शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:50 IST

शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले

ठळक मुद्दे१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला पाठविलेपावसामुळे साथीच्या आजारांची भितीडेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती

जळगाव : शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १० रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिली आहे.भाईटेनगरातील एक सहा वर्षीय बालक, आदर्शनगरातील तरुणासह तब्बल २१ जणांना डेंग्यू सदृश आजार झाला आहे. या सोबतच रक्त तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याचे सांगण्यात येत असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढजून महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला. तसेच जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढल्या.यात अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. भोईटेनगरातील सहा वर्षीय बालकास त्याची लागण झाली होती. तसेच गेल्या आठवड्याभरात जोरदार पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मनपा आरोग्य विभागाच्या तपासणीत २१ रुग्णांना डेंग्यू सदृश आजार झाल्याचे आढळून आले आहे. पावसामुळे अनेक ठिंकाणी पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.मनपाकडून फवारणी सुरुमनपा प्रशासनाकडून ज्या भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागांमध्ये धुरळणी व फवारणी सुरु केली आहे. गणपतीनगर, जयनगर यासारख्या उच्चभ्रू रहिवासी भागांसह भोईटेनगरमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने तेथे धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटिंगचे काम केले जात असल्याची माहिती मनपा मलेरिया निर्मूलन विभागाकडून देण्यात आली आहे.प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन नाहीसाथीच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचा तक्रारी मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेवून, शहरात प्रभागनिहाय धुरळणी व फवारणी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप देखील मनपा आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराच्या जवळपास कुठेही पाणी साचू देऊ नये, तसेच सेप्टिक टँकच्या गॅस पाईपला जाळी बसवून घ्यावी, असे आवाहन मलेरिया निर्मूलन विभागाने केले आहे.१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला रवानाशहरात आढळलेल्या २१ संशयित रुग्णांपैकी १० रुग्णांच्या रक्तांचे नमुने औरंगाबादला पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे शहरात ८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने खबरदारी घेवून तत्काळ रुग्णांचे नमुने औरंगाबादा पाठविले आहेत. दोन दिवसात या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका