शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात ५ लाख लीटरने वाढ

By admin | Updated: June 9, 2014 14:14 IST

तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे येथील पंपिंग स्टेशनवर आणखी एक पंप अधिकचा सुरू करण्यात आल्याने तासाला पाच लाख लीटरने पाण्यात वाढ झाली आहे.

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे येथील पंपिंग स्टेशनवर आणखी एक पंप अधिकचा सुरू करण्यात आल्याने तासाला पाच लाख लीटरने पाण्यात वाढ झाली आहे. त्यामळे कृत्रिम पाणीटंचाईने बेहाल झालेल्या धुळेकर नागरिकांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे. 

शहरातील ६0 टक्के भागाला तापी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी बाभळे येथे पंपिंगस्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून शहरापर्यंत ४२ किलोमीटरची पाइप लाइन टाकून पाणी आणण्यात आलेआहे. या पंपिंग स्टेशनवर तीनच पंप सुरू होते. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार या पंपिंग स्टेशनवर गेल्या आठवड्यात पुन्हा एक पंप सुरू करण्यात आलाआहे. यासाठी अधिकार्‍यांनी पंपाची चाचणी केली. ती यशस्वी झाल्याने हा पंप सुरू करण्यात आला. या पंपातून तासाला पाच लाख लीटर अधिकचे पाणी मिळत आहे. 
पाणीपातळीत वाढ
बाभळे पंपिंग स्टेशनवरून रोज ४0 ते ४४ लाख लीटर पाणी उचलले जात आहे. तीन पंप सुरू असताना एमबीआर जलकुंभाची पाणीपातळी काही वेळात खाली येत होती. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. आता एक पंप अधिकचा सुरू झाल्याने 'एमबीआर' जलकुंभावरून देवपूरचा एक व्हॉल्व्ह सोडला तरी मायक्रो, बडगुजर, मालेगाव जलकुंभांनाही पाणीपुरवठा करण्यास मदत झाली आहे. 
गेल्याआठवड्यापासून हा पाणीपुरवठा होत आहे. परंतु अद्याप जलवाहिनीला कुठेच गळती लागली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. खंडित होणार्‍या वीजपुरवठय़ाचा फटका
तापी योजनेसाठी मनपाला महिन्याला किमान ५२ लाखांपर्यंत वीज बिल येते. चौथा पंप सुरू करण्यात आल्याने त्यात पुन्हा १0 ते १२ लाखांच्या बिलाची वाढ होणारआहे. परंतु अनेकदा येथील वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणी येतात. पांझरा नदीच्या काठावरील गावांना पाणीटंचाई जाणवू नये म्हणून अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा सोडण्यातआलाआहे. त्यामुळे पांझरा प्रवाहित झाली आहे. या नदीत हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ मनपाने गेल्याच वर्षी एक बंधारा बांधला होता. त्यात २0 ते २५ एमसीएफटी पाण्याचा साठा होतो. नदीत पाणी सोडण्यात आल्याने या बंधार्‍यात पाणीसाठा होतआहे. त्यामुळे मनपाने नकाणे तलावातील पाणी घेणे तूर्त बंद केले आहे. या पाण्यामुळे किमान २0 ते २५ दिवस पांझरेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळा लांबल्यास या पाण्याचा भविष्यात वापर करता येणारआहे.