शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जळगाव जिल्ह्यात सहा वर्षात २५६८ अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:11 IST

सहा महिन्यात ४६५ जण ठार

जळगाव : जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यात जिल्ह्यात ४६५ अपघात झाले असून त्यात २४० जणांचा मृत्यू झाला आहे. ४७७ जण जखमी झालेले आहेत. त्यात ३१५ जण गंभीर तर १६२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात अपघाताचे दर महिन्याला ३०० ते ३५० रुग्ण दाखल होतात, तर खासगी दवाखान्यांची देखील हीच संख्या आहे.मागील वर्षात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या एका वर्षात जिल्ह्यात ८२५ अपघात झाले त्यात ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४४३ जण गंभीर जखमी तर ४५४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. २०१३ ते २०१८ या सहा वर्षात ४ हजार ८९७ अपघात झाले. त्यात २ हजार ५६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार २६३ जण गंभीर तर ४ हजार ५९५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. संपूर्ण देशात दर वर्षी पाच लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. तर जखमींची संख्या त्यापेक्षा दोन ते तीन पट आहे. दरम्यान, शहर व जिल्ह्यात झालेल्या अपघातांची जिल्हा रुग्णालय किंवा पोलीसात नोंद होत नसते. याची आकडेवारी गृहीत धरली तर आणखी संख्या वाढू शकते.आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षाच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागणेही त्याला कारण कारणीभूत आहे. यातील काही बळी हे खड्डे, साईडपट्ट्या तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.ब्लॅक स्पॉटवरच अपघातदेशात दहशवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाºया तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीन पेक्षा जास्त मोठे अपघात झाले असतील तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या अपघाताची कारणे शोधून तेथे उपाय योजना करण्यात आल्या आहे. जळगाव शहरातील महामार्गावरील शिव कॉलनी, तरसोद फाटा व मेहुणबारे असे तीन ब्लॅकस्पॉट जाहीर झाले आहेत. तेथे अद्यापही कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. तीन दिवसांपूर्वी सावखेडा येथील तरुणाचा बळी हा ब्लॅक स्पॉट असलेल्या शिव कॉलनीजवळच गेला.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाहीचवाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नही’ च्या अधिकाºयांची तसेच सर्वपक्षीय पदाधिकाºयांची बैठक घेऊन अपघातास कारणीभूत ठरणाºया अधिकाºयांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत एकाही घटनेत सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा कोणावर दाखल झालेला नाही. उलट गेल्या वर्षी नशिराबादजवळ झालेल्या अपघातात मृत तरुणांविरुध्दच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पोलिसांनी केला होता.अमृत योजनेच्या कामामुळे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यात दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सरासरीपेक्षा २ ते ३ टक्के रुग्ण या अपघातांचे वाढले आहेत. हात,पाय फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील किरकोळ अपघातामुळे जखमींची संख्या वाढली आहे. -डॉ.प्रताप जाधव, अस्थिरोग तज्ज्ञजिल्हा रुग्णालयात अपघाताचे रोज १० ते १५ रुग्ण दाखल होतात. महिन्याचा आकडा ३५० च्यावर आहे. बहुतांश रुग्ण प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात हलविले जातात. प्रत्येक अपघाताचे वेगवेगळे कारण आहे.-डॉ.दत्तात्रय बिराजदार, अतिदक्षता विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Jalgaonजळगाव