शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

४५ लाखाचा अपहार,तीन जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:40 IST

मुख्य संशयित फरार : ‘अटकपूर्व’वर खुलासा

जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी निमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४० रा.भवानी पेठ), राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या तिघांची चौकशी केली. या तिघांसह मोहीनी भरत भंगाळे (३१) अशा चौघांना औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या या अर्जावर पोलिसांनी मंगळवारी खंडपीठात खुलासा सादर केला.दरम्यान, यातील मुख्य संशयित भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील हे दोघं अद्याप फरारच असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. दोन वेळा पोलिसांचे पथक दोघांच्या घरी तसेच गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जावून आले, मात्र ते मिळाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, भरत भंगाळेसह चौघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर खंडपीठाने तपाधिकाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासाधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी खंडपीठात म्हणणे सादर करुन या चौघांचा अटकपूर्व जामीन नियमित करु नये तसेच मुख्य आरोपी फरार असून अपहाराचा आकडा मोठा असल्याचे न्यायालयात सांगितले.दरम्यान, या चौघांना खंडपीठाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व मंजूर केला होता. त्यानुसार संदीप पाटील यांनी मोहिनी भंगाळे व्यतिरिक्त तिघांची सोमवारी चौकशी केली. दरम्यान, या दोन दिवसात आणखी काही जणांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी