शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

एसटीत ५० टक्के उपस्थितीचे होतेय पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST

डमी जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये ५० टक्केच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ...

डमी

जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये ५० टक्केच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत महामंडळाच्या बसेसमध्ये ५० टक्के उपस्थितीचे पालन होताना दिसून आले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले असून महामंडळाच्या बसेसमध्येही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेपैकी ५० टक्केच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ४४ आसन क्षमतेच्या बसमध्ये २२ प्रवाशांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

'लोकमत' प्रतिनिधीने शासनाच्या या आदेशाचे बसेसमध्ये पालन होत आहे का, याची पाहणी केली असता, बसमध्ये या नियमांचे पालन होताना दिसून आले.

बसमध्ये एका बाकावर एकच प्रवासी बसविल्याचे दिसून आले. प्रवासानंतर बाहेरून आलेल्या बसला लगेच कार्यशाळेत नेवून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळ प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहे.

प्रत्येक आगारात नियमांचे पालन

शासनाच्या सूचनेनुसार बसमध्ये ५० टक्केच प्रवासी बसविण्याचे आदेश असून या आदेशाचे जळगाव विभागातील प्रत्येक आगारात पालन करण्यात येत आहे. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासूनच प्रवेश देण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना मास्क व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.

सध्या संचारबंदी असली तरी आरोग्य सेवेतील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे मला बसमध्ये ओळखपत्र दाखविल्यावर प्रवेश मिळतो. सध्या मी जामनेरहून नियिमत बसने जळगावला येत आहे.

- प्रवीण देसले, कर्मचारी

मी एका औषध कंपनीत कामाला आहे. मेडिकल व्यावसायिकांना औषधे देण्यासाठी दररोज जिल्ह्यात कुठेही जावे लागते. खासगी प्रवासी गाड्या बंद असल्याने बसनेच प्रवास करतो. ओळखपत्र दाखविल्यावर बसमध्ये प्रवेश देण्यात येतो, अन्यथा देण्यात येत नाही.

- सुनील पाखले, कर्मचारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार बसमध्ये ५० टक्के प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येत आहे. बाहेरून आल्यानंतर बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. प्रवाशांनाही मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग

जिल्ह्यातील एकूण आगार - ११

वाहक - १ हजार ५५०

चालक- १ हजार ४५०

यांत्रिक कर्मचारी -९००

प्रशासकीय कर्मचारी -६००

अधिकारी - २५