शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जामनेर आगारातून एसटीच्या २०४ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 15:46 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच जनजीवन पूर्ववत सुरू होत आहे

ठळक मुद्दे ग्रामीण भागातून प्रवाशांचा प्रतिसाद कमीजामनेर आगारातून २०४ फेऱ्या सुरू

जामनेर : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच जनजीवन पूर्ववत सुरू होत आहे. सहा महिने आगारातच थांबून राहिलेली एसटी आता थोड्याफार प्रमाणात धावतांना दिसत आहे. बसस्थानकावर प्रवाशांची पाहिजे तशी वर्दळ दिसून येत नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या जामनेर आगाराने सुरू केल्या, मात्र ग्रामीण भागातील गाव खेड्यातील फेऱ्या अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.दरम्यान, सोमवार २६ ऑक्टोबरपासून जामनेर येथून जळगावसाठी पहाट पाच ते रात्रीपर्यंत प्रत्येक २० मिनिटांच्या अंतराने नियमीत सेवा सुररू होत आहे. भुसावळसाठी नियमीत फेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.व्यापारी बाजारपेठ खुली झाल्याने व शेतकरी आपला शेती माल विक्रीसाठी आणू लागल्याने तालुक्याच्या ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. दळणवळणाचे साधन म्हणून एसटीकडे पहिले जाते. सुरुवातीच्या काळात प्रवाशांमध्ये काहीशी भीती दिसत असल्याने एसटीला प्रवासी मिळत नव्हते.जामनेर आगारातूनसुरू असलेल्या फेऱ्या २०४रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या ३५दररोजचे किमी साडेनऊ हजारदररोजचे उत्पन्न २ लाखलॉकडाऊनपूर्वी दररोज ६५० फेऱ्या व दररोजचे उत्पन्न साडे आठ लाख

जामनेर आगारातून सध्या परराज्यात सुरत व बऱ्हापूर येथील व जिल्ह्याबाहेर पुणे, नाशिक, नंदुरबार व बुलढाणा येथील नियमित फेऱ्या सुरू आहेत. जामनेर जळगाव अर्ध्या तासाच्या अंतराने गाडी सोडली जाते. भुसावळला दिवसातून १२ फेऱ्या होतात. ग्रामीण भागात १२ टक्के वाहतूक सुरू झाली असून कापूस वेचणी आदी शेतीची कामे सुरू असल्याने प्रवासी वाहतूक मंदावल्याने दिसून येते, अशी माहिती आगारप्रमुख कमलेश धनराळे यांनी दिली.

टॅग्स :StrikeसंपJamnerजामनेर