शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

वार्षिक योजनेच्या २५० कोटींना कात्री, ६७ टक्के निधी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 14:02 IST

आरोग्य, पाणीपुरवठ्याच्या कामांनाच प्राधान्य

जळगाव : कोरोनामुळे उद््भवलेल्या स्थितीत आर्थिक घडी बसविण्यासाठी शासकीय निधीत ६७ टक्के निधी कपातीचा निर्णय झाल्याने जिल्ह्यातील वार्षिक योजनांसाठी मंजूर ३७५ कोटी रुपयांपैकी आता जिल्ह्याला केवळ १२५ कोटी रुपयांचाच निधी मिळणार आहे. या निर्णयाने जिल्ह्याच्या २५० कोटी रुपयांचा निधी कपात झाला असून मिळणाऱ्या निधीतूनही केवळ आरोग्य व पाणीपुरवठा विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी आता नवीन कामांना मंजुरी देऊ नये तसेच गेल्या वर्षीच्या निधीतून जी कामे सुरू आहेत, तेवढीच पूर्ण करावी, अशा सूचनाही सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात होणाºया परिणामांबाबत उपाययोजना म्हणून शासकीय योजनांच्या निधीत थेट ६७ टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा नियोजन समितीच्यावतीनेही संबंधित सर्व विभागांना पत्र देऊन तसे सूचित करण्यात आले आहे.नवीन कामांना मंजुरी नाहीआगामी आर्थिक वर्षात नवीन कामांना मंजुरी न देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.३१ मेपर्यंत अखर्चित निधी जमा करास्थानिक स्वराज्य संस्थांकडील २०१८-१९ या आर्थिक वर्षातील अखर्चित निधीचा तत्काळ आढावा घेऊन शिल्लक निधी ३१ मे २०२०पर्यंत शासन जमा करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही योजनेचा अखर्चित निधी शिल्लक नसल्याचे संबंधीत यंत्रणेकडून प्रमाणित करुन घ्यावे, असेही निर्देश दिले आहेत.आरोग्य, पाणी योजनांना प्राधान्यमिळणाºया ३३ टक्के निधीतूनही आरोग्य विषयक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याकडील कामांना प्राधान्यक्रम ठेवणे तसेच मान्सूनपूर्व कामे, पाणीपुरवठा हीच कामे करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण, अपारंपारीक उर्जा, नगरोत्थान, नागरी वस्ती सुधारणा, वनक्षेत्रातील मृद व जलसंधारण, पर्यटन, जिल्ह्यातील दळणवळणाची साधने निर्माण करणे, याकरिता रस्ते व पुल बांधणे, नवीन नगरपालिका निर्मिती व हद्दवाढ यामुळे पायाभूत सुविधा देणे, लघुपाटबंधारे योजना व इतर कामांना‘ब्रेक’ लागला आहे.३७.५० कोटी प्राप्तजिल्ह्यासाठी मंजूर ३७५ कोटी रुपयांच्या १० टक्के अर्थात ३७.५० कोटी रुपये जिल्ह्याला मिळालेले आहे. मात्र त्यातीलही २५ टक्के रक्कम ही कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना आहेत.जिल्ह्याची वार्षिक मदार १२५ कोटींवर अवलंबूनसर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२०-२०२१ च्या राज्यस्तरीय बैठकीत जळगाव जिल्ह्यासाठी ३७५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता यापैकी केवळ ३३ टक्के अर्थात १२५ कोटी रुपयांचाच निधी जिल्ह्यासाठी मिळणार आहे. या निर्णयाने थेट २५० कोटी रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता वर्षभर १२५ कोटींवर अवलंबून राहावे लागणार आहे.जिल्हा वार्षिक योजना २०२०-२०२१ अर्थसंकल्पीय निधीच्या केवळ ३३ टक्के निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकूण मंजूर निधी ३७५ कोटीपैकी केवळ १२५ कोटी रुपयांचाच निधी जिल्ह्यासाठी मिळणार आहे. सदर निधीतून २५ टक्के निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावयाचा आहे. उर्वरित शिल्लक निधी प्रगतीपथावरील व पूर्ण झालेल्या कामांसाठीच वापरता येणार आहे. सदरील निधीतून कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामांना मंजुरी देता येणार नाही. या संदर्भात संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.- प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव