शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

३० ऐवजी रेशनवर मिळतोय २१ किलो गहू

By admin | Updated: March 29, 2017 00:30 IST

्ररेशन दुकानदारांची मनमानी : जामनेर तालुक्यात पुरवठा विभागाचे डोळ्यावर कातडे

जामनेर : तालुक्यात शासनाने अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकेवर ग्राहकाला मार्च महिन्यासाठी २ रुपये  दराने ३० किलो गहू उपलब्ध करून दिला आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकाला ३० किलोऐवजी फक्त २१ किलो गहू देत असल्याच्या तक्रारी असून, याबाबत ‘लोकमत’ने स्टिींग केले असता ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी गहू देऊन उर्वरित गव्हाचा काळाबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे, दरम्यान, पुरवठा अधिकाºयांचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.गव्हाचा काळाबाजार?दारिद्र्यरेषेखालील कुटुंंबासह अन्य आर्थिक दुर्बल जनतेला शासनाकडून दरमहा अत्यल्प किमतीमध्ये गहू मिळतो. महिन्याकाठी  कार्डावर गहू २१ किलो व १४ किलो तांदूळ देण्यात येतो. मात्र चालू महिन्यात   स्वस्त धान्य दुकानदारांकडून  दोन रुपये किलो दराने ३० किलो गहू  व पाच किलो तांदूळ देण्याचे शासनाने नियोजन केले असले तरी याचे विपरीत चित्र दिसत आहे. कार्डधारकाला पूर्वीप्रमाणेच २१ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्याची पद्धत रेशन दुकानदारांनी अवलंबली आहे.  ग्राहकांची दिशाभूल करून एका कार्डामागे तब्बल  ९ किलो  गव्हाचा मलिदा हे दुकानदार  लाटत असून, या गव्हाचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचे चित्र आहे.६ हजार क्विंटलचा साठा  तालुकाभरातील अंत्योदय योजनेचे लाभार्थी १० हजार ४५२, तर प्राधान्य कुटुंंब शिधापत्रिकाधारक १७ हजार ९७८  असे  एकूण २८ हजार ४५० कुटुंबांसाठी सुमारे ६ हजार क्विंटल गव्हाचा पुरवठा या महिन्यात करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना  पुरवठा विभागाकडून गहू फक्त १ रुपया ३० पैसे प्रती किलोने वितरित केला जातो, तर ग्राहकासाठी गव्हाचा दर शासनाने फक्त दोन रुपये किलो ठेवला आहे.दरम्यान, अंत्योदय योजनेत प्रती कार्ड २१ किलोऐवजी आता ३० किलोचे वाटप शासनाने जाहीर केले असले तरी ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दुकानदार प्रती कार्ड २१ किलो गहू वितरित करीत आहे तर प्राधान्य कार्डावर १८ किलो गहू वितरित करीत आहेत. काळ्याबाजारातून चांदीस्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून १ रुपया ३० पैसे किलो दराने मिळणारा हाच गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी गेला तर त्या गव्हाचा भाव चक्क  २ हजार रुपये ते २२०० रुपये क्विंटलपर्यंत जातो. यावरून रेशन दुकानदारांची चांदी होत  असून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची तालुकाभरात सध्या चर्चा रंगू लागली आहे.  तालुक्यात दोन रुपये किलो दराने ३० किलो गहू कार्डावर मिळत असल्याची माहितीच अद्यापपर्यंत अनेक ग्राहकांना नसल्याचा गैरफायदा सध्या दुकानदारांनी घेतला असून  त्यांना आवर कोण घालणार, हा प्रश्न  सध्या अनुत्तरित असाच  आहे. अधिकाºयांचे दुर्लक्षतालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांची फसवणूक करतात, हक्काचे गहू काळ्याबाजारात विक्री करीत असूनसुद्धा अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत    आहे.स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी तालुक्यात पावणेदोनशे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यातील अनेकांकडे तीन ते चार दुकानांची मालकी असल्याचेही सांगण्यात येते.  अनेक दुकानदार आपला कारभार मनमानीपणे चालवित असल्याच्यादेखील तक्रारी आहेत. त्यात दुकान वेळेवर न उघडणे, एका महिन्यात केवळ पाच ते सात दिवसच दुकान उघडणे, दुकानात दक्षता समिती तसेच पुरवठा साठा यांचे फलक न लावणे, पुरेशा प्रमाणात ग्राहकांना धान्याचा पुरवठा न करणे, चालूृ महिन्यातील धान्य दुसºया महिन्यात ग्राहकांना देणे असे मनमानी प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी एकाही दुकानदारावर पुरवठा विभागाकडून कारवाई झालेली नाही.  परिणामी नवनियुक्त तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी प्रत्येक दुकानाची चौकशी करून गैरकृत्य करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.                            शिधापत्रिकाधारकास शासन नियमानुसार धान्य वाटप न करणाºया दुकानदाराबाबत तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाईल. शिधापत्रिकाधारकास शासनाने निर्धारित केलेल्या दरातच वाटप केले जावे. याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले जातील.-नामदेव टिळेकरतहसीलदार, जामनेर मार्च महिन्यात अंत्योदय कार्डावर ३० किलो गहू ,                 ५ किलो तांदूळ शासनाने उपलब्ध केला आहे. जर कुणी दुकानदार ग्राहकांची फसवणूक करीत त्याला कमी धान्य देत असेल तर त्या दुकानदारांची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवारीही करू.             -अतुल सानप,                      पुरवठा निरीक्षक, जामनेर