शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

629 सहकारी संस्था गायब

By admin | Updated: October 6, 2015 00:47 IST

सर्वेक्षण पूर्ण : 100 संस्थांना बजावली नोटीस

जळगाव : सहकार विभागाने केलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचा धक्कादायक अहवाल हाती आला असून थोडय़ा नव्हे तर तब्बल 629 संस्था गायब असल्याचे समोर आले आहे. या संस्थांना आता अवसायनात काढण्याची नोटीस सहकार विभागाकडून बजावण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, 100 संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून नऊ संस्थांवर अवसायनाची कारवाई सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची गेल्या आठ ते दहा वर्षापासून दैना झाली आहे. अनेक संस्थांनी ठेवीदारांना भरमसाट व्याजाचे आमिष दाखवून त्यांची लूट केली. हजार कोटींच्या वर ठेवीच्या रकमा या पतसंस्थांकडे अडकलेल्या आहेत. यात अनेकांवर गुन्हेही दाखल झाले, तर काही जणांना अटकही झाली. मात्र ठेवीदारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळू शकलेला नाही. या विरुद्ध ठेवीदार संघटनांच्या नेतृत्वाखाली सतत आंदोलनेही सुरू असतात. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नसल्याचीच प्रचिती येत आहे.

तीन महिने चालले सर्वेक्षण

सहकारी पतसंस्थांसह अन्य संस्थांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाने एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून संस्थांच्या सर्वेक्षणाचे आदेश केले होते. 1 जुलैपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. तब्बल तीन महिने हे कामकाज सुरू होते. सहकार विभाग व लेखापरीक्षक विभागाची खास पथके यासाठी नियुक्त करण्यात आली होती. 144 कर्मचारी, अधिका:यांनी हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले.

548 संस्था कागदावर

सहकार विभागाकडील माहितीनुसार जिल्ह्यात तीन हजार 912 सहकारी संस्थांची नोंदणी झालेली आहे. प्राप्त अहवालानुसार 548 संस्थांचे व्यवहार हे कागदोपत्री झाले असल्याचे लक्षात आले.

81 संस्था या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आल्या नाहीत. या संस्थांचे पुनरुज्जीवन होऊ शकते काय? हे तपासून पाहण्यासाठी या 629 संस्थांना अवसायनाची नोटीस बजावली जाणार आहे.

नोटीस बजावून या संस्थांचे प्रतिनिधी हजर झाल्यास त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. आतार्पयत 100 संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर नऊ संस्था अवसायनात घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.