शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात राहत आहेत १५ हजार भाडेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाकडून नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात ४६ हजार मालमत्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, मनपाकडून नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात ४६ हजार मालमत्ता वाढल्या आहेत. यामुळे मनपाच्या मालमत्ताकराच्या रकमेत वाढ होणार आहे. याच सर्वेक्षणादरम्यान शहरात एकूण भाडेकरू म्हणून राहत असलेल्या नागरिकांची माहितीही प्राप्त झाली आहे. शहरात एकूण १५ हजार १५६ नागरिक भाडेकरू म्हणून राहत आहेत, तसेच अनेक घरमालकांकडून भाडेकरू म्हणून राहत असलेल्या नागरिकांची संख्याही लपविली जात आहे. अशा घरमालकांना मनपाकडून नोटीस बजावत आठवडाभरात मनपात येऊन आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून फेरमूल्यांकन करण्यासाठी मनपाने २०१७ला अमरावती येथील स्थापत्य एजन्सीला मक्ता दिला. त्यानुसार, एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक मिळकतींना नंबरिंग केले. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप केले. घराचे फोटो काढून नकाशे तयार केले, तसेच ड्रोनच्या सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान, शहरातील अनेक घरमालकांनी आपले घर भाड्याने देताना, भाडेकरूसोबत करार न करताच, तसेच मनपालाही याबाबतची माहिती न देताच भाडेकरू ठेवल्याचे आढळून आले आहे. या कारणामुळे मालमत्तांच्या वसुलीवर परिणाम होत आहे. घरभाड्याने दिलेल्या घरमालकाकडून मालमत्ता कराची आकारणी ही वेगळ्या नियमांद्वारे होत असते. मात्र, अनेक घरमालक भाडेकरू ठेवल्याची माहिती मनपाकडे देत नसल्याने आहे. त्या प्रकारातच वसुली होत असते. यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, सर्वेक्षणानुसार आता अनेक भाडेकरूंची माहिती समोर आल्याने, मनपाने यासाठी आता नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.

मनपा प्रशासन घेणार सुनावणी

मनपाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण हे दोन ते तीन वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे आजच्या घडीस अनेक भाडेकरू हे घर सोडून गेले असतील किंवा काही भाडेकरू वाढलेही असतील. त्यामुळे मनपाने ज्या घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. अशा घरमालकांची सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. जर आजच्या स्थितीत भाडेकरू नसतील, तर तशी माहिती घरमालकांना द्यावी लागणार आहे. जर भाडेकरू असतील, तर भाडेकरूंसोबतचा करारनामा करून घ्यावा लागणार आहे.

माहिती लपविल्यास होणार कारवाई

ज्या घरमालकांनी भाडेकरू ठेवले आहेत. अशा घरमालकांनी मनपाकडे माहिती देण्यास टाळाटाळ केली किंवा माहिती लपविली, तर अशा घरमालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रभाग समितीनिहाय भाडेकरूंची संख्या

प्रभाग समिती १ - ४ हजार ११७

प्रभाग समिती २ - ३ हजार ५३४

प्रभाग समिती ३ - ४ हजार ४०

प्रभाग समिती ४ - ३ हजार ४६५