शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:05 IST

यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यातनदी पात्रात तलाव सदृष्य खड्ड्यांमध्ये जमिनीत जिरविले जाते पाणी१०० टक्के वृक्ष संगोपन

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात तालुक्यात जलपातळी खोल जात असल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने अनेकांना पाणी अडवा-पाणी जिरवा योजनेसह वृक्ष लागवडीची आठवण होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा पुढील उन्हाळ्यापर्यंत त्यावर कोणीही बोलत नसल्याची गेल्या अनेक उदाहरणे आहेत. मात्र तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांनी गेल्या वर्षापासून नदी पात्रात जलबंधारे आणि लाखो लीटर्स पाणी जिरविण्यासाठी सुरू केलेली योजना या वर्षातही सुरू ठेवली असून, गेल्या वर्षी ४० तर या वर्षात सात अशी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली असल्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्या पाठोपाठ आता तालुक्यात अनेक गावात या योजना सूर झाल्या आहेत.यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी बुद्रूक येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या वर्षी नदी परिसरात ४० जलसंधारणाची कामे केली. यात प्रामुख्याने माती बंधारे लाखो लीटर्स पाणी मावेल असे मोठमोठे तलाव सदृष्य खड्डे तयार करणे यासारखी कामे केली होती. त्याचा फायदा या गावासाठी निश्चितच झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तालुक्यात अनेक गावांना यावर्षी पाणीटंचाई उद्भवली. मात्र सांगवीमध्ये पाणीटंचाई नाही. गावचे सांडपाणीसुद्धा नदी पात्रातील खड्ड्यामधून जिरविले जात आहे.गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षातही ग्रामस्थांनी लोकसहभागतून मागील वर्षाचे सहा खड्डे पुनरुज्जीवित करून नव्याने १०० बाय ५० बाय १२ फूट ज्यात १७ लाख १७ हजार लीटर्स पाणी मावेल, तर दुसरा २३१ बाय २७ बाय १२ फुटांच्या खोलीचा ज्यात ३२ लाख ७० हजार लीटर्स पाणी मावेल, आणि तिसरा ११२ बाय २७ बाय १० फूट खोलीचा आठ लाख ७० हजार लीटर खोलीचे तलाव सदृष्य खड्डे केले आहेत.मागील वर्षाचे आणि या वर्षाचे मिळून ग्रामस्थांनी परिसरात ५० जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी ग्रामस्थांनी मागील वर्षी सुमारे सात लाखांचा निधी जमा केला होता. त्यातील पाच लाख जलसंधारणावर खर्च केले तर एक लाख रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केले.१०० टक्के वृक्ष संगोपनशासकीय यंत्रणेव्दारा दरवर्षी लाखो वृक्ष लागवड होते आणि दुसऱ्या वर्षी परत त्याच खड्ड्यातून वृक्ष लागवड होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र सांगवीकरांनी गेल्या वर्षी गावात केवळ १२६ वक्ष लावले.वृक्ष लागवड करताना एक हजार रुपये, दीड हजार रुपये किमतीची मोठी झाडे आणून त्यांचे संगोपन केल्याने १०० टक्के वृक्ष लागवड यशस्वी झाल्याचे तलाठी एस.के.पाटील यांनी सांगितले. या योजनेसाठी गावातील अमोध कोळंबे, अतुल उल्हास चौधरी, दीपक चौधरी, पी. एम. भंगाळे, दीपक भंगाळे, योगेश भंगाळे, विकास भंगाळे, भालचंद भंगाळे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे तलाठी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल