शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीवरील १५ कोटींचा रेल्वेपूल अडकला तांत्रिक समस्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:31 IST

दीड वर्ष उलटूनही गाड्या धावताहेत धीम्या गतीने

जळगाव : भुसावळ-सुरत रेल्वे लाइन वरील जळगाव-पाळधी दरम्यान गिरणा नदीवर बांधण्यात आलेला रेल्वेपूल मोठ्या तांत्रिक समस्येत अडकला आहे. या पूलाच्या पुर्णत्वास दीड वर्ष होऊनही आजदेखील प्रत्येक गाडी पूलावरुन जात असताना काही समस्या उद्भवू नये म्हणून कमी वेगाने धावत आहे.सुरत-भुसावळ रेल्वे लाइनच्या दुहेरीकरणात सुमारे १५ कोटी खर्च करुन गिरणा नदीवर गर्डरयुक्त रेल्वे पूल बांधण्यात आला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी या पूलाचे रेल्वे सुरक्षा आयोगाकडून (सीआरएस) परिक्षण करुन उपयोगासाठी खुला करण्यात आला. मात्र त्याचवेळी हस्तांतरण करताना या पूलावरुन प्रत्येक गाडीला २० किमी प्रतितासाची वेग मर्यादा लादण्यात आली. आज दीड वर्ष होऊनही तिच वेग मर्यादा कायम आहे.जळगावहून सुरतकडे जाण्यासाठी रोज या मार्गाने पॅसेंजर आणि मालगाड्या अशा एकूण ६० रेल्वे गाड्या जात असतात. जळगाव स्थानकाहून गाडी जेव्हा निघते तेव्हा साधारण वेग असतो. मात्र जेव्हाही गिरणा नदीचा पूल जवळ येतो तेव्हा प्रत्येक गाडीचा वेग कमी होऊन फक्त १० ते १५ किमी प्रतितासाच्या वेगाने गाडी धावते.याबाबत जळगाव स्टेशन प्रबंधक संजयकुमार रॉय यांना विचारले असता तांत्रिक समस्येच्या कारणाने रेल्वे सुरक्षेच्या हेतूने प्रत्येक गाडीला या ठिकाणी जाताना वेग मर्यादा लादण्यात आली असल्याचे सांगितले.या पूलाबाबत अधिक माहिती काढली असता खूपच मोठी तांत्रिक समस्या असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण ज्यावेळी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून या पुलाचे परिक्षण करण्यात आले त्यावेळी पूल उभारणीत काही त्रुटी आढळल्या आणि त्या कारणाने त्याच वेळी गाड्यांची वेग मर्यादा २० किमी प्रतितास असावी अशा सूचना देण्यात आल्या. शिवाय त्याच वेळी विभागीय कार्यालय, मुंबई कडून मापदंड लावून अहवाल बनवून रेल्वेची संशोधन डिझाइन आणि मानक संस्था (आरडीएसओ) लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे, मात्र सदर पूल उभारणीत कोणती तांत्रिक समस्या आहे याबाबत अजूनही खुलासा आलेला नाही.सीआरएस झाल्यानंतर सदर पूल हस्तांतरण करण्यात आला तेव्हापासूनच वेग मर्यादा लादण्यात आली आहे. मात्र कोणत्या तांत्रिक समस्येने वेग मर्यादा आखण्यात आली आहे, याबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आलेले नाही.-संजयकुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (प.रे.)सदर पूलावर तांत्रिक समस्येच्या कारणाने प्रत्येक गाडीस वेग मर्यादा दिली आहे. शिवाय हा सुमारे ३५० मीटरचा महत्त्वपूर्ण पूल असून मापदंडाचा अहवाल लखनऊ येथे पाठविण्यात आला आहे. तेथून अजून खुलासा आलेला नसून खुलासा आल्यानंतर वेग निर्बंध हटविण्यात येईल.- संजय त्यागी, बांधकाम कार्यकारी अभियंता, नंदुरबार

टॅग्स :Jalgaonजळगाव