शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:50 IST

शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले

ठळक मुद्दे१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला पाठविलेपावसामुळे साथीच्या आजारांची भितीडेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती

जळगाव : शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १० रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिली आहे.भाईटेनगरातील एक सहा वर्षीय बालक, आदर्शनगरातील तरुणासह तब्बल २१ जणांना डेंग्यू सदृश आजार झाला आहे. या सोबतच रक्त तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याचे सांगण्यात येत असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढजून महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला. तसेच जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढल्या.यात अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. भोईटेनगरातील सहा वर्षीय बालकास त्याची लागण झाली होती. तसेच गेल्या आठवड्याभरात जोरदार पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मनपा आरोग्य विभागाच्या तपासणीत २१ रुग्णांना डेंग्यू सदृश आजार झाल्याचे आढळून आले आहे. पावसामुळे अनेक ठिंकाणी पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.मनपाकडून फवारणी सुरुमनपा प्रशासनाकडून ज्या भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागांमध्ये धुरळणी व फवारणी सुरु केली आहे. गणपतीनगर, जयनगर यासारख्या उच्चभ्रू रहिवासी भागांसह भोईटेनगरमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने तेथे धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटिंगचे काम केले जात असल्याची माहिती मनपा मलेरिया निर्मूलन विभागाकडून देण्यात आली आहे.प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन नाहीसाथीच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचा तक्रारी मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेवून, शहरात प्रभागनिहाय धुरळणी व फवारणी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप देखील मनपा आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराच्या जवळपास कुठेही पाणी साचू देऊ नये, तसेच सेप्टिक टँकच्या गॅस पाईपला जाळी बसवून घ्यावी, असे आवाहन मलेरिया निर्मूलन विभागाने केले आहे.१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला रवानाशहरात आढळलेल्या २१ संशयित रुग्णांपैकी १० रुग्णांच्या रक्तांचे नमुने औरंगाबादला पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे शहरात ८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने खबरदारी घेवून तत्काळ रुग्णांचे नमुने औरंगाबादा पाठविले आहेत. दोन दिवसात या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका