शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील ३५ कर्मचारी होणार आज सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोझा पडला आहे. त्यामुळे यंदा कोणतीही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात बोझा पडला आहे. त्यामुळे यंदा कोणतीही नोकरभरती होणे कठीण आहे. त्यात महानगरपालिकेत येत्या काही महिन्यात कर्मचा-यांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आधीच महापालिकेतील ९०० जागा रिक्त आहेत. त्यातच या वर्षात ३०० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. ३१ मे रोजी मनपात एकूण ३५ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यातच जुलै अखेर मनपातील १०० हून अधिक कर्मचारी सेवा निवृत्त होणार असल्याने कर्मचा-यांविना मनपाच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊन याचा परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या सोयी- सुविधांवरदेखील होण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनमुळे राज्यातील सर्वच उद्योग धंदे बंद होते. त्यातच राज्याला मिळणारा महसुलात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन भरती प्रक्रिया घेतली तर राज्याचा तिजोरीवर बोझा पडणार आहे. यामुळे शासनाने नवीन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याचा फटका महापालिकेला अधिक बसणार आहे. कारण मनपात याआधीच ९०० जागा रिक्त आहेत. मनपातील अनेक विभागात एकाच कर्मचा-याला विविध अतिरिक्त पदे देण्यात आली आहेत. अतिरिक्त पदांमुळे एकाच विभागावर कर्मचारी लक्ष केंद्रित काम करू शकत नाहीत. यामुळे मनपातील कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.

३०-४० वर्ष सेवा बजावणारे अधिकारीही निवृत्त

शहरातील समस्यांसह नागरिकांच्या गरजा समजणारे मनपातील जुनेजाणते अधिकारीदेखील आता सेवानिवृत्त झाल्यामुळे मनपाचा कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. भोळे, खडके, खान, मराठे, साळुंखे यांच्यासारखे अधिकारीदेखील गेल्या वर्षीच सेवानिवृत्त झाले होते. त्यात आता उर्वरित अधिकारीदेखील आता सेवानिवृत्त होत असल्याने मनपाच्या इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची पदेही रिक्त

महापालिकेत अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, २ साहाय्यक उपायुक्त, नगरसचिव, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त महापालिकेतील कर्मचा-यांना पदभार देऊन प्रभारी कारभारी करून काम रेटून नेले जात असल्याचे चित्र सध्या आहे. वारंवार पत्रे पाठवून देखील शासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने पदाधिकारी व प्रशासन हैराण झाले आहे.

अनुकंपाधारकांनाही न्याय नाही, कंत्राटी भरती ही नाही

महापालिकेत सद्यस्थितीत ९०० हून अधिक जागा रिक्त आहेत. महापालिकेच्या आकृतिबंध अजूनही मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत रिक्त जागा भरण्यासाठी महासभेत कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा ठराव देखील काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. मात्र हा ठराव करून पाच महिन्यांच्या वर काय झाला असून, ठरावाची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाही. तसेच अनेक अनुकंपाधारक न्यायाच्या प्रतीक्षेत असून, आंदोलने करून देखील या अनुकंपाधारकांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. जागा रिक्त असताना देखील महापालिका प्रशासनाकडून अनुकंपाधारकांना न्याय दिला जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

-मनपात सध्या काम करत असलेले कर्मचारी - १७००

-मनपाला लागणारे एकूण कर्मचारी संख्या - २७७४

- रिक्त पदे - ९००

- जुलै २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणारे कर्मचारी - १००