शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तीन दिवसात १८ जणांची चौकशी; मात्र अजूनही धागा गवसेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:15 IST

कुसुंब्यातील दुहेरी हत्याकांड : तंत्रज्ञानाचाही आधार जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची ...

कुसुंब्यातील दुहेरी हत्याकांड : तंत्रज्ञानाचाही आधार

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचे हत्याकांड उघड होऊन तीन दिवस उलटले आहेत. या काळात पोलिसांनी संशयावरून १८ जणांची वेगवेगळी चौकशी केली. त्याशिवाय तंत्रज्ञानाचाही आधार घेण्यात आला आहे. मात्र, कुठलाच धागा गवसला नाही.

मुरलीधर व आशाबाई पाटील यांचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजेनंतर घडल्याचा अंदाज आहे. मुरलीधर व आशाबाई दोघांच्या गळ्यावर फास दिल्याचे व्रण आहेत. तर शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. ओळखीच्या व्यक्तीकडूनच ही घटना घडली असावी व त्यातही मारेकरी दोनपेक्षा जास्त जण असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शेवटचा काॅल रात्री पावणेअकरा वाजता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई यांनी बुधवारी पावणे अकरा वाजता कुसुंब्यातील एका महिलेला फोन करून व्याजाने दिलेल्या पैशांची मागणी केली होती. आशाबाई यांनी या महिलेला तीन वेळा फोन केल्याचे तपासात उघड झाले आहे, मात्र या घटनेशी त्या महिलेचा काही संबंध आहे का? याचीही पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली, मात्र ठोस अशी माहिती मिळाली नाही.

आशाबाई यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचा अनेकांशी वाद होता. घरात सतत पाच ते दहा लाख रुपये असायचे, शिवाय २२ तोळ्यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असायचे. दरोडा किंवा लुटीच्या उद्देशाने ही घटना घडली आहे का? या दिशेने तपास सुरू आहे. तसे असेल तर अहमदनगर जिल्ह्यातील पारधी टोळीवर संशय व्यक्त केला जात आहे.

या शक्यतांची केली पडताळणी

मुरलीधर पाटील यांचा बुधवारी दुपारी आणि रात्री रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद झाला होता, त्याची तसेच पाटील ज्या ब्रोकरकडे कामाला होते, त्या ब्रोकरची दिवसभर चौकशी करण्यात आली. आई व मुलगी यांच्यात फारसे पटत नव्हते. तो धागाही तपासण्यात आला. आणखी काही शक्यता अशा आहेत त्या जाहीर करण्यासारख्या नाहीत, पण त्याचीही पडताळणी केली जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व निरीक्षक प्रताप शिकारे आदींनी पोलीस ठाण्यालाच नियंत्रण कक्ष बनविला असून हे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत.