शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीत दररोज ३ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST

जळगाव आगार : फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनसाठीच सुटताहेत बसेस एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

जळगाव आगार : फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनसाठीच सुटताहेत बसेस

एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे महामंडळाच्या सेवेवर याचा मोठा परिणाम झाला असून, फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सोडण्यासाठी बसेस बाहेर पडत आहेत. त्यामुळे जळगाव आगाराला संचारबंदीच्या या काळात दररोज ३ लाखांचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचार बंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या सूचनांचे पालन करीत राज्य परिवहन महामंडळानेही पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, लातूर आदी मार्गावरच्या सेवा बंद ठेवून, जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांना सोडण्यासाठीच बस सेवा सुरू ठेवली आहे. तसेच संचारबंदीमुळे नागरिकही घराबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या प्रवासी संख्येवर याचा मोठा परिणाम झाला असून, दररोज काही लाखांवर येणारे उत्पन्न आता काही हजारांवर आले आहे. आधीच कोरोनामुळे निम्म्यावर आलेले उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटले आहे.

इन्फो :

३० ते ४० लाखांचा फटका

शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत जळगाव आगारातर्फे गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बस सेवा सुरू आहे. त्यानुसार संचारबंदीच्या पहिल्या दिवशी आठ फेऱ्या तर दुसऱ्या दिवशी १२ फेऱ्या झाल्या होत्या. यातून दोन दिवसांत फक्त १ लाखांच्या घरात उत्पन्न आले. लॉकडाऊन पूर्वी होणाऱ्या दररोज होणाऱ्या १५० ते २०० फेऱ्या आता संचारबंदीत बोटावर मोजण्या इतक्याच होत असल्याने जळगाव आगाराचे दररोजचे तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न बुडत आहे. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने या १५ दिवसात एकट्या जळगाव आगाराला ३० ते ४० लाखांचा आर्थिक फटका बसणार आहे.

इन्फो :

संचारबंदी असल्याने जळगाव आगारातर्फे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर मार्गावरचे पुरेसे प्रवासी आले तर, त्यांच्या साठीही बसेस सोडण्यात येतील. मात्र, संचारबंदीमुळे त्या प्रकारचे प्रवासीही उपलब्ध होत नसल्याने, याचा महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार