शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पाण्यात ५ लाख लीटरने वाढ

By admin | Updated: June 9, 2014 14:14 IST

तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे येथील पंपिंग स्टेशनवर आणखी एक पंप अधिकचा सुरू करण्यात आल्याने तासाला पाच लाख लीटरने पाण्यात वाढ झाली आहे.

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेच्या बाभळे येथील पंपिंग स्टेशनवर आणखी एक पंप अधिकचा सुरू करण्यात आल्याने तासाला पाच लाख लीटरने पाण्यात वाढ झाली आहे. त्यामळे कृत्रिम पाणीटंचाईने बेहाल झालेल्या धुळेकर नागरिकांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे. 

शहरातील ६0 टक्के भागाला तापी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी बाभळे येथे पंपिंगस्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून शहरापर्यंत ४२ किलोमीटरची पाइप लाइन टाकून पाणी आणण्यात आलेआहे. या पंपिंग स्टेशनवर तीनच पंप सुरू होते. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार या पंपिंग स्टेशनवर गेल्या आठवड्यात पुन्हा एक पंप सुरू करण्यात आलाआहे. यासाठी अधिकार्‍यांनी पंपाची चाचणी केली. ती यशस्वी झाल्याने हा पंप सुरू करण्यात आला. या पंपातून तासाला पाच लाख लीटर अधिकचे पाणी मिळत आहे. 
पाणीपातळीत वाढ
बाभळे पंपिंग स्टेशनवरून रोज ४0 ते ४४ लाख लीटर पाणी उचलले जात आहे. तीन पंप सुरू असताना एमबीआर जलकुंभाची पाणीपातळी काही वेळात खाली येत होती. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. आता एक पंप अधिकचा सुरू झाल्याने 'एमबीआर' जलकुंभावरून देवपूरचा एक व्हॉल्व्ह सोडला तरी मायक्रो, बडगुजर, मालेगाव जलकुंभांनाही पाणीपुरवठा करण्यास मदत झाली आहे. 
गेल्याआठवड्यापासून हा पाणीपुरवठा होत आहे. परंतु अद्याप जलवाहिनीला कुठेच गळती लागली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. खंडित होणार्‍या वीजपुरवठय़ाचा फटका
तापी योजनेसाठी मनपाला महिन्याला किमान ५२ लाखांपर्यंत वीज बिल येते. चौथा पंप सुरू करण्यात आल्याने त्यात पुन्हा १0 ते १२ लाखांच्या बिलाची वाढ होणारआहे. परंतु अनेकदा येथील वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणी येतात. पांझरा नदीच्या काठावरील गावांना पाणीटंचाई जाणवू नये म्हणून अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा सोडण्यातआलाआहे. त्यामुळे पांझरा प्रवाहित झाली आहे. या नदीत हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ मनपाने गेल्याच वर्षी एक बंधारा बांधला होता. त्यात २0 ते २५ एमसीएफटी पाण्याचा साठा होतो. नदीत पाणी सोडण्यात आल्याने या बंधार्‍यात पाणीसाठा होतआहे. त्यामुळे मनपाने नकाणे तलावातील पाणी घेणे तूर्त बंद केले आहे. या पाण्यामुळे किमान २0 ते २५ दिवस पांझरेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाळा लांबल्यास या पाण्याचा भविष्यात वापर करता येणारआहे.