शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

प्लॅस्टिक बंदीमुळे वाढणार जळगाव जिल्ह्यात ५ टक्के कापसाचे क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:17 IST

राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढणार आहे. यासोबतच कापसाच्या भाववाढीमुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे ५ टक्क्यांनी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज जि.प.च्या कृषी विभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्देजि.प.कृषी विभागाचा अंदाजकापडी पिशव्यांना मागणी वाढणारकापसाला मिळत असलेल्या भाव वाढीचा परिणाम

जळगाव : राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढणार आहे. यासोबतच कापसाच्या भाववाढीमुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे ५ टक्क्यांनी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज जि.प.च्या कृषी विभागाने वर्तविला आहे.जिल्ह्यात यावर्षी कापसाची लागवड कमी होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तविण्यात येत होता़ परंंतु काही दिवसापासून अचानक कापसाचे भाव वाढले असून सहा हजारापेक्षा अधिक भावाने कापूस विक्री होत आहे़ पुढील वर्षी देखील कापसाला चांगला भाव मिळणार असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.प्लॅस्टिक बंदीचा होणार लाभराज्य शासनाने नुकतीच प्लॅस्टिक बंदी केली. त्यामुळे कापडी पिशव्या किंवा वस्तुंची मागणी वाढणार असल्याचा अंदाज जिप़ कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे़ जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे अधिक कल असतो़ तसेच जिरायत, बागायत व कोरडवाहू अशा तिन्ही स्वरुपात कापसाची लागवड होत असते़ यंदा सुरूवातील पाऊस लांबल्याने कापसाच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे बोलले जात होते़ मात्र,आठवडाभरात झालेला पाऊस हा कपाशी पिकासाठी पोषक असल्याने अनेक शेतकºयांनी ऐनवेळी कपाशी लागवडीचा निर्णय घेतला आहे़ जिल्ह्यात कापसाच्या लागवडीसाठी २३ लाख २० हजार ७९१ पाकिटे जिप़ कृषी विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आली होती़ यापैकी १५ हजार पाकिटांची विक्री झाली आहे़

टॅग्स :cottonकापूसJalgaonजळगाव