शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आठवडाभरात जीएमसीत ६० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST

रुग्णसंख्या घटतेय, मात्र मृत्यू थांबेना : जिल्ह्यात झाले एकूण ८८ मृत्यू , अन्य ठिकाणचा भार पुन्हा जीएमसीवर? लोकमत न्यूज ...

रुग्णसंख्या घटतेय, मात्र मृत्यू थांबेना : जिल्ह्यात झाले एकूण ८८ मृत्यू , अन्य ठिकाणचा भार पुन्हा जीएमसीवर?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरात काेरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचे, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिलासादायक चित्र असले, तरी नियमित होणारे मृत्यू मात्र थांबतच नसून, गेल्या आठवडाभरात जिल्हाभरात एकूण मृत्यूची संख्या ही ८८ आहे. यातील ६० मृत्यू हे जीएमसीत झाले असून, अन्यत्र २८ मृत्यूची नोंद आहे.

यात आठवडाभरातील तीन दिवस जिल्हाभरात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच मृत्यू झाले आहेत. या ठिकाणी ६० मृत्यू झाले असून ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांचा भार पुन्हा जीएमसीवर येतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, ती थांबलेली नसून, सर्वत्रच असे चित्र असल्याचे सांगितले जाते.

लाट ओसरत असताना मृत्युदर मात्र वाढला

एकत्रित जिल्ह्याची स्थिती बघता कोरोना हा अगदी पीकवर असतानाही मृत्युदर १.७८ किंवा १.७९ टक्के होता. मात्र, आता तो वाढून १.८० टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण कमी होत असले तरी होणारे मृत्यू हे त्या मानाने कमी होत नसल्याने हा मृत्युदर कमी होण्याऐवजी काही अंशांनी वाढला आहे. त्यामुळे यंत्रणेपुढे असे मृत्यू थांबविणे हे आव्हान कायम आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने गेल्या महिनाभरापूर्वी दिवसाला २० ते २४ मृत्यू होत होते, हेच प्रमाण आता ९ वर पोहोचले आहेत.

जीएमसीत झालेले मृत्यू

१६ मे १०

१७ मे १०

१८ मे ११

१९ मे ७

२० मे ०२

२१ मे ०२

२२ मे ०९

२३ मे ०७

२४ मे ०२

असा होता आठवडा

१७ मे रोजी जिल्ह्यात १० मृत्यूची नोंद होती, ते १० मृत्यू जीएमसीतच झालेले होते. यासह १८ व २२ मे रोजी जिल्ह्यातील सर्व मृत्यूची नोंद ही जीएमसीतच होती. कोरोनाची रुग्णसंख्या घटत असताना अन्य ठिकाणी रुग्णांची संख्या जीएमसीच्या मानाने कमी आहे. अधिक रुग्ण शिवाय गंभीर रुग्ण हे जीएमसीतच दाखल असल्याने या ठिकाणचे मृत्यू अन्य ठिकाणापेक्षा अधिकच असतील, असेही सांगितले जात आहे.

कोट

आलेख जसा जसा कमी होतो, तसे गंभीर रुग्णांचे जीएमसीत येण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे या ठिकाणी अधिक मृत्यू दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक असून, सद्य:स्थितीत ४० टक्के बेड हे रिक्त आहेत. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता

कमी वयाचे मृत्यू घटले

मृत्यू थांबले नसले तरी ते कमी झाले आहेत. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे ५० वर्षांखालील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. भुसावळ येथील एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू या आठवड्यात नोंदविण्यात आला आहे. मध्यंतरीच्या काळात ४० वर्षांखालील वयोगटांमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे एक भीतीदायक वातावरण होते. शिवाय या वयोगटातच रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही त्यावेळी वाढलेले होते. मात्र, गेल्या आठवडाभराचे चित्र बघता या वयोगटाचे मृत्यू घटले आहेत, शिवाय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही कमी आहे.