पदभरती करण्याआधी नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. नंतर विद्यापीठाकडून जाहिरात प्रसिध्द होते़ शेवटी महाविद्यालयात मुलाखत घेऊन भरती केली जाते. पण, सध्या प्राध्यापक भरतीला कोरोनाचे कारण देऊन खो देण्यात आला असल्यामुळे ही पदभरती कधी होणार, असा प्रश्न आता नेट, सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून होत आहे.