शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 19:27 IST

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ साचल्याचे ‘मेरी’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे महत्वाच्या प्रकल्पावर ओढवली परिस्थिती ‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर

आॅनलाईन लोकमतवरणगाव, ता. भुसावळ, दि.२ : जळगाव जिल्हयातील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ‘मेरी’ या संस्थेने मार्च २०१७ साली केलेल्या सर्वेक्षणात धरणाच्या साठवण क्षमतेच्या निम्म्यापेक्षा अधिक भाग गाळाने व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे.‘मेरी’ या संस्थेतर्फे दूरसंवेधी यंत्रणेव्दारे (सॅटेलाईट) हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच जलसंपदा विभागाला प्राप्त झाला आहे. त्या अहवालानुसार हतनूर प्रकल्प उभारणीपासून गेल्या ३५ वर्षात धरणात ५४ .४५ टक्के गाळ जीवंत पाणी साठ्यात गोळा झाला आहे . यापूर्वी ‘मेरी’ने २००७ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार त्या वेळी धरणातील मृत पाणीसाठ्यात ८१ टक्के गाळ साचला होता. वेळीच धरणातील गाळ उपसला गेला असता तर आज ही वेळ आली नसती असे जाणकाराचे मत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यातील एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पावर ही परिस्थिती ओढवली आहे. हतनूर धरणाची ३८८ दश लक्ष घनमिटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यात २०८ दशलक्ष घनमिटर गाळ साचल्याने प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही केवळ १८० दशलक्ष घनमीटरवर आली आहे., आणि तीच मोठी भविष्याच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.कृषी सिंचनावर परिणामसातत्याने धरणात गाळ साचत राहिल्याने त्याचा फटका कृषी सिंचनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. धरण उभारणीपासून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनाकरिता ७० दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून तापी नदी व कालव्याव्दारे सोडले जात असे. परंतु ते कमी होवून फक्त रब्बी हंगामासाठी १८ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सिंचनास पाणी मिळत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. तर धरणातून (औद्योगिक पुरवठा ) बिगर सिंचनाकरिता ९४ दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते. अशीच परिस्थिती राहिल्यास जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्हयात कृषी सिंचन व उद्योगावर दुष्परिणाम होईल.खर्चाची मोठी डोकेदुखीजाणकारांच्या मते आता धरणालील गाळ काढण्याकरिता येणाºया खर्चात नविन प्रकल्प उभा राहिल. एवढा यावर पैसा खर्च होईल.

टॅग्स :Damधरण