शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:05 IST

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यातनदी पात्रात तलाव सदृष्य खड्ड्यांमध्ये जमिनीत जिरविले जाते पाणी१०० टक्के वृक्ष संगोपन

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात तालुक्यात जलपातळी खोल जात असल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने अनेकांना पाणी अडवा-पाणी जिरवा योजनेसह वृक्ष लागवडीची आठवण होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा पुढील उन्हाळ्यापर्यंत त्यावर कोणीही बोलत नसल्याची गेल्या अनेक उदाहरणे आहेत. मात्र तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून नदी पात्रात जलबंधारे आणि लाखो लीटर्स पाणी जिरविण्यासाठी सुरू केलेली योजना या वर्षातही सुरू ठेवली असून, गेल्या वर्षी ४० तर या वर्षात सात अशी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली असल्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्या पाठोपाठ आता तालुक्यात अनेक गावात या योजना सूर झाल्या आहेत.यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी बुद्रूक येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या वर्षी नदी परिसरात ४० जलसंधारणाची कामे केली. यात प्रामुख्याने माती बंधारे लाखो लीटर्स पाणी मावेल असे मोठमोठे तलाव सदृष्य खड्डे तयार करणे यासारखी कामे केली होती. त्याचा फायदा या गावासाठी निश्चितच झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तालुक्यात अनेक गावांना यावर्षी पाणीटंचाई उद्भवली. मात्र सांगवीमध्ये पाणीटंचाई नाही. गावचे सांडपाणीसुद्धा नदी पात्रातील खड्ड्यामधून जिरविले जात आहे.गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षातही ग्रामस्थांनी लोकसहभागतून मागील वर्षाचे सहा खड्डे पुनरुज्जीवित करून नव्याने १०० बाय ५० बाय १२ फूट ज्यात १७ लाख १७ हजार लीटर्स पाणी मावेल, तर दुसरा २३१ बाय २७ बाय १२ फुटांच्या खोलीचा ज्यात ३२ लाख ७० हजार लीटर्स पाणी मावेल, आणि तिसरा ११२ बाय २७ बाय १० फूट खोलीचा आठ लाख ७० हजार लीटर खोलीचे तलाव सदृष्य खड्डे केले आहेत.मागील वर्षाचे आणि या वर्षाचे मिळून ग्रामस्थांनी परिसरात ५० जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी ग्रामस्थांनी मागील वर्षी सुमारे सात लाखांचा निधी जमा केला होता. त्यातील पाच लाख जलसंधारणावर खर्च केले तर एक लाख रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केले.१०० टक्के वृक्ष संगोपनशासकीय यंत्रणेव्दारा दरवर्षी लाखो वृक्ष लागवड होते आणि दुसऱ्या वर्षी परत त्याच खड्ड्यातून वृक्ष लागवड होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र सांगवीकरांनी गेल्या वर्षी गावात केवळ १२६ वक्ष लावले.वृक्ष लागवड करताना एक हजार रुपये, दीड हजार रुपये किमतीची मोठी झाडे आणून त्यांचे संगोपन केल्याने १०० टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाल्याचे तलाठी एस.के.पाटील यांनी सांगितले. या योजनेसाठी गावातील अमोध कोळंबे, अतुल उल्हास चौधरी, दीपक चौधरी, पी. एम. भंगाळे, दीपक भंगाळे, योगेश भंगाळे, विकास भंगाळे, भालचंद भंगाळे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे तलाठी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल