शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

रायपूरच्या दाम्पत्यास ४५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:14 IST

 दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देखोटे शपथपत्र केले तयार

जळगाव : कौशल्य विकास योजनेत सुरु केलेल्या प्रशिक्षण संस्थेचा खोटा ठराव करून आणि संस्था परस्पर स्वत:च्या नावावर करून रायपूरच्या दाम्पत्याची ४५ लाखात फसवूणक केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी निमजाई फाऊंडेशनचे भूषण बक्षे, त्यांची पत्नी व अन्य चार अशा सहा जणांविरुद्ध शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला.भारती गजेंद्रसिंग परदेशी (३६ रा. रायपूर ता. जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली.भारती परदेशी यांनी २०१५ मध्ये कौशल्य विकास योजनेतंर्गत महाबळ कॉलनी परिसरातील मॅजिक वर्ल्ड आॅफ एज्युकेशन प्रशिक्षण केंद्रात अ‍ॅनिमेशनचा क्लास लावला होता. यादरम्यान केंद्राचे मालक भूषण बक्षे याने भारती यांचे पती गजेंद्रसिंग परदेशी यांच्याशी परिचय करून घेतला आणि परदेशी यांनाही प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत माहिती दिली. यानंतर मयुरेश्वर स्कूल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन नावाने रायपूर येथे प्रशिक्षण केंद्राची नोंदणी त्यांनी करून दिली.परदेशी यांचे मित्र अमित राजूसिंग चव्हाण यांना पिंप्राळा येथे दुसरे केंद्र सुरु करावयाचे असल्याने त्यासाठी बक्षे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी परदेशी यांचे मयुरेश्वर नावाचे प्रशिक्षण केंद्र बक्षे याने गणेश कॉलनी येथे परस्पर स्थलांतरीत केल्याचे समोर आले. याबाबत परदेशींनी विचारला असता ते माझ्या मालकीचे असून तुमचा काहीएक संबंध नसल्याचे बक्षेने उत्तर दिले. परदेशी यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मिळविली असता आपली फसवणूक झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी वरील सहा जणांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४७१, ४७४,१२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.खोटे शपथपत्र केले तयारभूषण बक्षे याने खोटे शपथपत्र शासनाला सादर केले तसेच संस्थेची बनावट कागदपत्रे बनावट स्वाक्षरी शिक्क्याच्या आधारावर तयार करुन त्याने परदेशी यांचे मयुरेश्वर स्कूल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन केंद्र परस्पर त्याची पत्नी शितल भगवान पाटील या अध्यक्ष असलेल्या निमजाई फाऊंडेशनच्या नावे लावले. यात स्वत: खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक देवून बक्षे, शीतल पाटील यांच्यासह निमजाई फाऊंडेशनचे सदस्य भारत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनी खोटा ठराव करुन अनुदानाची ४५ लाखांची रक्कम परस्पर खात्यावर जमा करुन घेतली.अनेकांना फसविल्याचा संशय !एरंडोल येथील प्रविण महाजन, धरणगाव येथील दीपक रतन पवार, सावखेडा बुद्रूक येथील अमित राजूसिंग चव्हाण यांच्यासह इतरांची फसवूणक झाल्याची माहिती फिर्यादी भारती परदेशी यांनी पोलिसांना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी