शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 19:27 IST

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ साचल्याचे ‘मेरी’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे महत्वाच्या प्रकल्पावर ओढवली परिस्थिती ‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर

आॅनलाईन लोकमतवरणगाव, ता. भुसावळ, दि.२ : जळगाव जिल्हयातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ‘मेरी’ या संस्थेने मार्च २०१७ साली केलेल्या सर्वेक्षणात धरणाच्या साठवण क्षमतेच्या निम्म्यापेक्षा अधिक भाग गाळाने व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे.‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार हतनूर प्रकल्प उभारणीपासून गेल्या ३५ वर्षात धरणात ५४ .४५ टक्के गाळ जीवंत पाणी साठ्यात गोळा झाला आहे . यापूर्वी ‘मेरी’ने २००७ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार त्या वेळी धरणातील मृत पाणीसाठ्यात ८१ टक्के गाळ साचला होता. वेळीच धरणातील गाळ उपसला गेला असता तर आज ही वेळ आली नसती असे जाणकाराचे मत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यातील एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पावर ही परिस्थिती ओढवली आहे. हतनूर धरणाची ३८८ दश लक्ष घनमिटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यात २०८ दशलक्ष घनमिटर गाळ साचल्याने प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर आली आहे., आणि तीच मोठी भविष्याच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.कृषी सिंचनावर परिणामसातत्याने धरणात गाळ साचत राहिल्याने त्याचा फटका कृषी सिंचनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. धरण उभारणीपासून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनाकरिता ७० दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून तापी नदी व कालव्याव्दारे सोडले जात असे. परंतु ते कमी होवून फक्त रब्बी हंगामासाठी १८ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सिंचनास पाणी मिळत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. तर धरणातून (औद्योगिक पुरवठा ) बिगर सिंचनाकरिता ९४ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते. अशीच परिस्थिती राहिल्यास जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्हयात कृषी सिंचन व उद्योगावर दुष्परिणाम होईल.खर्चाची मोठी डोकेदुखीजाणकारांच्या मते आता धरणालील गाळ काढण्याकरिता येणाºया खर्चात नविन प्रकल्प उभा राहिल. एवढा यावर पैसा खर्च होईल.

टॅग्स :Damधरण