शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

३० ऐवजी रेशनवर मिळतोय २१ किलो गहू

By admin | Updated: March 29, 2017 00:30 IST

्ररेशन दुकानदारांची मनमानी : जामनेर तालुक्यात पुरवठा विभागाचे डोळ्यावर कातडे

जामनेर : तालुक्यात शासनाने अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकेवर ग्राहकाला मार्च महिन्यासाठी २ रुपये  दराने ३० किलो गहू उपलब्ध करून दिला आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकाला ३० किलोऐवजी फक्त २१ किलो गहू देत असल्याच्या तक्रारी असून, याबाबत ‘लोकमत’ने स्टिींग केले असता ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी गहू देऊन उर्वरित गव्हाचा काळाबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे, दरम्यान, पुरवठा अधिकाºयांचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.गव्हाचा काळाबाजार?दारिद्र्यरेषेखालील कुटुंंबासह अन्य आर्थिक दुर्बल जनतेला शासनाकडून दरमहा अत्यल्प किमतीमध्ये गहू मिळतो. महिन्याकाठी  कार्डावर गहू २१ किलो व १४ किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र चालू महिन्यात   स्वस्त धान्य दुकानदारांकडून  दोन रुपये किलो दराने ३० किलो गहू  व पाच किलो तांदूळ देण्याचे शासनाने नियोजन केले असले तरी याचे विपरीत चित्र दिसत आहे. कार्डधारकाला पूर्वीप्रमाणेच २१ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्याची पद्धत रेशन दुकानदारांनी अवलंबली आहे.  ग्राहकांची दिशाभूल करून एका कार्डामागे तब्बल  ९ किलो  गव्हाचा मलिदा हे दुकानदार  लाटत असून, या गव्हाचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचे चित्र आहे.६ हजार क्विंटलचा साठा  तालुकाभरातील अंत्योदय योजनेचे लाभार्थी १० हजार ४५२, तर प्राधान्य कुटुंंब शिधापत्रिकाधारक १७ हजार ९७८  असे  एकूण २८ हजार ४५० कुटुंबांसाठी सुमारे ६ हजार क्विंटल गव्हाचा पुरवठा या महिन्यात करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना  पुरवठा विभागाकडून गहू फक्त १ रुपया ३० पैसे प्रती किलोने वितरित केला जातो, तर ग्राहकासाठी गव्हाचा दर शासनाने फक्त दोन रुपये किलो ठेवला आहे.दरम्यान, अंत्योदय योजनेत प्रती कार्ड २१ किलोऐवजी आता ३० किलोचे वाटप शासनाने जाहीर केले असले तरी ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दुकानदार प्रती कार्ड २१ किलो गहू वितरित करीत आहे तर प्राधान्य कार्डावर १८ किलो गहू वितरित करीत आहेत. काळ्याबाजारातून चांदीस्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून १ रुपया ३० पैसे किलो दराने मिळणारा हाच गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी गेला तर त्या गव्हाचा भाव चक्क  २ हजार रुपये ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत जातो. यावरून रेशन दुकानदारांची चांदी होत  असून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची तालुकाभरात सध्या चर्चा रंगू लागली आहे.  तालुक्यात दोन रुपये किलो दराने ३० किलो गहू कार्डावर मिळत असल्याची माहितीच अद्यापपर्यंत अनेक ग्राहकांना नसल्याचा गैरफायदा सध्या दुकानदारांनी घेतला असून  त्यांना आवर कोण घालणार, हा प्रश्न  सध्या अनुत्तरित असाच  आहे. अधिकाºयांचे दुर्लक्षतालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांची फसवणूक करतात, हक्काचे गहू काळ्याबाजारात विक्री करीत असूनसुद्धा अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत    आहे.स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी तालुक्यात पावणेदोनशे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यातील अनेकांकडे तीन ते चार दुकानांची मालकी असल्याचेही सांगण्यात येते.  अनेक दुकानदार आपला कारभार मनमानीपणे चालवित असल्याच्यादेखील तक्रारी आहेत. त्यात दुकान वेळेवर न उघडणे, एका महिन्यात केवळ पाच ते सात दिवसच दुकान उघडणे, दुकानात दक्षता समिती तसेच पुरवठा साठा यांचे फलक न लावणे, पुरेशा प्रमाणात ग्राहकांना धान्याचा पुरवठा न करणे, चालूृ महिन्यातील धान्य दुसºया महिन्यात ग्राहकांना देणे असे मनमानी प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी एकाही दुकानदारावर पुरवठा विभागाकडून कारवाई झालेली नाही.  परिणामी नवनियुक्त तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी प्रत्येक दुकानाची चौकशी करून गैरकृत्य करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.                            शिधापत्रिकाधारकास शासन नियमानुसार धान्य वाटप न करणाºया दुकानदाराबाबत तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाईल. शिधापत्रिकाधारकास शासनाने निर्धारित केलेल्या दरातच वाटप केले जावे. याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले जातील.-नामदेव टिळेकरतहसीलदार, जामनेर मार्च महिन्यात अंत्योदय कार्डावर ३० किलो गहू ,                 ५ किलो तांदूळ शासनाने उपलब्ध केला आहे. जर कुणी दुकानदार ग्राहकांची फसवणूक करीत त्याला कमी धान्य देत असेल तर त्या दुकानदारांची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवारीही करू.             -अतुल सानप,                      पुरवठा निरीक्षक, जामनेर