शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

जळगाव जिल्ह्यात सहा वर्षात २५६८ अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:11 IST

सहा महिन्यात ४६५ जण ठार

जळगाव : जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यात जिल्ह्यात ४६५ अपघात झाले असून त्यात २४० जणांचा मृत्यू झाला आहे. ४७७ जण जखमी झालेले आहेत. त्यात ३१५ जण गंभीर तर १६२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात अपघाताचे दर महिन्याला ३०० ते ३५० रुग्ण दाखल होतात, तर खासगी दवाखान्यांची देखील हीच संख्या आहे.मागील वर्षात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या एका वर्षात जिल्ह्यात ८२५ अपघात झाले त्यात ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४४३ जण गंभीर जखमी तर ४५४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. २०१३ ते २०१८ या सहा वर्षात ४ हजार ८९७ अपघात झाले. त्यात २ हजार ५६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २ हजार २६३ जण गंभीर तर ४ हजार ५९५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. संपूर्ण देशात दर वर्षी पाच लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. तर जखमींची संख्या त्यापेक्षा दोन ते तीन पट आहे. दरम्यान, शहर व जिल्ह्यात झालेल्या अपघातांची जिल्हा रुग्णालय किंवा पोलीसात नोंद होत नसते. याची आकडेवारी गृहीत धरली तर आणखी संख्या वाढू शकते.आतापर्यंतच्या अपघातात ४० वर्षाच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची आकडेवारी आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागणेही त्याला कारण कारणीभूत आहे. यातील काही बळी हे खड्डे, साईडपट्ट्या तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत.ब्लॅक स्पॉटवरच अपघातदेशात दहशवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाºया तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीन पेक्षा जास्त मोठे अपघात झाले असतील तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या अपघाताची कारणे शोधून तेथे उपाय योजना करण्यात आल्या आहे. जळगाव शहरातील महामार्गावरील शिव कॉलनी, तरसोद फाटा व मेहुणबारे असे तीन ब्लॅकस्पॉट जाहीर झाले आहेत. तेथे अद्यापही कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. तीन दिवसांपूर्वी सावखेडा येथील तरुणाचा बळी हा ब्लॅक स्पॉट असलेल्या शिव कॉलनीजवळच गेला.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाहीचवाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नही’ च्या अधिकाºयांची तसेच सर्वपक्षीय पदाधिकाºयांची बैठक घेऊन अपघातास कारणीभूत ठरणाºया अधिकाºयांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत एकाही घटनेत सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा कोणावर दाखल झालेला नाही. उलट गेल्या वर्षी नशिराबादजवळ झालेल्या अपघातात मृत तरुणांविरुध्दच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पोलिसांनी केला होता.अमृत योजनेच्या कामामुळे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यात दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सरासरीपेक्षा २ ते ३ टक्के रुग्ण या अपघातांचे वाढले आहेत. हात,पाय फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरातील किरकोळ अपघातामुळे जखमींची संख्या वाढली आहे. -डॉ.प्रताप जाधव, अस्थिरोग तज्ज्ञजिल्हा रुग्णालयात अपघाताचे रोज १० ते १५ रुग्ण दाखल होतात. महिन्याचा आकडा ३५० च्यावर आहे. बहुतांश रुग्ण प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात हलविले जातात. प्रत्येक अपघाताचे वेगवेगळे कारण आहे.-डॉ.दत्तात्रय बिराजदार, अतिदक्षता विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Jalgaonजळगाव