शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मनपातील ३५ कर्मचारी होणार आज सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोझा पडला आहे. त्यामुळे यंदा कोणतीही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोझा पडला आहे. त्यामुळे यंदा कोणतीही नोकरभरती होणे कठीण आहे. त्यात महानगरपालिकेत येत्या काही महिन्यात कर्मचा-यांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आधीच महापालिकेतील ९०० जागा रिक्त आहेत. त्यातच या वर्षात ३०० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. ३१ मे रोजी मनपात एकूण ३५ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यातच जुलै अखेर मनपातील १०० हून अधिक कर्मचारी सेवा निवृत्त होणार असल्याने कर्मचा-यांविना मनपाच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊन याचा परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या सोयी- सुविधांवरदेखील होण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनमुळे राज्यातील सर्वच उद्योग धंदे बंद होते. त्यातच राज्याला मिळणारा महसुलात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन भरती प्रक्रिया घेतली तर राज्याचा तिजोरीवर बोझा पडणार आहे. यामुळे शासनाने नवीन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याचा फटका महापालिकेला अधिक बसणार आहे. कारण मनपात याआधीच ९०० जागा रिक्त आहेत. मनपातील अनेक विभागात एकाच कर्मचा-याला विविध अतिरिक्त पदे देण्यात आली आहेत. अतिरिक्त पदांमुळे एकाच विभागावर कर्मचारी लक्ष केंद्रित काम करू शकत नाहीत. यामुळे मनपातील कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.

३०-४० वर्ष सेवा बजावणारे अधिकारीही निवृत्त

शहरातील समस्यांसह नागरिकांच्या गरजा समजणारे मनपातील जुनेजाणते अधिकारीदेखील आता सेवानिवृत्त झाल्यामुळे मनपाचा कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. भोळे, खडके, खान, मराठे, साळुंखे यांच्यासारखे अधिकारीदेखील गेल्या वर्षीच सेवानिवृत्त झाले होते. त्यात आता उर्वरित अधिकारीदेखील आता सेवानिवृत्त होत असल्याने मनपाच्या इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची पदेही रिक्त

महापालिकेत अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, २ साहाय्यक उपायुक्त, नगरसचिव, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त महापालिकेतील कर्मचा-यांना पदभार देऊन प्रभारी कारभारी करून काम रेटून नेले जात असल्याचे चित्र सध्या आहे. वारंवार पत्रे पाठवून देखील शासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने पदाधिकारी व प्रशासन हैराण झाले आहे.

अनुकंपाधारकांनाही न्याय नाही, कंत्राटी भरती ही नाही

महापालिकेत सद्यस्थितीत ९०० हून अधिक जागा रिक्त आहेत. महापालिकेच्या आकृतिबंध अजूनही मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत रिक्त जागा भरण्यासाठी महासभेत कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा ठराव देखील काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. मात्र हा ठराव करून पाच महिन्यांच्या वर काय झाला असून, ठरावाची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. तसेच अनेक अनुकंपाधारक न्यायाच्या प्रतीक्षेत असून, आंदोलने करून देखील या अनुकंपाधारकांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. जागा रिक्त असताना देखील महापालिका प्रशासनाकडून अनुकंपाधारकांना न्याय दिला जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

-मनपात सध्या काम करत असलेले कर्मचारी - १७००

-मनपाला लागणारे एकूण कर्मचारी संख्या - २७७४

- रिक्त पदे - ९००

- जुलै २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणारे कर्मचारी - १००