शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

जळगावातील सेवानिवृत्त कृषी सहाय्यकाला ३३ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सेवानिवृत्तीची रक्कम विमा कंपनीत गुंतवल्यास चार वर्षांत दाम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सेवानिवृत्तीची रक्कम विमा कंपनीत गुंतवल्यास चार वर्षांत दाम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून रमेश गबा देवरे (रा. अक्कलकोट हौसिंग सोसायटी, खोटेनगर) व त्यांचा मुलगा सुनील यांना ३३ लाख २० हजार ५७२ रुपयाचा ऑनलाइन गंडा घातल्याप्रकरणी मंगळवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रमेश देवरे कृषी विभागात कृषी सहाय्यक या पदावर नोकरीला होते. निवृत्त झाल्यानंतर २०१४ मध्ये गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीचा त्यांना फोन आला. लाइफ प्लस इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून या व्यक्तीने देवरे यांचे पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख विचारली व त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी इन्शुरन्स कंपनीकडून ऑफर आहे, त्यात पैसे गुंतवले तर चार वर्षात रक्कम दुप्पट होईल, असे या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, यानंतर देवरे यांचा मुलगा सुनील यांनीही या व्यक्तीशी संपर्क साधून खात्री केली व तो खरे सांगत असल्याचे खात्री पटल्याने संबंधित व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे अठरा धनादेश तयार केले व दिल्लीच्या पत्त्यावर पाठवले.

असे दिले धनादेश

डिवाइस व्हॅल्यू कार प्रायव्हेट लिमिटेड नावाने १,५२,९५७ रुपयांचे सात धनादेश, ड्रीमलॅण्ड डेव्हलपर्स या नावाने ५५ हजारांचे तीन धनादेश, लाइफ प्लस या नावाने ७७,२१८ रुपयांचे सहा, सिल्व्हर सेंड डेव्हलपर्स या नावाने १६,००५ रुपयांचे दोन असे एकूण १८ धनादेश तयार केले व ते सही करून दिल्लीच्या पत्त्यावर पाठविले. वेगवेगळे बँका व पेटीएमच्या माध्यमातून ही रक्कम कन्हय्यालाल शर्मा, अग्रवाल व गौरव शर्मा यासह वेगवेगळ्या लोकांच्या नावावर वर्ग झाली.

पेन्शन व दागिने मोडून भरले रक्कम

देवरे पिता-पुत्रांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली पेन्शन तसेच घरातील महिलांचे दागिने मोडून वेळोवेळी या इन्शुरन्स कंपनीच्या नावाने फोन केलेल्या लोकांच्या खात्यावर भरली. फेब्रुवारी २१ मध्ये या लोकांकडे पैशाची मागणी केली असता टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय देवरे यांना आला.

देवरे यांचे कोरोनाने निधन

दरम्यान, रमेश देवरे यांचे ८ मार्च २०२१ रोजी कोरोनामुळे निधन झाले. याच काळात गौरव शर्मा याचा देवरे यांच्या मोबाइलवर फोन आला तेव्हा सुनील यांनी वडिलांचे निधन झाले आहे, त्यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम आम्हाला आता परत हवी आहे, असे सांगितले असता संबंधित व्यक्तीने फोन बंद करून बोलणे टाळले. त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव, मोबाइल नंबर तसेच कार्यालयाचा पत्ता विचारला असता तेदेखील टाळण्यात आले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सुनील देवरे यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोट...

अनोळखी व्यक्तींनी केलेल्या फोनवर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. दिल्ली, नोएडा व बिहार या भागात ऑनलाइन फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. कर्ज प्रकरण मंजूर करणे, विमा कंपनीत दामदुप्पट किंवा नोकरी लावणे अशा वेगवेगळ्या आमिषाने हेच गुन्हेगार लोकांशी संपर्क साधून फसवणूक करीत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये अधिकृत विमा कार्यालय जाऊनच व्यवहार करावा.

- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन