शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेली १७१ बालके पालकांच्या कुशीत, १८८ दाम्पत्यात बहरली संसारवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 12:21 IST

अपहरणाचे १६ गुन्हे हस्तांतर, पुरुषांनाही लाजवेल असे काम

सुनील पाटीलजळगाव : सरकारी असो की खासगी क्षेत्र,आज प्रत्येक ठिकाणी महिला या पुरुषांच्या बरोबरीने किं बहुना त्याही पेक्षा पुढे गेल्या आहेत. पोलीस दलात काम करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी सहकारी महिलांच्या मदतीने पुरुषालाही लाजवेल असे काम करुन या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. केंद्र सरकारच्या आॅपरेशन मुस्कान मोहीमेंतर्गत हरविलेल्या २२० मुलांचा शोध घेऊन त्यातील १७१ बालकांना पालकांच्या कुशीत तर ज्यांना पालक नाहीत, अशा ४९ बालकांना बालनिरीक्षणगृहात आसरा दिला आहे.केंद्र सरकारतर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्यात हरविलेल्या बालकांच्या शोधासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबविली जाते. जिल्ह्यात या वर्षात एकाच महिन्यात हरविलेली २२० मुले सापडली.ज्या जिल्ह्यात सर्वाधिक मुले सापडली तेथे या महिन्यात परत ही मोहीम राबविली जात आहे. महाराष्टÑात जळगाव, अहमदनगर व सांगली या तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. यंदा सापडलेल्या बालकांमध्ये १२२ मुले व ९८ मुली आहेत. दरम्यान, नीता कायटे यांच्याकडे एएचटीयु विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. १८ वर्षाच्या आत वयातील हरविलेल्या मुलांबाबत आता थेट अपहरणाचा गुन्हा दाखल होत आहे. संबंधित पोलीस ठाण्याकडून चार महिन्यात हा गुन्हा उघड झाला नाही, तर तो गुन्हा एएचटीयुकडे वर्ग होतो.आणखी २२९ दाम्पत्यांचा संसाराची गाडी रुळावर आणणारसंसारात विघ्न आलेल्या १८८ प्रकरणात तडजोड पती-पत्नी, सासू-सासरे यांच्यातील कौटुंबिक कलह किंवा गैरसमजुतीतून एकमेकांपासून दुरावलेल्या १८८ दाम्पत्याची संसारवेल पुन्हा बहरण्यात नीता कायटे व सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ३८७ दाम्पत्य तारखेवर हजर न राहिल्याने त्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अद्यापही २२९ दाम्पत्यांचा संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी या कक्षाकडून प्रयत्न केले जात आहे. सहायक फौजदार अन्नपूर्णा बनसोडे, सुमन तायडे, शैला बाविस्कर, सविता परदेशी, वैशाली पाटील व मनिषा पाटील यांची टीम देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम काम करीत आहे. तुटलेला संसार पुन्हा बहरत असल्याने त्याचा आनंद शब्दात सांगता येत नसल्याचे या टीमने बोलून दाखविले.हरविलेल्या बालकांना त्यांच्या पालकांकडे व निराधार असलेल्या बालकांना निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. सज्ञान होईपर्यंत या बालकांची काळजी तेथे घेतली जाते. गुन्ह्यांच्या तपासापेक्षा या कामाचे अधिक समाधान लाभते.-नीता कायटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, महिला सहाय्यता कक्ष

टॅग्स :Jalgaonजळगाव