शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रस्त्यांचे ४०० कोटींचे बिल थकीत; कामे थांबविण्याचा इशारा

By सुनील पाटील | Updated: July 15, 2023 15:35 IST

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदारांनी जिल्हाभरात ग्रामीण रस्त्यांची कामे केली आहेत.

जळगाव : जिल्ह्यात ग्रामीण मार्गाचे कामे पूर्ण करुन गेल्या दोन वर्षापासून त्याचा मोबदला मिळालेला नाही. जवळपास ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बिल शासनाने थकविले आहेत. त्यामुळे सर्वच मक्तेदार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. बिले तातडीने द्यावीत यासाठी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या तिन्ही संघटनेच्यावतीने जिल्ह्याभरातील शासकीय कंत्राटदार सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसीय साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तरी देखील बिले अदा झाली नाहीत तर कामे थांबविले जातील, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदारांनी जिल्हाभरात ग्रामीण रस्त्यांची कामे केली आहेत. ही कामे पूर्णही झालेली आहेत. दोन वर्षापासून या कामांचे बीले थकली आहेत. प्रत्येक वेळी १० ते १२ टक्के निधी वितरीत होतो. त्यातूनही कंत्राटदारांपर्यंत ३ ते ४ टक्केच निधी पोहचतो. त्यामुळे सर्वच कंत्राटदार अडचणीत आलेले आहेत. बँकाचे व्याज, मशिनरीचे हप्ते, कामगारांचे पगार, बाजारातून उपलब्ध केलेले साहित्याचे देणे व घरगुती खर्च यामुळे कंत्राटदार हवालदिल झाले असून मानसिक तणावात आहेत. या अरिष्ट चक्रातून बाहेर काढण्यासाठी सर्व बीले अदा होणे आवश्यक आहे. साखळी उपोषण केल्यानंतरही बिले निघाली नाहीत तर मग जिल्ह्यातील सर्वच शासकीय कामे थांबविले जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, कार्यकारी अध्यक्ष प्रमोद नेमाडे व सचिव सुनील पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव