शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

152 जणांची चौकशी अन् 40 जणांचे जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 00:37 IST

भादली हत्याकांड : 21 दिवसानंतरही हत्येचा उलगडा होईना

जळगाव : तालुक्यातील भादली बु. येथील हत्याकांड प्रकरणात आतार्पयत पोलिसांनी 152 जणांची चौकशी केली तर 40 जणांचे लेखी जबाब नोंदविले आहे. असे असले तरी पोलिसांच्या हातात अद्यापर्पयत ठोस माहिती हाती आलेली नसली तरी चौघांची हत्या करणारे हे दोन पेक्षा जास्त जण असल्याचा संशय पोलिसांना आहे.20 मार्च रोजी झालेल्या भादली हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. 21 दिवसानंतरही मारेकरी सापडत नसल्याने पोलिसांवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने मारेक:याचे नाव सांगणा:याला पोलीस प्रशासनाने 25 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. चौकशीत प्रतिसाद मिळाल्याने बक्षीसाच्या रकमेत आणखी 25 हजाराची वाढ करण्यात आली. दरम्यान, दररोज 4 ते 5 जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत गावक:यांच्या बोलण्यात वारंवार तफावत आढळून येत आहे. या मुद्यावर केली जात आहे चौकशीभोळे कुटुंबाचा कोणाशी वाद झाला आहे का?, भोळेंच्या प}ीचा विवाह गावातील असल्याने त्याचा काही संबंध आहे का?, भोळे यांच्यामुळे कोणाचे नुकसान झाले आहे, शेती घेणारा व कसणारा यांच्यात कोणाचे नुकसान होणार होते? तसेच चायनीज खाद्य पदार्थाच्या गाडीमुळे कोणाचे  नुकसान, शेतीची थोडीफार रक्कम मिळाली होती व त्याचाही कुठे संबंध येतो का? तसेच चाळीसगाव दरोडय़ाचा संबंध आहे का? या व अन्य  माहितीवर चौकशी केली जात आहे. दरम्यान, मारेक:यांना काही जणांनी पाहिले असल्याचा संशय असून मारेक:यांनी त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली असावी म्हणूनच नाव सांगण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असाही कयास पोलिसांना आहे.फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबकडून घटनास्थळ व परिसराची तपासणी करुन काही नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. घटनेच्या दिवशी ठसे तज्ज्ञांकडूनही ठसे घेण्यात आले तर श्वान पथकाकडूनही तपासणी करण्यात आली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पथके रात्रंदिवस काम करीत आहेत. उशीरा का असेना परंतु, हा गुन्हा आम्ही उघडकीस आणूच. त्यादृष्टीने काही धागेदोरे मिळाले आहेत. नातेवाईकांपासून तर शेजारी व संशयास्पद व्यक्तींची चौकशी करुन जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षकपोलीस अधीक्षकांनी            घेतला आढावापोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी नशिराबाद येथे जाऊन या हत्याकांडाचा पहिल्या दिवसापासून केलेल्या तपासाचा आढावा घेतला. त्यात सहा पथकांनी काय चौकशी केली, त्यात त्यांच्या हाती काय माहिती मिळाली. पुरावे काय मिळाले, अजून गावातून काय माहिती मिळू शकते याबाबत सूचना केल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल व सहायक निरीक्षक राहूल वाघ आदी उपस्थित होते. आतार्पयत 152 जणांची चौकशी व 40 जणांचे लेखी जबाब घेण्यात आल्याचे सुपेकर यांनी सांगितले.