शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

शहरातील २ हजार ४०० फेरीवाल्यांना मिळणार दीड हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात पंधरा दिवस संचारबंदी लागू केली असून, अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय वगळता इतर सर्व ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात पंधरा दिवस संचारबंदी लागू केली असून, अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत, तर व्यवसाय बंद राहणाऱ्या फेरीवाल्यांना दीड हजार आर्थिक साहाय्य देण्याचे घोषित केले असून, जळगाव शहरातील यात

२ हजार ४०० फेरीवाल्यांचा समावेश आहे. मात्र, शासनाच्या या तुटपुंजा मदतीत पुरेसा किराणाही होणार नसल्याचे शहरातील फेरीवाल्यांनी शासनाच्या मदतीवर आपले मत व्यक्त केले.

शासनाने लागू केलेल्या १५ दिवसांच्या संचारबंदीत भाजीपाला, फळे, किराणा दुकान, मेडिकल, किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते, कृषी अवजारे यांना वगळून इतर सर्व फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव शहरात आजच्या स्थितीत नोंदणीकृत २ हजार ४०० विविध प्रकारचे फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांना संचारबंदीत दीड हजात रुपये आर्थिक मदत करण्याबाबतचे आदेश जळगाव मनपाला प्राप्त झाले आहेत. शहरातील मनपाकडे नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांनाच ही मदत मिळणार असून, लवकरच याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली. या फेरीवाल्यांना थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत, ज्या फेरीवाल्यांचे मनपाकडे खाते क्रमांक नसतील, त्यांचे खाते क्रमांक मनपाकडून मागवून घेतले जाणार आहेत. मात्र, ही रक्कम शासनाने द्यायची की मनपाने, याबाबत शासनाकडून कळविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

फेरीवाले म्हणतात..दीड हजारात काय होणार

- दिवसाला साधारणतः ४०० ते ५०० रुपये रोज व्यवसायात सुटतो. पंधरा दिवस व्यवसाय बंद ठेवल्यावर आठ ते दहा हजारांचे नुकसान होणार आहे आणि शासन त्यात फक्त दीड हजार रुपयांची मदत करते. यात तर पुरेसा किराणाही होणार नाही. शासनाने निदान या रकमेच्या तिप्पट मदत करावी.

रमेश वाणी, फेरीवाले

शासनाने या संचारबंदीत निम्म्या व्यवसायांना परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी कायम आहे, तर काही व्यावसायिकांना दीड हजार रुपयांची घोषणा केली असली तरी, या तुटपुंजा रकमेत घर कसे चालवणार.

संजय बाविस्कर, फेरीवाले

शासनाने जी मदत दिली, ती बरी आहे. कारण, गेल्या वर्षी तर काहीच मिळाले नव्हते. मात्र, शासनाने दिवसभरात काही वेळ व्यवसाय करण्याची परवानगी द्यायला हवी, तरच आमचा संसार सुरळीत चालेल.

योगेश पाटील, फेरीवाला

इन्फो : शहरातील नोंदणीकृत फेरीवाले २ हजार ४००

इन्फो :

काय समस्या

यावेळी फेरीवाल्यांनी कोरोना काळात शासनाने त्यांच्यासाठीही विमा संरक्षण लागू करण्याची, तसेच घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी केली.