शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

आठवडाभरात जीएमसीत ६० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST

रुग्णसंख्या घटतेय, मात्र मृत्यू थांबेना : जिल्ह्यात झाले एकूण ८८ मृत्यू , अन्य ठिकाणचा भार पुन्हा जीएमसीवर? लोकमत न्यूज ...

रुग्णसंख्या घटतेय, मात्र मृत्यू थांबेना : जिल्ह्यात झाले एकूण ८८ मृत्यू , अन्य ठिकाणचा भार पुन्हा जीएमसीवर?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरात काेरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचे, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिलासादायक चित्र असले, तरी नियमित होणारे मृत्यू मात्र थांबतच नसून, गेल्या आठवडाभरात जिल्हाभरात एकूण मृत्यूची संख्या ही ८८ आहे. यातील ६० मृत्यू हे जीएमसीत झाले असून, अन्यत्र २८ मृत्यूची नोंद आहे.

यात आठवडाभरातील तीन दिवस जिल्हाभरात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच मृत्यू झाले आहेत. या ठिकाणी ६० मृत्यू झाले असून ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांचा भार पुन्हा जीएमसीवर येतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतांची संख्या कमी झालेली आहे. मात्र, ती थांबलेली नसून, सर्वत्रच असे चित्र असल्याचे सांगितले जाते.

लाट ओसरत असताना मृत्युदर मात्र वाढला

एकत्रित जिल्ह्याची स्थिती बघता कोरोना हा अगदी पीकवर असतानाही मृत्युदर १.७८ किंवा १.७९ टक्के होता. मात्र, आता तो वाढून १.८० टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण कमी होत असले तरी होणारे मृत्यू हे त्या मानाने कमी होत नसल्याने हा मृत्युदर कमी होण्याऐवजी काही अंशांनी वाढला आहे. त्यामुळे यंत्रणेपुढे असे मृत्यू थांबविणे हे आव्हान कायम आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने गेल्या महिनाभरापूर्वी दिवसाला २० ते २४ मृत्यू होत होते, हेच प्रमाण आता ९ वर पोहोचले आहेत.

जीएमसीत झालेले मृत्यू

१६ मे १०

१७ मे १०

१८ मे ११

१९ मे ७

२० मे ०२

२१ मे ०२

२२ मे ०९

२३ मे ०७

२४ मे ०२

असा होता आठवडा

१७ मे रोजी जिल्ह्यात १० मृत्यूची नोंद होती, ते १० मृत्यू जीएमसीतच झालेले होते. यासह १८ व २२ मे रोजी जिल्ह्यातील सर्व मृत्यूची नोंद ही जीएमसीतच होती. कोरोनाची रुग्णसंख्या घटत असताना अन्य ठिकाणी रुग्णांची संख्या जीएमसीच्या मानाने कमी आहे. अधिक रुग्ण शिवाय गंभीर रुग्ण हे जीएमसीतच दाखल असल्याने या ठिकाणचे मृत्यू अन्य ठिकाणापेक्षा अधिकच असतील, असेही सांगितले जात आहे.

कोट

आलेख जसा जसा कमी होतो, तसे गंभीर रुग्णांचे जीएमसीत येण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे या ठिकाणी अधिक मृत्यू दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक असून, सद्य:स्थितीत ४० टक्के बेड हे रिक्त आहेत. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता

कमी वयाचे मृत्यू घटले

मृत्यू थांबले नसले तरी ते कमी झाले आहेत. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे ५० वर्षांखालील मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. भुसावळ येथील एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू या आठवड्यात नोंदविण्यात आला आहे. मध्यंतरीच्या काळात ४० वर्षांखालील वयोगटांमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे एक भीतीदायक वातावरण होते. शिवाय या वयोगटातच रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही त्यावेळी वाढलेले होते. मात्र, गेल्या आठवडाभराचे चित्र बघता या वयोगटाचे मृत्यू घटले आहेत, शिवाय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही कमी आहे.