शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

गिरणा नदीवरील १५ कोटींचा रेल्वेपूल अडकला तांत्रिक समस्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:31 IST

दीड वर्ष उलटूनही गाड्या धावताहेत धीम्या गतीने

जळगाव : भुसावळ-सुरत रेल्वे लाइन वरील जळगाव-पाळधी दरम्यान गिरणा नदीवर बांधण्यात आलेला रेल्वेपूल मोठ्या तांत्रिक समस्येत अडकला आहे. या पूलाच्या पुर्णत्वास दीड वर्ष होऊनही आजदेखील प्रत्येक गाडी पूलावरुन जात असताना काही समस्या उद्भवू नये म्हणून कमी वेगाने धावत आहे.सुरत-भुसावळ रेल्वे लाइनच्या दुहेरीकरणात सुमारे १५ कोटी खर्च करुन गिरणा नदीवर गर्डरयुक्त रेल्वे पूल बांधण्यात आला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी या पूलाचे रेल्वे सुरक्षा आयोगाकडून (सीआरएस) परिक्षण करुन उपयोगासाठी खुला करण्यात आला. मात्र त्याचवेळी हस्तांतरण करताना या पूलावरुन प्रत्येक गाडीला २० किमी प्रतितासाची वेग मर्यादा लादण्यात आली. आज दीड वर्ष होऊनही तिच वेग मर्यादा कायम आहे.जळगावहून सुरतकडे जाण्यासाठी रोज या मार्गाने पॅसेंजर आणि मालगाड्या अशा एकूण ६० रेल्वे गाड्या जात असतात. जळगाव स्थानकाहून गाडी जेव्हा निघते तेव्हा साधारण वेग असतो. मात्र जेव्हाही गिरणा नदीचा पूल जवळ येतो तेव्हा प्रत्येक गाडीचा वेग कमी होऊन फक्त १० ते १५ किमी प्रतितासाच्या वेगाने गाडी धावते.याबाबत जळगाव स्टेशन प्रबंधक संजयकुमार रॉय यांना विचारले असता तांत्रिक समस्येच्या कारणाने रेल्वे सुरक्षेच्या हेतूने प्रत्येक गाडीला या ठिकाणी जाताना वेग मर्यादा लादण्यात आली असल्याचे सांगितले.या पूलाबाबत अधिक माहिती काढली असता खूपच मोठी तांत्रिक समस्या असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण ज्यावेळी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या पुलाचे परिक्षण करण्यात आले त्यावेळी पूल उभारणीत काही त्रुटी आढळल्या आणि त्या कारणाने त्याच वेळी गाड्यांची वेग मर्यादा २० किमी प्रतितास असावी अशा सूचना देण्यात आल्या. शिवाय त्याच वेळी विभागीय कार्यालय, मुंबई कडून मापदंड लावून अहवाल बनवून रेल्वेची संशोधन डिझाइन आणि मानक संस्था (आरडीएसओ) लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे, मात्र सदर पूल उभारणीत कोणती तांत्रिक समस्या आहे याबाबत अजूनही खुलासा आलेला नाही.सीआरएस झाल्यानंतर सदर पूल हस्तांतरण करण्यात आला तेव्हापासूनच वेग मर्यादा लादण्यात आली आहे. मात्र कोणत्या तांत्रिक समस्येने वेग मर्यादा आखण्यात आली आहे, याबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आलेले नाही.-संजयकुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (प.रे.)सदर पूलावर तांत्रिक समस्येच्या कारणाने प्रत्येक गाडीस वेग मर्यादा दिली आहे. शिवाय हा सुमारे ३५० मीटरचा महत्त्वपूर्ण पूल असून मापदंडाचा अहवाल लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे. तेथून अजून खुलासा आलेला नसून खुलासा आल्यानंतर वेग निर्बंध हटविण्यात येईल.- संजय त्यागी, बांधकाम कार्यकारी अभियंता, नंदुरबार

टॅग्स :Jalgaonजळगाव