शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:07 IST

५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार असून, टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसºया क्रमांकावर असल्याचे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ज्ञ प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदूरसंचार दिनानिमित्त कार्यशाळाटेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर

भुसावळ, जि.जळगाव : ५ जी-नवीन तंत्रज्ञान बदल घडवणार असून, टेलिकॉमच्या क्षेत्रात भारत दुसºया क्रमांकावर असल्याचे मत कम्युनिकेशन विषयाचे शिक्षक व प्रोसेसर तज्ज्ञ प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले.शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड टेलिकॉम विभागात शनिवारी आयोजित ५ जी तंत्रज्ञानावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.टेलिकॉमचा कल्पनातीत वेग चक्रावून टाकणारा आहे. शिवाय हा वेग प्रत्येक दशकात किंबहुना प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे. पूर्वी एखादा बदल होण्यास १० वर्षे लागत असतील तर तोच बदल आता १ वर्षांत होतो. स्मार्टफोनसारखी सुविधा त्यांनी अतिशय कमी काळात आत्मसात केली आहे. जगात टेलिकॉमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार भारताने केला आहे. त्याचप्रमाणे टेलिकॉम क्षेत्राला लागणाºया पायाभूत सुविधा येथे इतर देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच भारत हा टेलिकॉमच्या क्षेत्रात चीन नंतर दुसºया क्रमांकावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी फोन्समध्ये वापरल्या जाणाºया ५ जी तंत्रज्ञानचा एक भाग क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरवर मार्गदर्शन केले, तर नवीन तंत्रज्ञानामुळे होणारे बदल व फायदे प्रा.गजानन पाटील यांनी सांगितले.दोन सत्रात चाललेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागातील विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील, नितीन पांगळे ह्या आठ तज्ञ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.नवीन तंत्रज्ञानाचे फायदे : प्रा.गजानन पाटीलटेलिकॉम क्षेत्राने लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आणले आहे. आता छोट्या गावातील व्यापाºयाचे जगभर ग्राहक आहेत आणि ते आॅनलाइन उत्पादनांची विक्री करीत आहेत. छोट्या गावातील लोक विशेषत: ब्रॅण्डच्या गुणवत्ता उत्पादनांचे आॅर्डर करू शकतात जे त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध नाहीत. अगदी लहान व्यापारी, हस्तकला व्यापारी, स्थानिक सेवा प्रदाते स्वत:साठी, बाजार शोधण्यासाठी व्हॉट्सअप, हाइक, फेसबूक इत्यादी मोबाइलचा वापर वापरतात. या नवीन तंत्रज्ञानामुळे ई-कॉमर्स, बीपीओ आणि व्यवसाय संधी वाढविण्यासारख्या उद्योगांच्या निर्मितीत वेगाने वाढ होईल.महामार्ग, सर्वत्र मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट प्रवेश कार्यक्रम, ई-शासन, ई-क्रांती (ज्याचा उद्देश इलेक्ट्रॉनिक सेवा देण्यासाठी आहे), सर्व माहिती क्षणात उपलब्ध होईल व या सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील, अशी माहिती प्रा.गजानन पाटील यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ