शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:50 IST

शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले

ठळक मुद्दे१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला पाठविलेपावसामुळे साथीच्या आजारांची भितीडेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती

जळगाव : शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १० रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिली आहे.भाईटेनगरातील एक सहा वर्षीय बालक, आदर्शनगरातील तरुणासह तब्बल २१ जणांना डेंग्यू सदृश आजार झाला आहे. या सोबतच रक्त तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याचे सांगण्यात येत असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढजून महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला. तसेच जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढल्या.यात अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. भोईटेनगरातील सहा वर्षीय बालकास त्याची लागण झाली होती. तसेच गेल्या आठवड्याभरात जोरदार पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मनपा आरोग्य विभागाच्या तपासणीत २१ रुग्णांना डेंग्यू सदृश आजार झाल्याचे आढळून आले आहे. पावसामुळे अनेक ठिंकाणी पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.मनपाकडून फवारणी सुरुमनपा प्रशासनाकडून ज्या भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागांमध्ये धुरळणी व फवारणी सुरु केली आहे. गणपतीनगर, जयनगर यासारख्या उच्चभ्रू रहिवासी भागांसह भोईटेनगरमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने तेथे धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटिंगचे काम केले जात असल्याची माहिती मनपा मलेरिया निर्मूलन विभागाकडून देण्यात आली आहे.प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन नाहीसाथीच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचा तक्रारी मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेवून, शहरात प्रभागनिहाय धुरळणी व फवारणी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप देखील मनपा आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराच्या जवळपास कुठेही पाणी साचू देऊ नये, तसेच सेप्टिक टँकच्या गॅस पाईपला जाळी बसवून घ्यावी, असे आवाहन मलेरिया निर्मूलन विभागाने केले आहे.१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला रवानाशहरात आढळलेल्या २१ संशयित रुग्णांपैकी १० रुग्णांच्या रक्तांचे नमुने औरंगाबादला पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे शहरात ८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने खबरदारी घेवून तत्काळ रुग्णांचे नमुने औरंगाबादा पाठविले आहेत. दोन दिवसात या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका