शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

जळगावात दीड वर्षात रस्ते अपघातात 657 जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 4, 2017 11:24 IST

1 हजार 417 अपघात : सायबर गुन्हे, महिला सक्षमीकरण व अपघाताबाबत जनजागृती

 ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.4 - जिल्ह्यात दीड वर्षात 1 हजार 417 अपघात झाले असून त्यात 657 जणांचा मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू हे 20 ते 50 या वयोगटातील पुरुषांचाच झालेला आहे. सरासरी दिवसाला 5 अपघात होतात व त्यात दोन जणांचा मृत्यू होतो. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. हे अपघात रोखण्यासाठी तसेच सायबर गुन्हे व महिला सक्षमीकरणासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार असून त्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.
शहरातील महाविद्यालय व विद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक व विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसाठी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात सोमवारी जनजागृती परिसंवाद झाला. 
कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी  (गृह) आदी व्यासपीठावर होते. दीपप्रज्वालनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी व सुरक्षा रक्षकांना पोलीस मित्र बनवा
अपर्णा मकासरे, पंकज ठाकूर, राजेंद्र वाघोदे, अमोल बाविस्कर, पीतांबर भावसार, यजुर्वेद्र महाजन, पत्रकार शेखर पाटील, अॅड. सूरज जहांगीर, डॉ. बोरकर यांच्यासह अनेक जणांनी चर्चेत सहभाग घेतला. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सायबर क्राईमला फाईट देण्यासाठी सायबर क्लब स्थापन करण्याची घोषणी केली.
कायदा पाळला तर घटनांना आळा
 अनेक जण वाहने हौस व गरज म्हणून वापरतात. कमी वयात विद्याथ्र्याच्या हातात वाहने दिली जातात. मात्र कायद्याचे पालन केले जात नाही. 
केवळ पोलिसांवर जबाबदारी टाकून मोकळे होणे चालणार नाही. कायदा पाळला तर अनेक गंभीर घटना टळतील. प्राचार्य व मुख्याध्यापकांनी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. पाटील यांनी केले.