शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

जिल्ह्यातील ८३ हजार शेतकऱ्यांना ४२० कोटींचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. खरिपाच्या तयारीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार ४९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. खरिपाच्या तयारीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार ४९ शेतकऱ्यांना सुमारे ४२० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. दरम्यान, कर्ज वितरण करण्याचे काम अजूनही संथ गतीने असून, लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात यावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शेतमालाला भाव नाही, त्यात नैसर्गिक अडचणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वर्षी शेतकऱ्यांना दर वर्षाच्या तुलनेत कर्जाची गरज आहे. मात्र, जिल्हा बँक, खासगी व शासकीय बँकांकडून शेतकऱ्यांना फिरवले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हा बँका, खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेणे सुरू केले आहे. त्यासाठीचा ७/१२ उतारा, इतर कागदपत्रे बँकांकडे जमा केली आहेत. जिल्हा बँकेच्या ६० टक्के शेतकरी सभासदांना कर्जही मिळाले आहे. यंदा जिल्हा बँकेने ८० हजार १७१ सभासदांना ३२८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.

जिल्हा बँकेला ५२४ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

राज्य शासनाकडून जिल्हा बँकेला या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५२४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने ३२८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. यामुळे जिल्हा बँकेचे सभासद असलेला सभासद शेतकरी खरिपासाठी लागणारे बियाणे, खते, नवीन बैलजोडी इतर साधने घेण्यासाठी मोकळा झाला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेला जरी ५२४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी हे उद्दिष्ट पूर्ण केले जात नाही, असा आरोपदेखील शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

हेक्टरी कर्जाची रक्कम वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना बागायतीसाठी हेक्टरमागे ८५ हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरमागे ४५ हजार रुपयांचे कर्ज मिळते. शेतकऱ्यांना हेक्टरमागे लागणारा खर्च हा दीड लाखापर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरमागे दोन लाख रुपयांचे कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राष्‍ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

खरीप हंगाम तोंडावर आलेला असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. जिल्हा बँकेने एकीकडे शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ २ हजार शेतकऱ्यांना ३६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तर खाजगी बँकांनी ३३९ शेतकऱ्यांना ५६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.

पालकमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास संबंधित बँकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. मात्र अजूनही बँकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा वेचणे, बांधावरील गवत जाळणे, शेत स्वच्छ करणे व मशागतीसाठी शेत तयार करणे अशी कामे सुरू आहेत.

कर्जाचे झालेले वाटप

बँक - शेतकरी - कर्जाची रक्कम

जिल्हा बँक - ८० हजार १७१ - ३२८ कोटी १५ लाख

खासगी बँक - ३२९ - ५६ कोटी

राष्ट्रीयीकृत बँक - २ हजार ५४९ - ३६ कोटी ३८ लाख