शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

25 कोटींचा प्रस्ताव वादात

By admin | Updated: March 7, 2017 00:40 IST

आमदारांची नगरविकास सचिवांकडे तक्रार : प्रस्तावात बदल करण्याचा प्रय}

जळगाव : गेल्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी मनपाला जाहीर केलेल्या 25 कोटींच्या निधीचा प्रस्ताव अद्यापही वादातच अडकला आहे. आता दुस:यांदा मनपाने ठराव करून शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव बदल करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन पूर्वी झालेल्या रस्त्यांचाच यात समावेश झाल्याची तक्रार केली आहे.  खराब रस्त्यांचा या प्रस्तावात समावेश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांना शहरातील रस्त्यांचा सव्र्हे करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे हा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शहरातील विकासकामांमध्ये अडचणी येत असल्याचे निवेदन प्रथमच जळगाव दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना भाजपा नगरसेवकांतर्फे देण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी 25 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मनपाने महासभेत हा प्रस्ताव मंजूर करून शासनाला पाठवला होता. मात्र, शासनाने अर्थसंकल्पात तरतूदच न केल्याने निधी मिळू शकला नव्हता. दरम्यानच्या काळात या प्रस्तावात समाविष्ट असलेले, परंतु अत्यंत दुरवस्था झालेल्या काही रस्त्यांची कामे सुमारे पावणेचार कोटींच्या निधीतून करण्यात आली होती. त्यानंतर महापौर नितीन लढ्ढा यांनी या 25 कोटींच्या निधीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. जामनेर दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर झाल्याचे पत्र तातडीने मनपाला पाठवले. त्यामुळे मनपाने जुन्या प्रस्तावातून पावणेचार कोटींची झालेली कामे वगळून त्यात नवीन कामांचा समावेश करून तो प्रस्ताव शासनाला पाठवला. शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पडून आहे. दरम्यान, या प्रस्तावात सुचवलेली 11 कोटींची कामे कायम ठेवून उर्वरित निधीतून अत्यावश्यक रस्ते व गटारींची कामे करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे आमदार भोळे म्हणाले.आमदार म्हणतात, प्रस्ताव दाखवलाच नाही1 आमदार भोळे यांच्या म्हणण्यानुसार सर्वानुमते हा ठराव केला तर तो पाठवण्यापूर्वी त्यांना दाखवायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. तसेच या प्रस्तावात पूर्वी झालेल्या रस्त्यांची कामे समाविष्ट करू नये, असे सांगितले असतानाही पूर्वी काम झालेल्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला. कॉलनी एरियात रस्ते, गटारींची अत्यंत दुरवस्था झाली आहे.2 30 वर्षापासून काही भागात रस्ते, गटारींची कामे झालेली नाही. झालेल्या रस्त्यांचीच कामे पुन्हा करण्याऐवजी या रस्त्यांची कामे समाविष्ट करण्याची गरज होती. आम्हाला प्रस्ताव दाखवला असता तर काही बदल सुचवले असते व विरोधाची भूमिका घेण्याची वेळच आली नसती.3 त्यासाठी महापौरांशी फोनवरून बोललोही होतो. मात्र, न दाखवताच प्रस्ताव पाठवल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांना ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रस्तावात बदल करण्यासाठी प्रय}शील असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सव्र्हे करून कामांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आहे.