शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

५ लाख सौर कृषिपंप बसविणार

By admin | Updated: December 1, 2014 14:30 IST

विजेचा भार कमी करण्यासाठी पाच लाख सौर कृषिपंप शेतकर्‍यांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरात केली.

मुक्ताईनगर : राज्यात विजेचे संकट गंभीर आहे. शेतकर्‍यांना दिवसा सलग आठ तास वीज देण्याचा प्रयत्न आहे. विजेचा भार कमी करण्यासाठी पाच लाख सौर कृषिपंप शेतकर्‍यांना देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरात केली. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्ताई साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ व १२ मेगा वॅटच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. यानिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री एकनाथराव खडसे, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, विजेवर चालणार्‍या पाच अश्‍वशक्तीच्या कृषिपंपासाठी तारा, खांब आदींचा दीड लाख रुपये खर्च येतो. विजेची स्थिती बिकट आहे. राज्यात २७00 रोहित्र खराब झाले होते. पैकी २000 रोहित्र बदलण्याचे काम सुरू झाले आहे. १९ हजार गावांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहू. सौर कृषिपंपांबाबत टप्प्यात पाच लाख सौर कृषिपंप बसविले जातील. पुढील पाच वर्षे हा कार्यक्रम राहील. 
राज्यातील ३५ लाख विजेवर चालणार्‍या कृषिपंपांपैकी निम्मे कृषिपंप सौर पॉवरने सुरू करू व विजेचा भार कमी करू. केंद्रीय ग्रामीण वीज विभाग त्यासाठी सहकार्य करणार आहे, असेही ते म्हणाले. 
जळगावातील प्रकल्पांसाठी पुढाकार गिरणा नारपार प्रकल्प हाती घेतला आहे. शेळगाव, पाडळसे प्रकल्पासाठी पूर्ण निधी देऊ. बोदवड उपसा योजनेसाठीदेखील शासन मदत करेल. तसेच खारीयागुटी, सातपुडा, तापी, वाघूर, गिरणा हा नदीजोड प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न असेल. मेगा रिचार्ज प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
१९ हजार गावांमध्ये पंचनामे न करता दुष्काळ जाहीर झाला आहे. पुढे केंद्रीय पथक राज्यात येणार असून, या पथकाच्या पाहणीनंतर दुष्काळ जाहीर होईल. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी केंद्राकडे ४५00 कोटींची मागणी केली आहे. ५८३ कोटी फळबागांसाठी आले आहेत. खान्देशसह इतरत्र वैधानिक विकास महामंडळे स्थापन करण्याबाबत संवैधानिक अडचण आहे. 
 
■ मुक्ताईनगरात शासकीय तंत्रनिकेतन 
■ केळीसाठी रेडिएशन केंद्र आणणार
■ कापूस उत्पादकांना बोनसचा विचार 
■ हवामानाच्या अंदाजासाठी राज्यात २ हजार ६५ हवामान केंद्रे उभारणार
■ अमरावती-नवापूर चौपदरीकरणाचे भूमिपूजन लवकरच
■ अवैध वीज कनेक्शन वीज जोडणीचा अर्ज भरून वैध करून घेता येणार
■ शेतकर्‍यांना सौर कृषिपंप देणार
■ पाडळसे, शेळगाव प्रकल्प व बोदवड उपसासाठी निधी देणार
■ नार पार गिरणा प्रकल्प मार्गी लावणार
■ जळगावात कृषी महाविद्यालयासाठी प्रयत्न