शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

४५ लाखाचा अपहार,तीन जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:40 IST

मुख्य संशयित फरार : ‘अटकपूर्व’वर खुलासा

जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी निमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४० रा.भवानी पेठ), राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या तिघांची चौकशी केली. या तिघांसह मोहीनी भरत भंगाळे (३१) अशा चौघांना औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या या अर्जावर पोलिसांनी मंगळवारी खंडपीठात खुलासा सादर केला.दरम्यान, यातील मुख्य संशयित भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील हे दोघं अद्याप फरारच असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. दोन वेळा पोलिसांचे पथक दोघांच्या घरी तसेच गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जावून आले, मात्र ते मिळाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, भरत भंगाळेसह चौघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर खंडपीठाने तपाधिकाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासाधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी खंडपीठात म्हणणे सादर करुन या चौघांचा अटकपूर्व जामीन नियमित करु नये तसेच मुख्य आरोपी फरार असून अपहाराचा आकडा मोठा असल्याचे न्यायालयात सांगितले.दरम्यान, या चौघांना खंडपीठाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व मंजूर केला होता. त्यानुसार संदीप पाटील यांनी मोहिनी भंगाळे व्यतिरिक्त तिघांची सोमवारी चौकशी केली. दरम्यान, या दोन दिवसात आणखी काही जणांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी