शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दीडशे किलो वजनाचे ५२हजार पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांकडे जाणार

By संजय पाटील | Updated: February 10, 2023 12:46 IST

तब्बल सहा तास, बारा माणसे सतत शिक्का मारत होती. तेव्हा कुठे पाडळसरे जनआंदोलन समितीने पाठवलेली दीड क्विंटल वजनाची ५२ हजार ५०० पोस्टकार्ड

अमळनेर जि. जळगाव :

तब्बल सहा तास, बारा माणसे सतत शिक्का मारत होती. तेव्हा कुठे पाडळसरे जनआंदोलन समितीने पाठवलेली दीड क्विंटल वजनाची ५२ हजार ५०० पोस्टकार्ड अमळनेर टपाल कार्यालयातून १० रोजी सकाळी जळगावकडे रवाना करण्यात आली. सायंकाळी ते मुंबई येथे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात  येणार आहेत.गेल्या २६ वर्षांपासून रखडलेल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा  केंद्रीय अर्थसहाय्य अनुदान योजनेत समावेश व्हावा,  यासाठी अमळनेर तालुक्यातील शेतकरी ,विद्यार्थी , मजूर , कामगार यांनी ५२ हजार ५०० पत्रे लिहली.  या पोस्टकार्डची गुरुवारी  बैलगाडीवर  मिरवणूक काढण्यात आली होती. 

जनतेच्या भावना लक्षात घेत पोस्ट मास्तर आबासाहेब साळुंखे यांनी तातडीने कार्यालयातील सर्व १२ कर्मचाऱ्यांना कामाला लावत शिक्के मारले.    सर्व कर्मचाऱ्यांनी विविध सात पाकिटात त्यांना सीलबंद केले. त्याचे वजन  दीड क्विंटल भरले. सकाळी साडे सात वाजता सर्व पोस्टकार्ड जळगाव पोस्ट कार्यालयात रवाना करून मुंबई कार्यालयात संदेश पाठविण्यात आला. 

माझ्या आतापर्यंत सेवेत एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोस्ट कार्ड येण्याची पहिली वेळ आहे. - आबासाहेब साळुंखे , पोस्ट मास्तर अमळनेर.

टॅग्स :Jalgaonजळगाव