शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत दररोज ३ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST

जळगाव आगार : फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनसाठीच सुटताहेत बसेस एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

जळगाव आगार : फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनसाठीच सुटताहेत बसेस

एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे महामंडळाच्या सेवेवर याचा मोठा परिणाम झाला असून, फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडण्यासाठी बसेस बाहेर पडत आहेत. त्यामुळे जळगाव आगाराला संचारबंदीच्या या काळात दररोज ३ लाखांचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचार बंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या सूचनांचे पालन करीत राज्य परिवहन महामंडळानेही पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, लातूर आदी मार्गावरच्या सेवा बंद ठेवून, जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांना सोडण्यासाठीच बस सेवा सुरू ठेवली आहे. तसेच संचारबंदीमुळे नागरिकही घराबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या प्रवासी संख्येवर याचा मोठा परिणाम झाला असून, दररोज काही लाखांवर येणारे उत्पन्न आता काही हजारांवर आले आहे. आधीच कोरोनामुळे निम्म्यावर आलेले उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटले आहे.

इन्फो :

३० ते ४० लाखांचा फटका

शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत जळगाव आगारातर्फे गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बस सेवा सुरू आहे. त्यानुसार संचारबंदीच्या पहिल्या दिवशी आठ फेऱ्या तर दुसऱ्या दिवशी १२ फेऱ्या झाल्या होत्या. यातून दोन दिवसांत फक्त १ लाखांच्या घरात उत्पन्न आले. लॉकडाऊन पूर्वी होणाऱ्या दररोज होणाऱ्या १५० ते २०० फेऱ्या आता संचारबंदीत बोटावर मोजण्या इतक्याच होत असल्याने जळगाव आगाराचे दररोजचे तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न बुडत आहे. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने या १५ दिवसात एकट्या जळगाव आगाराला ३० ते ४० लाखांचा आर्थिक फटका बसणार आहे.

इन्फो :

संचारबंदी असल्याने जळगाव आगारातर्फे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर मार्गावरचे पुरेसे प्रवासी आले तर, त्यांच्या साठीही बसेस सोडण्यात येतील. मात्र, संचारबंदीमुळे त्या प्रकारचे प्रवासीही उपलब्ध होत नसल्याने, याचा महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार