शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जळगावात पाच टन खाद्य तेलासह २८ किलो लाडू, २४ किलो पेढा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:56 IST

अस्वच्छ स्थितीत तयार केले जात होते पदार्थ

ठळक मुद्देसणासुदीत ‘एफडीए’ची कारवाईसणासुदीत खाद्य पदार्थाबाबत संशय

जळगाव : अस्वच्छ व घाणेरड्या स्थितीत अन्नपदार्थ तयार करीत असल्याने जळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने तपासणी करून तब्बल २८ किलो बेसणाचे लाडू, २४ किलो पेढा आणि ५ टन खाद्यतेल जप्त केले. ऐन सणासुदीत ही कारवाई झाल्याने खाद्य पदार्थ उत्पादनाच्या शुद्धतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.औद्योगिक वसाहत परिसरातील ई-१४ मधील मे. एम.व्ही. फूडस् या कंपनीमध्ये अन्न निरीक्षक विवेक पाटील, अनिल गुजर यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ व घाणेरड्या स्थितीमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासह त्यांची साठवणूक केली जात होती. त्याची पाहणी करून त्यांचे नमुने घेऊन ५ हजार ६०० रुपये किंमतीचे २८ किलो बेसणाचे लाडू व ८ हजार ६४० रुपये किंमतीचा २४ किलो पेढा जप्त करीत तो नष्ट केला.या सोबतच औद्योगिक वसाहतीमधीलच मे. विनायक ट्रेडिंग कंपनी येथेदेखील तपासणी केली असता तेथे सोयाबीनच्या खाद्य तेलाचे नमुने घेतले व संशयावरून तब्बल ४ लाख ६ हजार रुपये किंमतीचे ५ टन खाद्यतेल जप्त केले.या सर्व वस्तूंचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, अनिल सोनार यांनी ही कारवाई केली.सणासुदीत खाद्य पदार्थाबाबत संशयदिवाळी सणाच्या काळामध्ये विविध प्रकारच्या मिठाईसह फरसाणला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यात हे पदार्थ तयार करताना अशुद्ध घटक पदार्थांचा वापर होण्यासह शुद्धतेबाबत दिवसेंदिवस संशय बळावत असून या कारवाईने त्यास एक प्रकारे दुजोराच मिळत आहे. त्यामुळे खाद्य पदार्थ खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :FDAएफडीएJalgaonजळगाव