शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

५० उंटांचे कन्नड घाटात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 16:11 IST

खान्देशात उन्हाळ्याची तीव्रता एवढी वाढली आहे की, पाणी आणि चारा नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील उंटमालकांनी आपले ५० उंट कन्नड घाटाकडे स्थलांतरित केले आहेत.

ठळक मुद्देपाणी आणि चारा नसल्याने स्थलांतराची आली वेळउंटांचे दूध ६० ते ७० रुपये लीटरने विकले जाते४४ अंश तापमानातही सय्यद कुटुंबातील आठ ते दहा सदस्य उंटांच्या काफिल्याबरोबरपहिला पाऊस पडल्यानंतर परतणार स्वगृही प्रकाशाकडे

अमळनेर, जि.जळगाव : खान्देशात उन्हाळ्याची तीव्रता एवढी वाढली आहे की, पाणी आणि चारा नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील उंटमालकांनी आपले ५० उंट कन्नड घाटाकडे स्थलांतरित केले आहेत.प्रकाशा येथील सय्यद हुसेन याने सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात हिरवळ संपली असून, जनावरांना प्यायला पाणी शिल्लक नसल्याने चिंता वाढली होती. उंटांना प्यायला भरपूर पाणी लागते म्हणून गेल्या २० दिवसांपासून प्रकाशा येथून पायी कन्नड घाटाकडे निघाले आहेत. ४४ अंश तापमानाच्या भर उन्हातही सय्यद कुटुंबातील आठ ते दहा सदस्य उंटांबरोबर मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथे रस्त्याने पायी चालत होते.सय्यद हुसेन यांच्या कुटुंबाची उपजीविका उंटांच्या दुधावरच चालते. उंटांचे दूध ६० ते ७० रुपये लीटरने विकले जाते. मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि कुस्तीच्या पहिलवानांना ताकद येण्यासाठी हे दूध वापरले जाते. अनेकांची मागणी असते. तसेच पोट पुढे आलेल्या आणि स्थूल, लहान मुलांना गुणकारी असते. एवढ्या उंटांना चारा विकत आणणे परवडत नाही म्हणून जंगलाच्या नैसर्गिक चाऱ्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु कडक उन्हाळ्यामुळे पाणी आणि चारा नसल्याने पावणे दोनशे किलोमीटर कन्नडच्या जंगलात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला पाऊस पडताच प्रकाशाकडे माघारी फिरू, असे सय्यद हुसेन याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAmalnerअमळनेर