शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

जिल्ह्यातील ८३ हजार शेतकऱ्यांना ४२० कोटींचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. खरिपाच्या तयारीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार ४९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात हंगामपूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे. खरिपाच्या तयारीसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ८३ हजार ४९ शेतकऱ्यांना सुमारे ४२० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. दरम्यान, कर्ज वितरण करण्याचे काम अजूनही संथ गतीने असून, लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात यावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शेतमालाला भाव नाही, त्यात नैसर्गिक अडचणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वर्षी शेतकऱ्यांना दर वर्षाच्या तुलनेत कर्जाची गरज आहे. मात्र, जिल्हा बँक, खासगी व शासकीय बँकांकडून शेतकऱ्यांना फिरवले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हा बँका, खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेणे सुरू केले आहे. त्यासाठीचा ७/१२ उतारा, इतर कागदपत्रे बँकांकडे जमा केली आहेत. जिल्हा बँकेच्या ६० टक्के शेतकरी सभासदांना कर्जही मिळाले आहे. यंदा जिल्हा बँकेने ८० हजार १७१ सभासदांना ३२८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.

जिल्हा बँकेला ५२४ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

राज्य शासनाकडून जिल्हा बँकेला या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५२४ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने ३२८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. यामुळे जिल्हा बँकेचे सभासद असलेला सभासद शेतकरी खरिपासाठी लागणारे बियाणे, खते, नवीन बैलजोडी इतर साधने घेण्यासाठी मोकळा झाला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेला जरी ५२४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी हे उद्दिष्ट पूर्ण केले जात नाही, असा आरोपदेखील शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

हेक्टरी कर्जाची रक्कम वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना बागायतीसाठी हेक्टरमागे ८५ हजार तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरमागे ४५ हजार रुपयांचे कर्ज मिळते. शेतकऱ्यांना हेक्टरमागे लागणारा खर्च हा दीड लाखापर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरमागे दोन लाख रुपयांचे कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राष्‍ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

खरीप हंगाम तोंडावर आलेला असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. जिल्हा बँकेने एकीकडे शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ २ हजार शेतकऱ्यांना ३६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तर खाजगी बँकांनी ३३९ शेतकऱ्यांना ५६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे.

पालकमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास संबंधित बँकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. मात्र अजूनही बँकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तर शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा वेचणे, बांधावरील गवत जाळणे, शेत स्वच्छ करणे व मशागतीसाठी शेत तयार करणे अशी कामे सुरू आहेत.

कर्जाचे झालेले वाटप

बँक - शेतकरी - कर्जाची रक्कम

जिल्हा बँक - ८० हजार १७१ - ३२८ कोटी १५ लाख

खासगी बँक - ३२९ - ५६ कोटी

राष्ट्रीयीकृत बँक - २ हजार ५४९ - ३६ कोटी ३८ लाख