शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

25 कोटींचा प्रस्ताव वादात

By admin | Updated: March 7, 2017 00:40 IST

आमदारांची नगरविकास सचिवांकडे तक्रार : प्रस्तावात बदल करण्याचा प्रय}

जळगाव : गेल्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी मनपाला जाहीर केलेल्या 25 कोटींच्या निधीचा प्रस्ताव अद्यापही वादातच अडकला आहे. आता दुस:यांदा मनपाने ठराव करून शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव बदल करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन पूर्वी झालेल्या रस्त्यांचाच यात समावेश झाल्याची तक्रार केली आहे.  खराब रस्त्यांचा या प्रस्तावात समावेश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांना शहरातील रस्त्यांचा सव्र्हे करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे हा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शहरातील विकासकामांमध्ये अडचणी येत असल्याचे निवेदन प्रथमच जळगाव दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना भाजपा नगरसेवकांतर्फे देण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी 25 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मनपाने महासभेत हा प्रस्ताव मंजूर करून शासनाला पाठवला होता. मात्र, शासनाने अर्थसंकल्पात तरतूदच न केल्याने निधी मिळू शकला नव्हता. दरम्यानच्या काळात या प्रस्तावात समाविष्ट असलेले, परंतु अत्यंत दुरवस्था झालेल्या काही रस्त्यांची कामे सुमारे पावणेचार कोटींच्या निधीतून करण्यात आली होती. त्यानंतर महापौर नितीन लढ्ढा यांनी या 25 कोटींच्या निधीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. जामनेर दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर झाल्याचे पत्र तातडीने मनपाला पाठवले. त्यामुळे मनपाने जुन्या प्रस्तावातून पावणेचार कोटींची झालेली कामे वगळून त्यात नवीन कामांचा समावेश करून तो प्रस्ताव शासनाला पाठवला. शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पडून आहे. दरम्यान, या प्रस्तावात सुचवलेली 11 कोटींची कामे कायम ठेवून उर्वरित निधीतून अत्यावश्यक रस्ते व गटारींची कामे करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे आमदार भोळे म्हणाले.आमदार म्हणतात, प्रस्ताव दाखवलाच नाही1 आमदार भोळे यांच्या म्हणण्यानुसार सर्वानुमते हा ठराव केला तर तो पाठवण्यापूर्वी त्यांना दाखवायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. तसेच या प्रस्तावात पूर्वी झालेल्या रस्त्यांची कामे समाविष्ट करू नये, असे सांगितले असतानाही पूर्वी काम झालेल्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला. कॉलनी एरियात रस्ते, गटारींची अत्यंत दुरवस्था झाली आहे.2 30 वर्षापासून काही भागात रस्ते, गटारींची कामे झालेली नाही. झालेल्या रस्त्यांचीच कामे पुन्हा करण्याऐवजी या रस्त्यांची कामे समाविष्ट करण्याची गरज होती. आम्हाला प्रस्ताव दाखवला असता तर काही बदल सुचवले असते व विरोधाची भूमिका घेण्याची वेळच आली नसती.3 त्यासाठी महापौरांशी फोनवरून बोललोही होतो. मात्र, न दाखवताच प्रस्ताव पाठवल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांना ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रस्तावात बदल करण्यासाठी प्रय}शील असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सव्र्हे करून कामांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आहे.