शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाण्यात ५ लाख लीटरने वाढ

By admin | Updated: June 9, 2014 14:14 IST

तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे येथील पंपिंग स्टेशनवर आणखी एक पंप अधिकचा सुरू करण्यात आल्याने तासाला पाच लाख लीटरने पाण्यात वाढ झाली आहे.

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे येथील पंपिंग स्टेशनवर आणखी एक पंप अधिकचा सुरू करण्यात आल्याने तासाला पाच लाख लीटरने पाण्यात वाढ झाली आहे. त्यामळे कृत्रिम पाणीटंचाईने बेहाल झालेल्या धुळेकर नागरिकांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे. 

शहरातील ६0 टक्के भागाला तापी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी बाभळे येथे पंपिंगस्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून शहरापर्यंत ४२ किलोमीटरची पाइप लाइन टाकून पाणी आणण्यात आलेआहे. या पंपिंग स्टेशनवर तीनच पंप सुरू होते. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार या पंपिंग स्टेशनवर गेल्या आठवड्यात पुन्हा एक पंप सुरू करण्यात आलाआहे. यासाठी अधिकार्‍यांनी पंपाची चाचणी केली. ती यशस्वी झाल्याने हा पंप सुरू करण्यात आला. या पंपातून तासाला पाच लाख लीटर अधिकचे पाणी मिळत आहे. 
पाणीपातळीत वाढ
बाभळे पंपिंग स्टेशनवरून रोज ४0 ते ४४ लाख लीटर पाणी उचलले जात आहे. तीन पंप सुरू असताना एमबीआर जलकुंभाची पाणीपातळी काही वेळात खाली येत होती. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. आता एक पंप अधिकचा सुरू झाल्याने 'एमबीआर' जलकुंभावरून देवपूरचा एक व्हॉल्व्ह सोडला तरी मायक्रो, बडगुजर, मालेगाव जलकुंभांनाही पाणीपुरवठा करण्यास मदत झाली आहे. 
गेल्याआठवड्यापासून हा पाणीपुरवठा होत आहे. परंतु अद्याप जलवाहिनीला कुठेच गळती लागली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. खंडित होणार्‍या वीजपुरवठय़ाचा फटका
तापी योजनेसाठी मनपाला महिन्याला किमान ५२ लाखांपर्यंत वीज बिल येते. चौथा पंप सुरू करण्यात आल्याने त्यात पुन्हा १0 ते १२ लाखांच्या बिलाची वाढ होणारआहे. परंतु अनेकदा येथील वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणी येतात. पांझरा नदीच्या काठावरील गावांना पाणीटंचाई जाणवू नये म्हणून अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा सोडण्यातआलाआहे. त्यामुळे पांझरा प्रवाहित झाली आहे. या नदीत हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ मनपाने गेल्याच वर्षी एक बंधारा बांधला होता. त्यात २0 ते २५ एमसीएफटी पाण्याचा साठा होतो. नदीत पाणी सोडण्यात आल्याने या बंधार्‍यात पाणीसाठा होतआहे. त्यामुळे मनपाने नकाणे तलावातील पाणी घेणे तूर्त बंद केले आहे. या पाण्यामुळे किमान २0 ते २५ दिवस पांझरेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळा लांबल्यास या पाण्याचा भविष्यात वापर करता येणारआहे.