शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

संचारबंदीत दररोज ३ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST

जळगाव आगार : फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनसाठीच सुटताहेत बसेस एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

जळगाव आगार : फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनसाठीच सुटताहेत बसेस

एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे महामंडळाच्या सेवेवर याचा मोठा परिणाम झाला असून, फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडण्यासाठी बसेस बाहेर पडत आहेत. त्यामुळे जळगाव आगाराला संचारबंदीच्या या काळात दररोज ३ लाखांचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचार बंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या सूचनांचे पालन करीत राज्य परिवहन महामंडळानेही पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, लातूर आदी मार्गावरच्या सेवा बंद ठेवून, जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांना सोडण्यासाठीच बस सेवा सुरू ठेवली आहे. तसेच संचारबंदीमुळे नागरिकही घराबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या प्रवासी संख्येवर याचा मोठा परिणाम झाला असून, दररोज काही लाखांवर येणारे उत्पन्न आता काही हजारांवर आले आहे. आधीच कोरोनामुळे निम्म्यावर आलेले उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटले आहे.

इन्फो :

३० ते ४० लाखांचा फटका

शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत जळगाव आगारातर्फे गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बस सेवा सुरू आहे. त्यानुसार संचारबंदीच्या पहिल्या दिवशी आठ फेऱ्या तर दुसऱ्या दिवशी १२ फेऱ्या झाल्या होत्या. यातून दोन दिवसांत फक्त १ लाखांच्या घरात उत्पन्न आले. लॉकडाऊन पूर्वी होणाऱ्या दररोज होणाऱ्या १५० ते २०० फेऱ्या आता संचारबंदीत बोटावर मोजण्या इतक्याच होत असल्याने जळगाव आगाराचे दररोजचे तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न बुडत आहे. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने या १५ दिवसात एकट्या जळगाव आगाराला ३० ते ४० लाखांचा आर्थिक फटका बसणार आहे.

इन्फो :

संचारबंदी असल्याने जळगाव आगारातर्फे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर मार्गावरचे पुरेसे प्रवासी आले तर, त्यांच्या साठीही बसेस सोडण्यात येतील. मात्र, संचारबंदीमुळे त्या प्रकारचे प्रवासीही उपलब्ध होत नसल्याने, याचा महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार