शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बोहरा येथील १७६ अंशतः बाधित कुटुंबांचे स्थलांतर करण्यात यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST

अमळनेर : तालुक्यातील बोहरा येथील निम्न तापी प्रकल्पातील टप्पा दोनमधील अंशतः बाधित घोषित असलेल्या १७६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे ...

अमळनेर : तालुक्यातील बोहरा येथील निम्न तापी प्रकल्पातील टप्पा दोनमधील अंशतः बाधित घोषित असलेल्या १७६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी रिपाइं आंबेडकर गटाने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बोहरे हे गाव तापी व बोरी नदी संगमावर असून, तापी नदी अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. तापी नदी पूर्व-पश्चिम वाहते, तर बोरी नदी दक्षिणोत्तर वाहते व समोरून अनेर नदी येऊन मिळते यामुळे पाण्याचा प्रवाह बोहरा गावाजवळ येऊन मिळतो. निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचे काम १३९.४ मीटरपर्यंत झाले असल्याने बॅक वॉटर वाढले आहे, तसेच हतनूर धरणाचे दरवाजे उघडले की पाण्याची पातळी वाढून काठावरील लोकवस्तीला धोका निर्माण होतो. नागरिक जीव मुठीत धरून असतात. गावाच्या १७६ कुटुंबांना प्रकल्पात अंशतः बाधित घोषित केले आहे. २००६ मध्ये पुरामुळे गावाला पाण्याचा वेढा पडला होता. कुटुंबांना व जनावरांनादेखील तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन ताबडतोब करण्यात यावे अन्यथा भविष्यात माळीण व तळीवे गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे निवेदनात म्हटले असून, निवेदनावर पीतांबर वाघ, भगवान संदानशिव, अरुण घोलप, यशवंत बैसाने, पंकज सोनवणे, गणेश पवार, सोपान धनगर, छन्नू मोरे, देवीदास फुलपगारे, चंद्रकांत कोळी, उत्तम धनगर, सचिन पाथरवट, रूपचंद धनगर, सतीश सैंदाणे, किरण बच्छाव, विनोद मोरे, गोविंदा भिल, संजय भिल, भरत भिल, धीरज कोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.