शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

चटई उद्योगाने सोसलेय ६० टक्के नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकेकाळी जळगावातील चटई उद्योग हा जगभरात प्रसिद्ध होता. त्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकेकाळी जळगावातील चटई उद्योग हा जगभरात प्रसिद्ध होता. त्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील होत होती. मात्र मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि सरत्या आर्थिक वर्षात या उद्योगाने मोठे नुकसान सोसले आहे. एप्रिल २० ते मार्च २१ या काळात चटई उद्योगाला जवळपास ६० टक्के म्हणजे १०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले एप्रिल ते जून या काळात सर्वच उद्योगदेखील बंद होते. जळगाव औद्योगिक वसाहतीतील सर्व चटई उद्योगांना या काळात कुलूप लागले होते. मात्र जुलैपासून परिस्थिती निवळायला लागली. तरीही गावी गेलेले कामगार लवकर न परतणे, तीन महिन्यांत झालेल्या नुकसानातून बाहेर येण्याची कसरत अशा अनेक अडचणींना या उद्योजकांना सामोरे जावे लागले.

अखेर नोव्हेंबर महिन्यात काहीशी आशा दिसू लागली. बहुतांशी उद्योग नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत ७० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने चालले आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. त्यात जळगाव शहरातील या उद्योगांनादेखील मोठा फटका बसला आहे. कडक निर्बंधात उद्योग चालवणे अडचणीचे होऊन बसले आहे.

जळगाव औद्योगिक वसाहतीत असलेले बहुतेक उद्योग हे पुनर्वापरातून तयार झालेल्या प्लॅस्टिक कच्चा मालातून चटई तयार करतात. लॉकडाऊनच्या काळात किंवा नंतर वर्षभरात रिसायकलिंगसाठी प्लॅस्टिकच मिळत नव्हते. त्यामुळे कच्चा मालाची किंमत वाढली. वाढलेल्या किमतीमुळे चटईची किंमतदेखील वाढली मात्र त्या प्रमाणात त्याची विक्रीदेखील होत नव्हती.

जगभरात जाते जळगावची चटई

जळगावमध्ये तयार होणारी चटई ही जगभरात जाते. सध्या शहरात सर्वच प्रकारची चटई बनवणारे कारखाने आहेत. त्यात स्थानिक पातळीवर स्वस्त चटई विक्रीसाठी तयार केली जाते, तर उत्तम दर्जाची चटई युरोप, अमेरिका, मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये जाते. मात्र निर्यातीचा हा व्यवसायदेखील गेल्या काही महिन्यांमध्ये थंडावला आहे.

जळगाव शहरातील चटई उद्योग १५०

झालेले नुकसान १०० कोटी

झालेल्या नुकसानीची टक्केवारी (अंदाजित) ६० टक्के

कोट - जळगावातील चटई उद्योगाला गेल्या काही महिन्यांपासून घरघर लागली आहे. आम्हाला वर्षभरात फक्त तीनच महिने व्यवसाय करण्यास चांगल्या पद्धतीने मिळाले. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात ७० टक्के क्षमतेने कारखाने चालले. मात्र पुन्हा एकदा निर्बंध येत आहेत. वर्षभरात चटई उद्योगाला ६० टक्क्यांच्या वर नुकसान सोसावे लागले आहे.