शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

शहरात राहत आहेत १५ हजार भाडेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाकडून नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात ४६ हजार मालमत्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाकडून नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात ४६ हजार मालमत्ता वाढल्या आहेत. यामुळे मनपाच्या मालमत्ताकराच्या रकमेत वाढ होणार आहे. याच सर्वेक्षणादरम्यान शहरात एकूण भाडेकरू म्हणून राहत असलेल्या नागरिकांची माहितीही प्राप्त झाली आहे. शहरात एकूण १५ हजार १५६ नागरिक भाडेकरू म्हणून राहत आहेत, तसेच अनेक घरमालकांकडून भाडेकरू म्हणून राहत असलेल्या नागरिकांची संख्याही लपविली जात आहे. अशा घरमालकांना मनपाकडून नोटीस बजावत आठवडाभरात मनपात येऊन आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून फेरमूल्यांकन करण्यासाठी मनपाने २०१७ला अमरावती येथील स्थापत्य एजन्सीला मक्ता दिला. त्यानुसार, एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक मिळकतींना नंबरिंग केले. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप केले. घराचे फोटो काढून नकाशे तयार केले, तसेच ड्रोनच्या सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान, शहरातील अनेक घरमालकांनी आपले घर भाड्याने देताना, भाडेकरूसोबत करार न करताच, तसेच मनपालाही याबाबतची माहिती न देताच भाडेकरू ठेवल्याचे आढळून आले आहे. या कारणामुळे मालमत्तांच्या वसुलीवर परिणाम होत आहे. घरभाड्याने दिलेल्या घरमालकाकडून मालमत्ता कराची आकारणी ही वेगळ्या नियमांद्वारे होत असते. मात्र, अनेक घरमालक भाडेकरू ठेवल्याची माहिती मनपाकडे देत नसल्याने आहे. त्या प्रकारातच वसुली होत असते. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, सर्वेक्षणानुसार आता अनेक भाडेकरूंची माहिती समोर आल्याने, मनपाने यासाठी आता नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.

मनपा प्रशासन घेणार सुनावणी

मनपाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण हे दोन ते तीन वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे आजच्या घडीस अनेक भाडेकरू हे घर सोडून गेले असतील किंवा काही भाडेकरू वाढलेही असतील. त्यामुळे मनपाने ज्या घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. अशा घरमालकांची सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. जर आजच्या स्थितीत भाडेकरू नसतील, तर तशी माहिती घरमालकांना द्यावी लागणार आहे. जर भाडेकरू असतील, तर भाडेकरूंसोबतचा करारनामा करून घ्यावा लागणार आहे.

माहिती लपविल्यास होणार कारवाई

ज्या घरमालकांनी भाडेकरू ठेवले आहेत. अशा घरमालकांनी मनपाकडे माहिती देण्यास टाळाटाळ केली किंवा माहिती लपविली, तर अशा घरमालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रभाग समितीनिहाय भाडेकरूंची संख्या

प्रभाग समिती १ - ४ हजार ११७

प्रभाग समिती २ - ३ हजार ५३४

प्रभाग समिती ३ - ४ हजार ४०

प्रभाग समिती ४ - ३ हजार ४६५