शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

५ लाख सौर कृषिपंप बसविणार

By admin | Updated: December 1, 2014 14:30 IST

विजेचा भार कमी करण्यासाठी पाच लाख सौर कृषिपंप शेतकर्‍यांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरात केली.

मुक्ताईनगर : राज्यात विजेचे संकट गंभीर आहे. शेतकर्‍यांना दिवसा सलग आठ तास वीज देण्याचा प्रयत्न आहे. विजेचा भार कमी करण्यासाठी पाच लाख सौर कृषिपंप शेतकर्‍यांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरात केली. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्ताई साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ व १२ मेगा वॅटच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. यानिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री एकनाथराव खडसे, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, विजेवर चालणार्‍या पाच अश्‍वशक्तीच्या कृषिपंपासाठी तारा, खांब आदींचा दीड लाख रुपये खर्च येतो. विजेची स्थिती बिकट आहे. राज्यात २७00 रोहित्र खराब झाले होते. पैकी २000 रोहित्र बदलण्याचे काम सुरू झाले आहे. १९ हजार गावांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहू. सौर कृषिपंपांबाबत टप्प्यात पाच लाख सौर कृषिपंप बसविले जातील. पुढील पाच वर्षे हा कार्यक्रम राहील. 
राज्यातील ३५ लाख विजेवर चालणार्‍या कृषिपंपांपैकी निम्मे कृषिपंप सौर पॉवरने सुरू करू व विजेचा भार कमी करू. केंद्रीय ग्रामीण वीज विभाग त्यासाठी सहकार्य करणार आहे, असेही ते म्हणाले. 
जळगावातील प्रकल्पांसाठी पुढाकार गिरणा नारपार प्रकल्प हाती घेतला आहे. शेळगाव, पाडळसे प्रकल्पासाठी पूर्ण निधी देऊ. बोदवड उपसा योजनेसाठीदेखील शासन मदत करेल. तसेच खारीयागुटी, सातपुडा, तापी, वाघूर, गिरणा हा नदीजोड प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न असेल. मेगा रिचार्ज प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
१९ हजार गावांमध्ये पंचनामे न करता दुष्काळ जाहीर झाला आहे. पुढे केंद्रीय पथक राज्यात येणार असून, या पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळ जाहीर होईल. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी केंद्राकडे ४५00 कोटींची मागणी केली आहे. ५८३ कोटी फळबागांसाठी आले आहेत. खान्देशसह इतरत्र वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्याबाबत संवैधानिक अडचण आहे. 
 
■ मुक्ताईनगरात शासकीय तंत्रनिकेतन 
■ केळीसाठी रेडिएशन केंद्र आणणार
■ कापूस उत्पादकांना बोनसचा विचार 
■ हवामानाच्या अंदाजासाठी राज्यात २ हजार ६५ हवामान केंद्रे उभारणार
■ अमरावती-नवापूर चौपदरीकरणाचे भूमिपूजन लवकरच
■ अवैध वीज कनेक्शन वीज जोडणीचा अर्ज भरून वैध करून घेता येणार
■ शेतकर्‍यांना सौर कृषिपंप देणार
■ पाडळसे, शेळगाव प्रकल्प व बोदवड उपसासाठी निधी देणार
■ नार पार गिरणा प्रकल्प मार्गी लावणार
■ जळगावात कृषी महाविद्यालयासाठी प्रयत्न