शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 19:09 IST

रावेर तालुक्यात गेल्या बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे २५ गावातील ९८२ शेतकऱ्यांच्या ११३७ हेक्टरवरील केळी बागांचे सुमारे ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे धिम्या गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देतालुक्यात लागोपाठ वादळाच्या तडाख्याने केळी मातीमोल९८२ शेतकºयांच्या ११३७ हेक्टरवरील केळीचे नुकसानऐन कापणीवर आलेली केळी उद्ध्वस्त

लोकमत आॅनलाईनरावेर, दि.९ : तालुक्यात वादळी पावसामुळे केळी बागांचे सुमारे ७५ कोटींचे नुकसान झाल्याचा तालुका प्रशासनाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम मात्र धिम्या गतीने सुरू असल्याने आपद्ग्रस्त शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्यातील अजनाड, अटवाडे, दोधे, नेहते, खिरवड, विटवे, ऐनपूर, निंभोरा,खिर्डी, दसनूर,सिंगनूर, मस्कावद, आंदलवाडी, वाघोदा, सावदा, जिन्सी, आभोडा, मोरव्हाल, मंगरूळ, मांगी-चुनवाडे, रायपूर, अजंदे, नांदूरखेडा आदी २५ गावात बुधवारी वादळी पाऊस व गारपिटीने दिलेल्या तडाख्यात ९८२ शेतकºयांची ११३७ हेक्टरमधील केळी मातीमोल झाल्याने ७५.७९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालात वर्तविला आहे.दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांनी व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बाधित क्षेत्राची नुकतीच पाहणी केली.त्या गावांचे पंचनामे अपूर्णचदरम्यान, तालुक्यातील निरूळ, पाडळे बु, पाडळे खुर्द परिसरातील १३ गावांना शुक्रवारी वादळी पावसाने तडाखा दिल्याने तेथील नुकसानीचे पंचनामे अद्यापही अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पंचनामे पूर्णत्वास येतील अशी आश्वासने प्रशासनाने दिल्यानंतरही महसूल व कृषी विभागाच्या संथगतीने चाललेल्या कारभाराचा बुरखा पुन्हा फाटला.वादळामुळे सावदा, थोरगव्हाण, कोचूर शिवारातील ४१ शेतकºयांचे २३ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त होवून १ कोटी ५१ लाख ८० हजार रुपयांचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी व महसूल विभाग जिल्हा प्रशासनाकडे सादर करीत नाहीत, तोच मंगळवारी सायंकाळी मध्यप्रदेशाकडून तालूक्यातील पूर्व भागातून शिरकाव करीत तापीकाठावर वादळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसला. ऐन कापणीवरील केळीच्या उत्पादनाचा तोंडी आलेला घास हिरावून घेत नैसर्गिक आपत्तीमुळे अपरिमित हानी झाली. घरावरील टीनपत्र्यांचे छत उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांच्यावर संकट उभे ठाकले आहे. अजनाड येथे काहींच्या घरावर वृक्ष पडल्याने त्यांचे संसारोपयोगी वस्तू दाबल्या गेल्या. बहूतांशी ठिकाणी विजेचे खांब कोसळून व तारा तुटून पडल्याने रात्रभर गावे अंधारात होती बºहाणपूर- अंकलेश्वर राज्य महामार्गावर चोरवड येथील मध्य प्रदेशातील सीमा ते बºहाणपूर दरम्यान ३० ते ३५ झाडे उन्मळून पडल्याने तब्बल ४ तास १३ किलोमीटर अंतरापर्यंत दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान, गुरूवारी दुपारपर्यंत महसूल व कृषी प्रशासनाने २५ गावात वादळी पाऊस व गारपिटीने बुधवारी दिलेल्या तडाख्यात ९८२ शेतकºयांचे ११३७ हेक्टरमधील केळी मातीमोल झाल्याने ७५.७९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस