शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

जिल्हा परिषद शाळांमधील २४३ वर्गखोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

डमी - स्टार - ८१५ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ...

डमी - स्टार - ८१५

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १८२८ शाळा आहेत. या शाळांमधील २४३ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या धोकादायक झाल्या आहेत़ ह्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत.

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाचन आनंद दिवस, ज्ञान रचनावाद, डिजिटल शाळा, अक्षर सुधार कार्यक्रम असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षाही स्मार्ट व्हाव्यात यासाठी जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. परंतु अपुऱ्या निधीमुळे व दुर्लक्षामुळे जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २४३ वर्गखोल्या ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत. अनेक शाळा तर वर्षानुवर्षापासून पडक्या स्वरूपात पडून आहेत़ अशा शाळांची तत्काळ दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

-----

पॉइंटर्स

जिल्ह्यातील एकूण शाळा- १८२८

एकूण विद्यार्थी - ६२३९९६

वर्गखोल्यांच्या दुरुस्ती आवश्यकता : २४३

-----

कोणत्या तालुक्यात किती धोकादायक?

अमळनेर - ०८

भडगाव - ०९

भुसावळ - ०६

बोदवड - १२

चाळीसगाव - ३०

चोपडा - २१

धरणगाव - १५

एरंडोल - २०

जळगाव ग्रामीण - १४

जामनेर - २४

मुक्ताईनगर - १८

पाचोरा - ०९

पारोळा - २१

रावेर - १८

यावल - १८

---

२२३ नवीन वर्गखोल्यांना मंजुरी

जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याकडून धोकादायक वर्गखोल्यांची माहिती मागविली होती, त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सुमारे २४३ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील वर्षी नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जिल्हा नियोजनच्या बैठकीत जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन २२३ वर्गखोल्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे़ यासाठी आता निविदा प्रक्रिया राबविण्यात येते आहे़ प्रत्येक वर्ग खोलीच्या बांधकामासाठी साडेआठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

----

अशा शाळेत मुले पाठवायची कशी?

सध्या शाळा बंद आहेत़ पण, शाळा सुरू झाल्यानंतर पावसाळ्यात शाळेच्या आवारात असलेल्या धोकादायक वर्गखोल्या पावसाळ्यात कधीही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका असताना मुलांना शाळेत कसे पाठवावे याबाबत संभव आहे.

- पंढरीनाथ कोळी, पालक

-----

पावसाळ्यात अनेकवेळा जिल्हा परिषद शाळांचे नुकसान होते़ ती कोसळतात तर कधी पत्र उडून जातात. त्यामुळे पावसाळ्यात शाळांमध्ये अनेकदा मुलांना पाठविण्याची भीती वाटते. अशा परिस्थितीत शाळेच्या आवारात मोडकळीस आलेली इमारत असेल तर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.

- संजीव पाटील, पालक